Breaking News LIVE : द वायकिंग क्रुझेस ब्रिटिश आर्ट 2021 स्पर्धेत कोल्हापूरच्या कन्येला पारितोषिक
Breaking News LIVE Updates, 17 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
द वायकिंग क्रुझेस ब्रिटिश आर्ट 2021 स्पर्धेत कोल्हापूरच्या कन्येला पारितोषिक. रिचा राजेश वोरा हिच्या 'मॉर्निंग आफ्टर' या चित्राला द्वितीय पारितोषिक. लग्नानंतर रिचा वोरा इंग्लंडमध्ये स्थायिक आहे, रिचावर कौतुकाचा वर्षाव.
पिंपरी चिंचवड शहरासाठी लसींचा साठा उपलब्ध झाला नाही, त्यामुळे उद्या ही शहरात लसीकरण होणार नाही.
को-विन ॲपवर स्पुटनिकचा पर्याय दिसू लागला आहे. को-विन अॅप अपग्रेड केल्यानंतर पर्याय उपलब्ध.
पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल साडे सहा कोटींचे रक्तचंदन ताब्यात घेण्यात आलंय. 6.4 टन इतक्या वजनाचे हे रक्तचंदन ताब्यात घेण्यात आलं. वाकड पोलिसांच्या नाकेबंदीत ही मोठी कारवाई पार पडली. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली.
कराड तालुक्यातील साकुर्डी येथील खळबळजनक घटना. नदीपात्रात तीन जिवंत बॉम्ब सापडले. मासेमारी करणाऱ्या युवकाचा जाळ्यात आले बॉम्ब. तिनी बॉम्ब प्लास्टिकच्या पिशवीत बांधून ठेवले होते. पोलीस घटनास्थळी दाखल.
दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या बोर्डांच्या निर्णयाल हायकोर्टात आव्हान. एसएससी, सीबीएसई, आयसीएसई व इंटरनॅशनल बोर्डसह सर्व प्रतिवाद्यांना बुधवारपर्यंत प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश. प्रत्येक बोर्डकडून दहावीच्या मुलांचा निकाल लावताना वेगवेगळे सूत्र लावले जाण्याची शक्यता असल्यानं विद्यार्थ्यांचं मोठे नुकसान. केंद्र सरकारने हस्तक्षेप करून योग्य मार्ग काढावा, याचिकेत विनंती.
आज सकाळी नागपूरचे शेख दंपत्ती आणि त्यांचा 12 वर्षांचा मुलगा हे तिघे मोहगाव झिलपी तलावा जवळ फिरायला गेले होते. वडील अब्दुल शेख (35 वर्ष) आणि मुलगा शबील शेख (12वर्ष) पाण्यात उतरले.. तर आई ही पाण्यात उतरण्याच्या तयारीत असताना वडील आणि मुलगा दोघे बुडू लागले. आईने आरडा ओरडा करत पाण्यात धाव घेत त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र दोघांना वाचवण्यात यश आले नाही.
तिसऱ्या लाटेत लहान बालकं बाधित होण्याची मोठी शक्यता आहे, मात्र, राज्य सरकारने यासंदर्भात कोणतीच पावलं उचललेली दिसत नाहीत. महाराष्ट्रात यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन समितीची कोणतीच बैठक अद्यापपर्यंत झाली नाही. या समितीतील सदस्यांची नावं सरकारनं जाहीर करावी. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलीय. प्रत्येक रुग्णालय आणि डॉक्टरांना कोविड रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी द्यावी. अशा उपचारांसाठी सक्ती करावी. कोविड रुग्णांवर उपचारांसाठी सर्व डॉक्टर आणि दवाखान्यांवर सक्ती करावी. सोबतच कोविड केअर सेंटर ही संकल्पना मोडीत काढत प्रत्येक रूग्णालयात कोविडवर उपचार व्हावेत असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
केंद्र सरकारने खतांची दरवाढ कमी करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.
गोव्यातील कोरोना परिस्थितीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल याचिकेवर सुनावणी सुरू. साऊथ गोवा अँडव्हकेट्स असोसिएशन (एसजीएए)च्यावतीनं दाखल याचिका. जस्टिस एसएस सोनाक आणि जस्टिस एम.एस. जवळकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू. गोवा सरकार आणि केेंद्र सरकार गोव्यातील परिस्थितीवर हायकोर्टात मांडणार बाजू
बारामती : बारामती तालुक्यात गेल्या चार दिवसापासून लसीकरण बंद आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद ठेवण्यात आलं आहे. शुक्रवार, शनिवार, रविवारी बंद होती. आणि आज देखील लसीकरण केंद्र बंद असणार आहेत. बारामती शहरासह तालुक्यात 36 लसीकरण केंद्र आहेत. लसीचा पुरवठा व्यवस्थित झाला तर दररोज तालुक्यात सुमारे साडे चार ते पाच हजार नागरिकांना लस दिली जाते. परंतु गेल्या 4 दिवसांपासून लस उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे यांनी दिली.
मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. पुणे शहरातील मार्केटयार्डमध्ये पुणे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. याठिकाणाहून नियम न पाळणाऱ्या नागरिकांकडून आतापर्यंत 3 लाखाचा दंड वसूल करण्यात आला आहे. मास्क न वापरणाऱ्या नागरिक आणि व्यापारीकडून हा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे याठिकाणी येणारे शेतकरी आणि व्यापारी हे कोरोनाच्या अनुषंगाने घालून देण्यात आलेले नियम पाळताना दिसत आहेत. त्याचाच परिणाम म्हणजे पुण्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. अशाचप्रकारे जर रुग्णसंख्या कमी होत राहिली तर लवकरच कोरोनावर यश मिळवता येईल.
लढवय्ये नेते प्रा. एन.डी. पाटील सरांनी 92 व्या वर्षी कोरोनावर मात केली आहे. एन डी पाटील यांच्यावर 10 ते 12 दिवस खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. खबरदारी म्हणून कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. महत्त्वाचं म्हणजे एक केअरटेकर वगळता कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आलेला नाही. आता त्यांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान लग्नाच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी सुखरुप घरी परतल्याने आनंद झाल्याची प्रतिक्रिया त्यांच्या पत्नी सरोज पाटील यांनी दिली.
काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घराच्या बाहेर पेंडालमध्ये ठेवण्यात आलं आहे. समर्थकांकडून राजीव भाऊ अमर रहे, राजीव भाऊ अमर रहे, असे नारे दिले जात आहेत. राजीव सातव यांचं पार्थिव सकाळी दहापर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
लढवय्ये नेते प्रा. एन.डी. पाटील सरांनी 92 व्या वर्षी कोरोनावर मात केली आहे. गेली 10 ते 12 दिवस त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. लग्नाच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी सुखरूप घरी परतल्याने आनंद झाल्याचं सरोज पाटील ( माई) यांनी सांगितलं. प्रा. एन.डी. पाटील सरांनी खबरदारी म्हणून कोरोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
नाशिक : नाशिकच्या सिडको परिसरात वाहनांची तोडफोड करण्यात आली असून रात्री उशिरा वाहन फोडली आली आहेत. 6 ते 7 चारचाकी वाहानांची तोडफोड करण्यात आली. नाशिकच्या लेखानगर परिसरातील सुंदरबन कॉलनीत घटना घडली असून टोळक्याचा धुडगूस सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे. तसेच संशयित आरोपींचा शोध सध्या सुरु आहे.
वसई-विरार : आज सोमवार 17 मे रोजी वसई-विरार महापालिका क्षेत्रातील लसीकरण पूर्णत: बंद असणार आहे. अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे वाहणारे वारे आणि जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. लसीकरणासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे अहवानही पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Corona Update : दिलासा...! राज्यात काल (रविवारी) 59,318 रुग्णांना डिस्चार्ज, तर 34,389 नवीन रुग्णांचे निदान
राज्यात लॉकडाऊनचा परिणाम आता दिसायला लागला असून दिवसेंदिवस कोरोनाचा आलोख उतरणीला लागला आहे. राज्यात आजही नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज तब्बल 59 हजार 318 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर आज नवीन 34 हजार 389 कोरोना रुग्णांची नोंद झाली. दरम्यान आज 974 कोरोना रुग्णांची मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
आजपर्यंत 48,26,371 कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 4 लाख 68 हजार 109 सक्रीय रुग्ण आहेत.
फॅमिली डॉक्टरांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भयंकर रुप धारण केलं आहे. त्यामुळे ही लढाई आता मोठी झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता फॅमिली डॉक्टरांना आवाहन केले आहे. कोविड विरुध्दची लढाई लढण्यासाठी "माझा डॉक्टर" म्हणून ज्यांची ओळख आहे, त्या फॅमिली डॉक्टरांनी शासनासोबत यावे, कुटुंब प्रमुख म्हणून मी आज आपल्याला साद घालत आहे. या डॉक्टरांनी गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या उपचाराचे शिवधनुष्य उचलावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले, की आपल्या सगळ्यांना माहित आहे की जगभरात प्रत्येक घराचा एक स्वत:चा कुटुंबाचा डॉक्टर असतो. आपल्याला आपल्या त्या माझ्या डॉक्टरवर म्हणजे आपल्या फॅमिली डॉक्टरवर खुप विश्वास असतो. या डॉक्टरांनाही कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची, त्याच्या प्रकृतीची संपूर्ण माहिती असते, घरातल्या लोकांचे आजार माहित असतात.
Tauktae Cyclone : तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा; केरळ, कर्नाटक, गोव्यानंतर चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू
रविवारी केरळ, कर्नाटक आणि गोवा किनारपट्टी भागात तडाखा बसल्यानंतर आता तोक्ते चक्रीवादळ उत्तरेकडे गुजरातच्या दिशेने सरकत आहे. वाटेत महाराष्ट्रातील किनारपट्टी भागातही याचा परिणाम जाणवणार आहे. चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात वेगवान वाऱ्यायासह जोरदार पाऊस बरसला. या दरम्यान समुद्रामध्ये उंच लाटा उसळल्या होत्या. चक्रीवादळामुळे झालेल्या विविध घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला तर शेकडो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. तर अनेक ठिकाणी विजेचे खांब व झाडे उन्मळून पडली आहेत. अनेकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जावे लागले. अनेक भागात वीजपुरवठा देखील खंडित झाला होता.
भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवलेल्या अंदाजानुसार, चक्रीवादळ तोक्ते येत्या 24 तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत ते गुजरातच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. मंगळवारी पहाटेपर्यंत भावनगर जिल्ह्यातील पोरबंदर आणि महुवा दरम्यान किनाऱ्ययावर येण्याची शक्यता असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. गुजरातमधील सखल भागातील सुमारे सव्वा लाख लोकांना हलवण्यात आले आहे. तर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद बल (एसडीआरएफ) ची 54 पथके तैनात करण्यात आली आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -