एक्स्प्लोर

भुजबळांचा राजकीय आयुष्यात मागे वळून बघताना सगळ्यात सुखावणारा क्षण कोणता

Chhagan bhujbal In Majha katta : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी उपमुख्यंत्री छगन भुजबळ यांनी माझा कट्ट्यावर विशेष मुलाखत दिली.

Chhagan bhujbal In Majha katta : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी उपमुख्यंत्री छगन भुजबळ यांनी माझा कट्ट्यावर विशेष मुलाखत दिली. 75 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याशी खास संवाद साधला आहे. मागील पाच दशकात देशातील आणि राज्यातील राजकारण आणि समाजकारण छगन भुजबळ यांनी खूप जवळून पाहिले आहे. ज्या  पक्षातून त्यांची राजकीय कारकिर्द सुरु झाली, त्या शिवसेनाच्या सध्याच्या घडामोडीमुळे महाराष्ट्राच राजकारण ढवळून निघालेय. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले आहे.  पण तीस वर्षांपूर्वी 1991साली शिवसेना नेतृत्वाला असेच आव्हान छगन भुजबळ यांनी दिलं होतं. शिवसेना ते राष्ट्रवादी व्हाया काँग्रेस या प्रवासात छगन भुजबळ यांनी अनेक राजकीय चढउतार पाहिले आहेत. नगरसेवक ते गृहमंत्री, उपमुख्यमंत्री अशी पदं छगन भुजबळ यांनी भूषवली आहेत. छगन भुजबळ यांच्यातील राजकीय नेता घडवणारी शिवसेना सध्या सर्वात कठीण काळातून जात आहे. तर छगन भुजबळ यांच्या राष्ट्रवादी पक्षासमोरही मोठी आव्हानं आहेत. या सर्वांविषय छगन भुजबळ यांनी माझा कट्ट्यावर उत्तरं दिली आहेत.

Q. 75 वर्ष पूर्ण झाले, यावर तुम्हाला विश्वास बसतोय का?

50 व्या वर्षी होतो, तसेच आताही वाटत आहे. खरं म्हणजे हे वाढदिवस वैगरे आपल्या हातात नसतात. आपण जरी येऊ नको अस म्हटलं तरी ते येतातच.प्रत्येकाच्या आयुष्यात न बोलवता वाढदिवस येतात. त्यासाठी काही करावं लागत नाही.

Q. मागे वळून पाहाताना, असा कोणता वाढदिवस होता का? ज्याची तुम्ही आतुरतेनं वाट पाहत होतात?

60 व्या वर्षी झालेला वाढदिवस शिवाजी पार्कवर झाला होता. त्यावेळी विलासराव देशमुख, शरद पवार यांच्यासारखे महाराष्ट्रातील नेते तर होतेच.  त्याशिवाय इतर राज्यातीलही नेते आले होते. त्यामध्ये लालू प्रसाद यादव, फारुख अब्दुला यांच्यासारखे नेते आणि लोकं आले होते. शिवाजी पार्क संपूर्ण भरलं होतं. वाढदिवसाची सभा शिवाजी पार्कवर फक्त छगन भुजबळ यांचीच झाली असेल. हा वाढदिवस कायम माझ्या आठवणीत राहिल.

Q. बाळासाहेब ‘लखोबा लोखंडे’ का म्हणायचे?

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हा शिवाजी पार्कवर भाषणामध्ये आम्ही श्रीक्रृष्ण आयोगाची स्थापना करु असी घोषणा केली होती. नेमकं मी गृहमंत्री झालो. त्यावेळी सर्व फाईल्स बंद केल्या होत्या. अचानक गृहमंत्रालयाकडून एक फाईल आली, त्यामध्ये सर्व पोलिसांचे रिपोर्ट्स होते गुन्हा नोंदवायला हवा..आता मी केलं नाही तर लोकं म्हणणार श्रीक्रृष्ण आयोगाची अमंलबजावणी केली नाही. सर्व केसेस संपवल्या होत्या, तर ही केस कशी राहिली. त्यांचेच सरकार असताना फाईल्स राहिली कशी...? त्यानंतर मी सही केली. बाळासाहेबांना अटक झाली. आयुक्तांना सांगितलं की, त्यांना तुरुंगात वैगरे घेऊन जाऊ नका, जामीन मागितला तर देऊन टाका.. असे सांगितलं होतं. जामीन नाही मिळाला तर काय करायच... तर मातोश्री हेच जेल आहे असे म्हणायचं अन् त्यांना तिथेच ठेवायचं. असं ठरवलं होतं. तो मी नव्हेच मधील लखोबा लोखंडे जेवढा प्रसिद्ध झाला नाही तेवढा बाळासाहेब ठाकरेंनी केला. काँग्रेस प्रवेशावर बाळासाहेब ठाकरे यांनी ‘लखोबा लोखंडे’ असा उल्लेख केला.

Q. 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. मागे वळून पाहाताना सर्वात सुखावलेलं काय वाटतेय? कशाचा खूप आनंद वाटतोय?

अनेक चांगल्या गोष्टी माझ्या हातून सुदैवानं घडल्या आहेत.  1985 साली मुंबईचा महापौर झाल्याची आठवण मला सातत्यान आठवते. अतिशय लोकप्रिय महापौर मुंबई आणि राज्यातही प्रसिद्ध झालो होतो. ट्रॅफिक अलर्ट, बॉम्बेचं मुंबई यासारखे निर्णय झाले.

Q. राजकीय आयुष्यात कोणत्या गोष्टीची खंत वाटते? शिवसेना सोडलेली की बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याचा घेतलेला निर्णय?

शिवसेना सोडण्यामागे काही कारणं होती. वसंतदादा पाटील जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा 1985 विधानसभेत आमदार होतो. तर विधानपरिषदेवर मनोहर जोशी आमदार होते. मंडल आयोग जाहीर झालाच पाहिजे अशा आम्ही घोषणा करायचो. त्यावेळी व्हीपी सिंह यांनी मंडळ आयोगाची घोषणा केली. त्याला बाळासाहेबांचा विरोध सुरु झाला. त्यानंतर अनेक गोष्टींमध्ये आमच्यामध्ये विरोधाभास जाणवू लागला. पोटाला जात नसते, त्यामुळे जातीवरुन आरक्षण मिळता कामा नये, असे बाळासाहेबांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. त्याचवेळी मी भटक्या विमुक्त जातींचा मोर्चा निघाला होता, त्यांच्याबरोबर आरक्षण मिळावं म्हणून मी आंदोलनात होतो. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हा शिवाजी पार्कवर भाषणामध्ये आम्ही श्रीक्रृष्ण आयोगाची स्थापना करु असी घोषणा केली होती. नेमकं मी गृहमंत्री झालो. त्यावेळी सर्व फाईल्स बंद केल्या होत्या. अचानक गृहमंत्रालयाकडून एक फाईल आली, त्यामध्ये सर्व पोलिसांचे रिपोर्ट्स होते, गुन्हा नोंदवायला हवा..आता मी केलं नाही तर लोकं म्हणणार श्रीक्रृष्ण आयोगाची अमंलबजावणी केली नाही. सर्व केसेस संपवल्या होत्या, तरीही केस कशी राहिली. त्यांचेच सरकार असताना फाईल्स राहिली कशी...? त्यानंतर मी सही केली. बाळासाहेबांना अटक झाली. आयुक्तांना सांगितलं की, त्यांना तुरुंगात वैगरे घेऊन जाऊ नका, जामीन मागितला तर देऊन टाका.. असे सांगितलं होतं. जामीन नाही मिळाला तर काय करायच... तर मातोश्री हेच जेल आहे असे म्हणायचं अन् त्यांना तिथेच ठेवायचं. असं ठरवलं होतं.  तो मी नव्हेच मधील लखोबा लोखंडे जेवढा प्रसिद्ध झाला नाही तेवढा बाळासाहेब ठाकरेंनी केला. काँग्रेस प्रवेशावर बाळासाहेब ठाकरे यांनी  ‘लखोबा लोखंडे’ असा उल्लेख केला.

Q. नथुराम यांच्याबद्दलची भूमिका? त्याबद्दल तुमचं काय मत आहे?

त्यावेळीच मी माझी भूमिक स्पष्ट केली होती. माझ्या तोंडामध्ये चुकीचे शब्द टाकले गेले होते. नथुरामाचे पुतळे उभा करावे, असे मी म्हटलोच नव्हतो.

Q. बाळासाहेबांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा आणि माघार, नेमकं काय घडलं होतं?

डॉ. बाबासाहेब आबेडकरांच्या पुतळ्याच्या विटंबनेत माझं नाव 'सामना'मध्ये छापून आलं. मात्र मला न्यायालयाने निर्दोष सोडलं. त्यामुळे मी बाळासाहेबांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला होता. त्यावेळी सामनामधील माझ्या अब्रुनुकसानीच्या अग्रलेख प्रकरणी बाळासाहेब यांना अटक होणार होती. मात्र मी कोर्टात जाऊन केस मागे घेतली. यानंतर बाळासाहेबांनी माझ्यावर परत कधीच टीका केली नाही आणि मी देखील केली नाही.

Q. शिवसेनेतून बंड कसा केला...?

त्यावेळी आम्ही 18 जण शिवसेनेतून बाहेर पडलो होते. 54 पैकी 18 जणांनी आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. पण 10 दिवसानंतर आमच्यामधील 6 जणांनी पुन्हा बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. म्हणजे पुन्हा एक तृतांश आमदार बाहेर पडले होते. पुढच्या निवडणुकीत आमच्यातील दोन तीन निवडून आले. विधानसभेत अद्यापही रेकॉर्ड आहे. आम्हाला सोडलं नसते, त्यामुळे आम्ही बाहेरच होतो. आमचा शपथविधीच नागपूरला झाला. मुंबई एअरपोर्टला उतरल्यानंतर तेथून जो काचाचा पडल्या होत्या त्या माझगावच्या घरापर्यंत होत्या.बाहेरही कुठेही निघालो तर आडवे यायचे दगड वैगरे फेकायचे... काँग्रेसवाले काही वाचवायला येत नव्हते. हळू हलू पुढे गेलो... ती परिस्थिती शिवसेनेत जाऊ शकत होतात, पण बाहेर नाही....

Q. तुमचा आवडता मुख्यमंत्री कोणता?

शरद पवार आणि विलासराव देशमुख

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: सुनेत्रा पवार यांचा हर्षवर्धन सपकाळ यांना पुन्हा एकदा फोन, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या संदर्भात चर्चा
Maharashtra Live Blog Updates: सुनेत्रा पवार यांचा हर्षवर्धन सपकाळ यांना पुन्हा एकदा फोन, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या संदर्भात चर्चा
Congress Baramati Election: अखेर काँग्रेसची बारामती पोटनिवडणुकीतून माघार, आज दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज परत घेणार, वड्डेटीवारांची माहिती
अखेर काँग्रेसची बारामती पोटनिवडणुकीतून माघार, आज दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज परत घेणार, वड्डेटीवारांची माहिती
Devendra Fadnavis On Baramati By Election 2026: मोठी बातमी: राजकारणातील अचंबित करणारी घटना, देवेंद्र फडणवीसांचा हर्षवर्धन सपकाळांना फोन
मोठी बातमी: राजकारणातील अचंबित करणारी घटना, देवेंद्र फडणवीसांचा हर्षवर्धन सपकाळांना फोन
Nashik Crime News: मराठी मुलीनं महिनाभर ‘रोजे’ ठेवले अन् कुटुंबीय हादरले, नाशिकमधील बड्या कंपनीत बळजबरी धर्मांतर; नेमकं काय घडलं?
मराठी मुलीनं महिनाभर ‘रोजे’ ठेवले अन् कुटुंबीय हादरले, नाशिकमधील बड्या कंपनीत बळजबरी धर्मांतर; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात स्वल्पविराम, पडद्यामागे काय-काय घडलं? Special Report
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात कोण धुरंदर कोण सरेंडर? Special Report
Cockroach Found In Vande Bharat Meal : झुरळ खिचडीत रेल्वे अडचणीत Special Report
Pune Cyber Scam : 54 कोटींच्या आमिषाला भुलले अन् 12 कोटी गमावले Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Public Interest Litigations: आता गेला की तो जमाना! जनहित याचिकांची केवळ व्याख्या करण्याची नव्हे, तर त्या पूर्णपणे रद्द करण्याची वेळ आली; केद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
आता गेला की तो जमाना! जनहित याचिकांची केवळ व्याख्या करण्याची नव्हे, तर त्या पूर्णपणे रद्द करण्याची वेळ आली; केद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
Women Reservation Bill: केंद्राकडून महिला आरक्षण सुधारणा मसुद्याला मंजुरी, विधेयक या महिन्यात मंजूर होण्याची शक्यता; 273 जागा महिलांसाठी राखीव, उत्तर प्रदेशात सर्वाधिक खासदार होणार, महाराष्ट्रात किती?
केंद्राकडून महिला आरक्षण सुधारणा मसुद्याला मंजुरी, विधेयक या महिन्यात मंजूर होण्याची शक्यता; 273 जागा महिलांसाठी राखीव, उत्तर प्रदेशात सर्वाधिक खासदार होणार, महाराष्ट्रात किती?
युद्धखोर इस्त्रायलचा पहिल्याच दिवशी युद्धविरामाला सुरुंग, लेबनाॅनमध्ये 10 मिनिटात 254 जणांच्या कत्तली; अमेरिकेनं सुद्धा पलटी मारली; संतप्त इराणनं होर्मुझ मार्ग पुन्हा रोखला, उद्यापासून चर्चा होणार तरी कशी?
युद्धखोर इस्त्रायलचा पहिल्याच दिवशी युद्धविरामाला सुरुंग, लेबनाॅनमध्ये 10 मिनिटात 254 जणांच्या कत्तली; अमेरिकेनं सुद्धा पलटी मारली; संतप्त इराणनं होर्मुझ मार्ग पुन्हा रोखला, उद्यापासून चर्चा होणार तरी कशी?
NCP Sharad Pawar: दोन्ही राष्ट्रवादींच्या विलनीकरणाच्या मुद्द्याला पूर्णविराम? शरदचंद्र पवार पक्ष ॲक्शन मोडमध्ये, बैठका अन् गाठीभेटींना वेग
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलनीकरणाच्या मुद्द्याला पूर्णविराम? शरदचंद्र पवार पक्ष ॲक्शन मोडमध्ये, बैठका अन् गाठीभेटींना वेग
Nashik Crime News: नाशिकच्या नामांकित कंपनीत भयानक कांड, आधी नोकरी द्यायचे मग रिसॉर्टवर नेऊन...; 9 गुन्हे दाखल, नेमकं प्रकरण काय?
नाशिकच्या नामांकित कंपनीत भयानक कांड, आधी नोकरी द्यायचे मग रिसॉर्टवर नेऊन...; 9 गुन्हे दाखल, नेमकं प्रकरण काय?
Chhaya Kadam Shares Post For Gaurav More: 'फिल्टरपाड्याच्या झोपडपट्टीतून...', दिग्गज अभिनेत्रीची 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेसाठी डोळे पाणावणारी पोस्ट
'फिल्टरपाड्याच्या झोपडपट्टीतून...', दिग्गज अभिनेत्रीची 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेसाठी डोळे पाणावणारी पोस्ट
Pune Crime: पुण्यातील 'त्या' पोलिसांवर कारवाईचा बडगा; आयटी अभियंता तरुण-तरुणीला धमकावत 10 हजार रुपये उकळण भोवलं, तिघांचं निलंबन
पुण्यातील 'त्या' पोलिसांवर कारवाईचा बडगा; आयटी अभियंता तरुण-तरुणीला धमकावत 10 हजार रुपये उकळण भोवलं, तिघांचं निलंबन
Ritu Shivpuri Life Story: वयाच्या 56व्या वर्षी तिशीतलं ग्लॅमर, गोविंदाच्या 'लाल दुपट्टे वाली' गाण्यातली अभिनेत्री टेलिव्हिजनवरच्या 'बा'ची लेक; एक सिनेमा करुन ठरली 'वन फिल्म वंडर'
वयाच्या 56व्या वर्षी तिशीतलं ग्लॅमर, गोविंदाच्या 'लाल दुपट्टे वाली' गाण्यातली अभिनेत्री टेलिव्हिजनवरच्या 'बा'ची लेक; एक सिनेमा करुन ठरली 'वन फिल्म वंडर'
Embed widget