एक्स्प्लोर

..तर भर पावसात चंद्रकांत पाटलांच्या घरावर मोर्चा, चिकोत्रा धरणग्रस्तांचा इशारा

चिकोत्रा खोऱ्यातील वरदाई असलेल्या झुलपेवाडी (चिकोत्रा) प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत नसल्यामुळे, चिकोत्रा खोऱ्यातील 32 गावामध्ये पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

कोल्हापूर: अखिल भारतीय किसान सभेने चिकोत्रा खोऱ्यातील प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. चिकोत्रा खोऱ्यातील वरदाई असलेल्या झुलपेवाडी -चिकोत्रा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत नसल्यामुळे, चिकोत्रा खोऱ्यातील 32 गावामध्ये पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी परिस्थिती इथल्या नागरिकांची बनली आहे. यासाठी विविध आंदोलनं केली तरी प्रश्न सुटत नाही. त्यामुळे किसान सभेने काल कागल इथं सुमारे 45 मिनिटं महामार्ग रोखून धरला. मागण्या मान्य न झाल्यास 1 जुलै 2018 रोजी महसूलमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर, शेतकऱ्यां च्या मुलांची धरणस्थळापासून  उभ्या पावसात भिजत मोटारसायकल रॅली काढू, असा इशारा आंदोलकांनी दिला. ..तर भर पावसात चंद्रकांत पाटलांच्या घरावर मोर्चा, चिकोत्रा धरणग्रस्तांचा इशारा गेल्या 20 वर्षांपासून इथे पाणीप्रश्न भेडसावत आहे. महत्त्वाचं म्हणजे या नदीवर चुकीच्या सर्वेक्षणाने चिकोत्रा नदीवर धरण बांधल्याने, हे धरण भरतच नाही, त्यामुळे धरणक्षेत्रातील 32 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, असा आंदोलकांचा आरोप आहे. चिकोत्रा खोऱ्यातील पाण्याचे दुर्भिक्ष पाहून प्रशासनाने 1996 मध्ये झुलपेवाडी (ता. आजरा) इथे चिकोत्रा धरणाची उभारणी केली. मात्र, अत्यल्प पाणलोट क्षेत्रामुळे हे धरण अतिवृष्टीची दोन वर्षे वगळता पूर्ण क्षमतेने भरलेच नाही. परिणामी उन्हाळ्यात येथील नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत आहे. धरणासाठी चुकीचा सर्व्हे झाल्याने अधिकाऱ्यांनी सरकार आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली. मात्र त्या चुका सुधारण्यासाठी आम्ही उपाय सुचवले आहेत. नागरिकांच्या ज्या मागण्या आहेत, त्या सरकारने मान्य केल्यास, हा प्रश्न सुटेल, असं किसान सभेचे कागल तालुका अध्यक्ष संभाजी यादव यांनी सांगितलं. मोर्चाचे नेतृत्व अखिल भातीय किसान सभेचे तालुका अध्यक्ष कॉ. संभाजी यादव , कॉ. शिवाजीराव मगदूम, दयानंद पाटील नंद्याळकर यांनी केले. ..तर भर पावसात चंद्रकांत पाटलांच्या घरावर मोर्चा, चिकोत्रा धरणग्रस्तांचा इशारा यावेळी संपूर्ण पुणे - बेंगलोर महामार्ग सेवा रस्त्यासह अडवला. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच भांबेरी उडाली. यावेळी पाठबंधारे विभागाचे अधिकारी एस.एम. खतकल्ले आणि आर. आय. पाटील, तसेच प्रभारी तहसीलदार श्री गवळी यांनी आंदोलकांना चिकोत्राचे गळती काढण्याचे काम उद्यापासून तात्काळ हाती घेतले आहे, असे लेखी उत्तर दिले. त्याचबरोबर दिंडेवाडी - बारवे  या अर्धवट राहिलेल्या धरणाचे काम तात्काळ सुरु करणेबाबत कोणती ठोस कार्यवाही करणार याबाबतचे लेखी पत्र दिले. दिंडेवाडी - बारवे प्रकल्प पूर्ण  झाल्याशिवाय किसान सभेचा लढा चालूच राहिल, असा इशारा आंदोलकांनी दिला. संभाजी यादव म्हणाले, “या सरकारने 11 जून 2018 रोजीच्या लेखी आश्वासन न दिल्यास, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरावर 1 जुलै 2018 रोजी शेतकऱ्यांच्या मुलांची धरणस्थळापासून  उभ्या पावसात भिजत मोटारसायकल रॅली काढू” आंदोलकांच्या मागण्या काय? 1) हेळ्याचा देव येथून वाया जाणारे ओघळाचे पाणी चिकोत्रा धरणात वळवा. 2) आरळगुंडी येथून जाणारे ओघळाचे पाणी चिकोत्रा धरणात वळवा. 3) भावेश्वरी मंदिर (दिंडेवाडी) परिसरामधून जाणारे पाणी  चिकोत्रा धरणात वळवा. 4) म्हातारीचे पठार व शिवारबा पठार येथून जाणारे पाणी चिकोत्रा धरणात वळवा. 5) चिकोत्रा धरणाची गळती ताबडतोब काढा. 6) हिरण्यकेशी नदीकडे जाणारे अतिरिक्त पाणी कॅनॉल मधून चिकोत्रा धरणात वळवा. 7) पुनर्वसनासह दिंडेवाडी-बारवे प्रकल्प पूर्ण करा. 8) चिकोत्रा धरणाचे जलस्तोत्र बळकटीकरण करण्यासाठी लागणाऱ्या निधीचे जिल्हा नियोजन मंडळातून ताबडतोब तरतूद करा.

महत्त्वाच्या बातम्या

विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget