एक्स्प्लोर

..तर भर पावसात चंद्रकांत पाटलांच्या घरावर मोर्चा, चिकोत्रा धरणग्रस्तांचा इशारा

चिकोत्रा खोऱ्यातील वरदाई असलेल्या झुलपेवाडी (चिकोत्रा) प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत नसल्यामुळे, चिकोत्रा खोऱ्यातील 32 गावामध्ये पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

कोल्हापूर: अखिल भारतीय किसान सभेने चिकोत्रा खोऱ्यातील प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. चिकोत्रा खोऱ्यातील वरदाई असलेल्या झुलपेवाडी -चिकोत्रा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत नसल्यामुळे, चिकोत्रा खोऱ्यातील 32 गावामध्ये पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी परिस्थिती इथल्या नागरिकांची बनली आहे. यासाठी विविध आंदोलनं केली तरी प्रश्न सुटत नाही. त्यामुळे किसान सभेने काल कागल इथं सुमारे 45 मिनिटं महामार्ग रोखून धरला. मागण्या मान्य न झाल्यास 1 जुलै 2018 रोजी महसूलमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर, शेतकऱ्यां च्या मुलांची धरणस्थळापासून  उभ्या पावसात भिजत मोटारसायकल रॅली काढू, असा इशारा आंदोलकांनी दिला. ..तर भर पावसात चंद्रकांत पाटलांच्या घरावर मोर्चा, चिकोत्रा धरणग्रस्तांचा इशारा गेल्या 20 वर्षांपासून इथे पाणीप्रश्न भेडसावत आहे. महत्त्वाचं म्हणजे या नदीवर चुकीच्या सर्वेक्षणाने चिकोत्रा नदीवर धरण बांधल्याने, हे धरण भरतच नाही, त्यामुळे धरणक्षेत्रातील 32 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, असा आंदोलकांचा आरोप आहे. चिकोत्रा खोऱ्यातील पाण्याचे दुर्भिक्ष पाहून प्रशासनाने 1996 मध्ये झुलपेवाडी (ता. आजरा) इथे चिकोत्रा धरणाची उभारणी केली. मात्र, अत्यल्प पाणलोट क्षेत्रामुळे हे धरण अतिवृष्टीची दोन वर्षे वगळता पूर्ण क्षमतेने भरलेच नाही. परिणामी उन्हाळ्यात येथील नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत आहे. धरणासाठी चुकीचा सर्व्हे झाल्याने अधिकाऱ्यांनी सरकार आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली. मात्र त्या चुका सुधारण्यासाठी आम्ही उपाय सुचवले आहेत. नागरिकांच्या ज्या मागण्या आहेत, त्या सरकारने मान्य केल्यास, हा प्रश्न सुटेल, असं किसान सभेचे कागल तालुका अध्यक्ष संभाजी यादव यांनी सांगितलं. मोर्चाचे नेतृत्व अखिल भातीय किसान सभेचे तालुका अध्यक्ष कॉ. संभाजी यादव , कॉ. शिवाजीराव मगदूम, दयानंद पाटील नंद्याळकर यांनी केले. ..तर भर पावसात चंद्रकांत पाटलांच्या घरावर मोर्चा, चिकोत्रा धरणग्रस्तांचा इशारा यावेळी संपूर्ण पुणे - बेंगलोर महामार्ग सेवा रस्त्यासह अडवला. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच भांबेरी उडाली. यावेळी पाठबंधारे विभागाचे अधिकारी एस.एम. खतकल्ले आणि आर. आय. पाटील, तसेच प्रभारी तहसीलदार श्री गवळी यांनी आंदोलकांना चिकोत्राचे गळती काढण्याचे काम उद्यापासून तात्काळ हाती घेतले आहे, असे लेखी उत्तर दिले. त्याचबरोबर दिंडेवाडी - बारवे  या अर्धवट राहिलेल्या धरणाचे काम तात्काळ सुरु करणेबाबत कोणती ठोस कार्यवाही करणार याबाबतचे लेखी पत्र दिले. दिंडेवाडी - बारवे प्रकल्प पूर्ण  झाल्याशिवाय किसान सभेचा लढा चालूच राहिल, असा इशारा आंदोलकांनी दिला. संभाजी यादव म्हणाले, “या सरकारने 11 जून 2018 रोजीच्या लेखी आश्वासन न दिल्यास, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरावर 1 जुलै 2018 रोजी शेतकऱ्यांच्या मुलांची धरणस्थळापासून  उभ्या पावसात भिजत मोटारसायकल रॅली काढू” आंदोलकांच्या मागण्या काय? 1) हेळ्याचा देव येथून वाया जाणारे ओघळाचे पाणी चिकोत्रा धरणात वळवा. 2) आरळगुंडी येथून जाणारे ओघळाचे पाणी चिकोत्रा धरणात वळवा. 3) भावेश्वरी मंदिर (दिंडेवाडी) परिसरामधून जाणारे पाणी  चिकोत्रा धरणात वळवा. 4) म्हातारीचे पठार व शिवारबा पठार येथून जाणारे पाणी चिकोत्रा धरणात वळवा. 5) चिकोत्रा धरणाची गळती ताबडतोब काढा. 6) हिरण्यकेशी नदीकडे जाणारे अतिरिक्त पाणी कॅनॉल मधून चिकोत्रा धरणात वळवा. 7) पुनर्वसनासह दिंडेवाडी-बारवे प्रकल्प पूर्ण करा. 8) चिकोत्रा धरणाचे जलस्तोत्र बळकटीकरण करण्यासाठी लागणाऱ्या निधीचे जिल्हा नियोजन मंडळातून ताबडतोब तरतूद करा.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
Surat Bardoli Bus Accident : जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
गुजरातमधील फॅक्टरीवर मुंबई पोलिसांची कारवाई, 80 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; कोल्हापुरात 100 दारु अड्डे उध्वस्त
गुजरातमधील फॅक्टरीवर मुंबई पोलिसांची कारवाई, 80 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; कोल्हापुरात 100 दारु अड्डे उध्वस्त

व्हिडीओ

Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी
Devendra Fadnavis On Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार
Dilip Walse Patil Pimpari : विलास लांडेंच्या घरी दिलीप वळसे पाटील, नाराजांची मनधरणी होणार?
Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Surat Bardoli Bus Accident : जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भिषण अपघात
जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भिषण अपघात
Beed Crime : घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
धक्कादायक! अमरावतीत युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, पोलीस घटनास्थळी दाखल 
धक्कादायक! अमरावतीत युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, पोलीस घटनास्थळी दाखल 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
Ramdas Athawale : सहज उपलब्ध होणारी हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाला महसूल मिळेल : रामदास आठवले
सहज उपलब्ध होणारी हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाला महसूल मिळेल : रामदास आठवले
1200 एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारणार, निर्यात व्यवस्था बळकट करणार : जयकुमार रावल
1200 एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारणार, निर्यात व्यवस्था बळकट करणार : जयकुमार रावल
Nashik Bus Fire: मुंबई-आग्रा महामार्गावर बर्निंग बसचा थरार, 54 प्रवासी बालंबाल बचावले; PHOTO
मुंबई-आग्रा महामार्गावर बर्निंग बसचा थरार, 54 प्रवासी बालंबाल बचावले; PHOTO
Embed widget