एक्स्प्लोर

Coronavirus | रत्नागिरी जिल्ह्याची चिंता वाढतेय; एकाच दिवशी तब्बल 22 कोरोनाचे रूग्ण

कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात चित्र पालटलं असून सध्या या जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 74वर पोहोचला आहे.

रत्नागिरी : कोरोनामुक्तीकडे जाणाऱ्या जिल्ह्यापैकी एक जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा. 1 मे रत्नागिरी जिल्ह्यातील चित्र काहीसे असेच होते. कारण 26 एप्रिल रोजी जिल्हा रूग्णालयातून सहा महिन्याच्या बाळासह आणखी दोन कोरोना बाधितांना घरी सोडण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण वेगळेच होते. पण, 2 मे रोजी रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे आणखी दोन रूग्ण आढळून आले आणि त्यानंतर मात्र चित्र पालटत गेले. कारण, आजघडीला रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा हा 74वर पोहोचला आहे. बुधवारी रात्री उशिरा तब्बल 22 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानंतर जिल्ह्याची चिंता आणखीन वाढली. रत्नागिरीमध्ये 7, मंडणगडमध्ये 11 आणि दापोलीमध्ये 4 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर हा आकडा 74वर पोहोचला आहे. महत्त्वाचं म्हणजे हे सारे जण मुंबईहून जिल्ह्यात आलेले आहेत. शिवाय, 2 मे ते 13 मार्च याकाळात तब्बल 68 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी सर्वात जास्त रूग्ण हे मुंबईहून आलेले आहेत. तर, यामध्ये दोन नर्सिंगच्या विद्यार्थिनींचा देखील समावेश आहे. आजघडीला जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा 74 झाला आहे. तर अॅक्टीव रूग्णांची संख्या ही 67 झाली आहे. यापूर्वी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दोनच दिवसापूर्वी मृत्यूच्या दोन दिवसानंतर एका रूग्णाचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे.

पाहा व्हिडीओ : 18 तारखेनंतर लॉकडाऊन शब्द राहिल की नाही शंका आहे : प्रकाश जावडेकर

मुंबईहून येणाऱ्यांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा सर्वात जास्त

मुंबई, पुणे या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वास्तव्याला असलेले नागरिक गाव जवळ करत आहेत. त्यामुळे मुंबई- गोवा मार्गावर या शहरांमध्ये येणाऱ्यांची वर्दळ ही दिवसेंदिवस वाढत आहे. पास किंवा शक्य असेल त्या मार्गाने या शहरांमधील नागरिक आपल्या कोकणातील मुळगावी येत आहेत. त्यानंतर त्यांचे स्वॅब घेत तपासणीकरता पाठवले जात आहेत. दरम्यान, मागील 8 ते 10 दिवसांचा विचार करता रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे आढळून आलेले रूग्ण हे मुंबईहून आलेले आहेत.

चिंताजनक! रत्नागिरीत कोरोना बाधितांचा आकडा पन्नाशी पार

गाव पातळीवर संभ्रम

या दोन्ही शहरांमध्ये वास्तव्याला असलेल्या नागरिकांना गावी घेण्यावरून गावा-गावांमध्ये सध्या दुमत असल्याचे दिसत आहे. काही गावांनी या शहरांमध्ये आपल्याच नागरिकांना गावी घेण्याबाबत सकारात्मता दर्शवली आहे. त्यानुसार त्यांना गावी घेत क्वॉरंटाईन करून ठेवले जात आहे. पण, अनेक गावांमध्ये क्वॉरंटाईन करून ठेवण्याच्या नियमांवरून संभ्रम दिसून येत आहे. एका गावात एक तर, दुसऱ्या गावामध्ये दुसराच नियम असल्याचे देखील सध्या चित्र आहे.

संबंधित बातम्या :

नागपुरात रोबोकडून रेल्वेचं निर्जंतुकीकरण, उस्ताद रोबोच्या सहाय्यानं रेल्वेची सफाई

मद्यप्रेमींसाठी खुशखबर; ई-टोकनद्वारे दारुची विक्री, राज्य उत्पादन शुल्क विभागाची सुविधा

मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वेसेवा सुरु करावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सूर्य कोपला! विदर्भात उष्णतेची लाट, कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 
सूर्य कोपला! विदर्भात उष्णतेची लाट, कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 
धक्कादायक! दहीसरमध्ये बाईक पार्क करण्याच्या वादातून युवकाची हत्या, तासाभरातच आरोपीला अटक 
धक्कादायक! दहीसरमध्ये बाईक पार्क करण्याच्या वादातून युवकाची हत्या, तासाभरातच आरोपीला अटक 
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मार्च 2026 | गुरुवार

व्हिडीओ

Nitesh Rane Speech : कोकणात 90 % आंब्याचं नुकसान, शेतकऱ्यांना चांगल Package देणार - नितेश राणे
Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
India LPG Crisis: इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
Ashneer Grover On LPG: 'टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही' अशनीश ग्रोव्हरची देशातील इंधन टंचाईवर खोचक टिप्पणी
'टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही' अशनीश ग्रोव्हरची देशातील इंधन टंचाईवर खोचक टिप्पणी
OBC Reservation : फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
Embed widget