CM Eknath Shinde On Manoj Jarange : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याकडून मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation)  मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण केले जाणार आहे. यासाठी जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. दरम्यान यावरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची प्रतिक्रिया आली आहे. 'मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी 1 लाख 40 हजार लोकं तीन शिफ्टमध्ये काम करतायत. तसेच, मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार सकारात्मक आहे, त्यामुळेच सरकारला सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. तर, मराठा समाजाला आरक्षण देण्यावर सरकार ठाम असून, कालही आमची तीच भूमिका होती आणि आजही तीच भूमिका असल्याचे देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 


पुढे बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठा आरक्षण सरकार देणार आहे. सरकारची भूमिका कालही तीच होती आणि आज ही स्पष्टपणे तीच भूमिका आहे. इतर कोणत्याही आणि ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार आहे. यासाठी मागासवर्ग आयोग मोठ्याप्रमाणात काम करत आहे. 1 लाख 40 हजार लोक तीन शिफ्टमध्ये काम करत आहे. सर्वेच काम जोरात सुरू आहे. जे कुणबी नोंदी सापडत आहे, त्यांचे प्रमाणपत्र देखील देण्याचं काम सुरू आहे. मराठा समाजाच्या संबंधित योजना देखील देण्याचं काम सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांना देखील विनंती आणि आवाहन केलं आहे. सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे. सरकार मराठा आरक्षण देण्याच्या मनस्थितीत काम करत आहे. आणि देत देखील आहे. कुठलेही आश्वासन न देता थेट मराठा समाजाशी संबंधित योजनांचे निर्णय घेतले जात आहे. ओबीसी प्रमाणे ज्या सुविधा आहेत, त्या देखील मराठा समाजाला देण्याचं प्रयत्न केले जात आहे. 


हे सरकार तुमचंच आहे....


मनोज जरांगे यांच्यासोबत ज्या काही चर्चा होत आहे, त्या सकारात्मक होत आहेत. त्यामुळे हे सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. मराठा समाजाला सोयीसुविधा देण्याबाबतीत सरकार हात आखडता घेणार नाही. मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यावर सरकार ठाम आहे. इतर कोणत्याही समाजावर अन्याय न करता हा निर्णय सरकार घेणार आहे. कुणबी नोंदी शोधण्याचे काम देखील मोठ्याप्रमाणात सुरू आहे. यासाठी शिंदे समिती काम करत आहे. जर सरकार सकारात्मक नसेल तर आंदोलन ठीक आहे. मात्र, सरकार सकारात्मक आहे, त्यामुळेच सरकारला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. तमाम मराठा समाजाला माझा आवाहन  आहे की, हे सरकार तुमचंच आहे. 


अधिकारी जरांगेंच्या संपर्कात...


मनोज जरांगे यांच्यासोबत माझी अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. आमचे अधिकारी त्यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्या ज्या काही सूचना येत आहे, त्या सर्व सूचना तातडीने अमलात आणण्यासाठी प्रयत्न सुरू, असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 



इतर महत्वाच्या बातम्या: 


मारण्याचा प्रयोग केल्यास महाराष्ट्रातील एकही रस्ता खुला राहणार नाही; जरांगेंचा सरकारला इशारा