एक्स्प्लोर

हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनी बीड जिल्ह्यात ध्वजारोहण करण्यावरुन संभ्रम! दोन दिवसात चार वेगवेगळे आदेश

हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन 17 सप्टेंबरला साजरा होणार आहे. या निमित्त बीड जिल्ह्यात ध्वजारोहण करण्यावरुन संभ्रम निर्माण झाला आहे. दोन दिवसात चार वेगवेगळे आदेश निघाल्याने ध्वजारोहण बाबतीत गोंधळाची स्थिती आहे.

बीड : मराठवाडा हा एकमेव प्रदेश आहे, जिथे वर्षात चार वेळा ध्वजारोहण केले जाते. उद्या म्हणजे 17 सप्टेंबरला हैदराबाद मुक्ती संग्राम दिन साजरा होत असतानाच बीड जिल्ह्यातील शाळा आणि ग्रामपंचायत पातळीवरच्या कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करावे का नाही, अशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्याला कारण ठरले आहे जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि तहसील कार्यालय यांच्यातील वेगवेगळे ध्वजारोहण संदर्भातील वेगवेगळे आदेश.

राज्यामध्ये सगळीकडे तीनवेळा ध्वजारोहण केले जाते. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि एक मे महाराष्ट्र दिन. मात्र हैदराबाद मुक्ती संग्राम दिन वेगळा असल्याने मराठवाड्यामध्ये चौथ्यांदा ध्वजारोहण केले जाते 17 सप्टेंबर हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन 2001 पासून साजरा केला जातो.

बीडच्या सामान्य प्रशासन विभागाकडुन दि. 14 सप्टेंबरला निर्गमित परिपत्रकाच्या प्रस्तावनेत हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे ध्वजारोहन करण्याबाबत विभागीय मुख्यालय, जिल्हा मुख्यालय व उपविभागीय मुख्यालय असे नमुद आहे तर अनुक्रमांक 04 मध्ये मराठवाड्यातील सर्व तालुक्यामध्ये असा उल्लेख आहे. अर्थात प्रत्येक शाळांत ध्वजारोहण करावे, असा उल्लेख नाही. तर सामान्य प्रशासन विभागाच्या पत्राच्या संदर्भाने बीड जिल्हाधिकाऱ्यांनी दि. 15 सप्टेंबरला परिपत्रक काढुन जिल्हा मुख्यालय, उपविभागीय मुख्यालय व तालुका मुख्यालया व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही ठीकाणी 17 सप्टेंबर 2020 हैदराबाद मुक्ती संग्राम दिन करण्याच्या सुचना नाही असे सांगितले आहे.

हातात फलक घेऊन ठिकठिकाणी उभं राहून बीडमध्ये गावकऱ्यांचं अनोखं आंदोलन

हे सामान्य प्रशासन व जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र सोशल मीडियाच्या माध्यमातुन जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालासह सर्व कार्यालयात पोहचले होते. लगेच आज हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या पुर्वदिनी दि. 16 सप्टेंबरला जिल्ह्याधिकाऱ्यांनी सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये व संस्थात 8.30 पुर्वी किंवा 9.30 नंतर झेंडावंदन करावे, असे सुधारीत निर्देश दिले. याच पत्राचा आधार घेवुन बीडच्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व शाळा-महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम साजरा करण्याचे पत्रक निर्गमित केले.

याहीपेक्षा कहर म्हणजे अंबाजोगाईच्या तहसीलदाराने तर आज दुपारी वेगळा आदेश काढून कोणत्याही शाळेमध्ये ध्वजारोहण करू नये असे सांगितले आहे. विशेष म्हणजे हे सगळे जे आदेश काढण्यात आले आहेत. ते सोशल मीडियावरून पाठवण्यात आलेत. जर आज दुपारनंतर ध्वजारोहण करण्यासंदर्भातचे आदेश सोशल मीडियातून पाठवले गेले असतील तर शाळां, ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत पोहोचले का? हाही प्रश्नच आहे. एकूणच हैदराबाद मुक्ती संग्राम दिनी ध्वजारोहन करण्याच्या आदेशा बाबतीत प्रशासनाचे वरातीमागून घोडे, असा प्रकार समोर आला आहे.

हैदराबाद लढ्याचा जाज्वल्य व संघर्षमय इतिहास समोर ठेवुन हैदराबाद मुक्तीसंग्राम साजरा केला जातो. अशावेळी अगोदर झेडावंदन करु नये व नंतर करावे अशा दोन निर्देशामुळे शासकीय निमशासकीय कार्यालये, संस्था, शाळा व महाविद्यालयात संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे.

Beed Oxygen Shortage | बीडमधील ऑक्सिजन प्लांटमधील क्षमता घटली,राज्यातील आरोग्यव्यवस्था व्हेंटिलेटरवर

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर राजर्षी शाहू पुरस्कार घोषित
Maharashtra Live News Updates: ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर राजर्षी शाहू पुरस्कार घोषित
Sunetra Pawar On Aniket Tatkare Vidhan Parishad Election 2026: कोकणातून अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवड; सुनेत्रा पवारांची पहिली पोस्ट, म्हणाल्या...
कोकणातून अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवड; सुनेत्रा पवारांची पहिली पोस्ट, म्हणाल्या...
Tukaram Munde News: जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जून 2026 | गुरुवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जून 2026 | गुरुवार

व्हिडीओ

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Munde News: जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
Embed widget