Breaking News LIVE :चंद्रपूर महानगरपालिकेच्या आमसभेत अभूतपूर्व गोंधळ

Breaking News LIVE Updates, 29 July 2021: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Jul 2021 03:15 PM
चंद्रपूर महानगरपालिकेच्या आमसभेत अभूतपूर्व गोंधळ

चंद्रपूर महानगरपालिकेच्या आमसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला आहे. काँग्रेस-भाजप नगरसेवक एकमेकांना भिडले असून महापौर यांनी काँग्रेस नगरसेवकांना फेकून मारली स्वतः ची नेमप्लेट मारली आहे.  मनपाच्या 200 कोटी अंकेक्षण अहवाल आक्षेप व अन्य विषयावर सत्ताधारी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला.  दोन्ही गटांमध्ये महापौर टेबल समोर झाली धक्काबुक्की झाली. काँग्रेस नगरसेवक नागरकर यांनी महापौर यांच्यासमोरील टेबल ठोकल्याने  वाद वाढला. महापौरांनी विरोधी सदस्यांनी सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी प्रशासनाला कारवाईचे निर्देश  दिले

कळणे मायनिंग परिसरातील डोंगराचा काही भाग खचला, आठ घरांचे किरकोळ नुकसान

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील कळणे मायनिंग परिसरातील डोंगराचा काही भाग खचला आणि भूस्खलन होऊन डोंगराचा काही भाग खाणीत कोसळला. त्यामुळे खाणीतील पाणी व चिखल युक्त माती परिसरातील शेती, लोकवस्तीत आलं. रस्त्यावर चिखल आल्यामुळे कळणे-तळकट मार्ग तूर्तास बंद करण्यात आला आहे. कळणे मायनिंग परिसरात मातीचा काही भाग खचल्यामुळे या ठिकाणच्या 8 ते 10 घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे. यात एका घराची भिंत कोसळली आहे. तर रस्त्यावर चिखल व शेतीत चिखलाचं साम्राज्य पसरला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात दिल्ली दौ-यावर 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात दिल्ली दौऱ्यावर, 


तब्बल चार दिवस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील दिल्लीत असणार,


7, 8, 9, 10 ऑगस्ट असा सलग चार दिवस दिल्ली कार्यक्रम,


नव्या मंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि इतर संघटनात्मक भेटींसाठी दिल्लीत,


दिल्ली दौऱ्यात महाराष्ट्राच्या दृष्टीने काही संघटनात्मक बदलांवर चर्चा होणार का याची उत्सुकता,


या दौऱ्यात चंद्रशेखर बावनकुळे, जयकुमार रावल  सोबत असणार आहेत,

किरीट सोमय्या यांच्या विरोधात 100 कोटींचा दावा, प्रताप सरनाईक यांनी ठाणे कोर्टात दाखल केला विशेष दिवाणी दावा

खोटे आरोप केल्याचं सांगत करणाऱ्या किरीट सोमय्या यांच्या विरोधात 100 कोटींचा दावा दाखल,


शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे कोर्टात दाखल केला विशेष दिवाणी दावा,


किरीट सोमय्या यांनी खोट्या विधानांबाबत माफी न मागितल्यास त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असे आमदार सरनाईक यांनी जाहीर केले होते,


त्यानुसार किरीट सोमय्या यांच्या विरोधात , ठाणे कोर्टात १०० कोटींचा विशेष दिवाणी दावा आमदार प्रताप सरनाईक यांनी दाखल केला आहे. ,


रीतसर प्रक्रिया करून हा दावा नुकताच दाखल केला गेला असून सोमय्या यांना आता त्यांनी केलेल्या निराधार आरोपांबाबत कोर्टात उत्तर द्यावे लागणार आहे

प्रताप सरनाईकांचा किरीट सोमय्यांच्या विरोधात 100 कोटींचा दावा दाखल

प्रताप सरनाईकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांच्या विरोधात 100 कोटींचा दावा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे कोर्टात विशेष दिवाणी दावा केला आहे. किरीट सोमय्या यांनी खोट्या विधानांबाबत माफी न मागितल्यास त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असे आमदार सरनाईक यांनी जाहीर केले होते. त्यानुसार किरीट सोमय्या यांच्या विरोधात ठाणे कोर्टात 100 कोटींचा विशेष दिवाणी दावा दाखल केला आहे. 

आज मुख्यमंत्री यांच्या उपस्थित टास्क फोर्सची बैठक,  कोविड संदर्भात राज्यभरातील आढावा, निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात चर्चा होणार

आज मुख्यमंत्री यांच्या उपस्थित टास्क फोर्सची बैठक,  कोविड संदर्भात राज्यभरातील आढावा, निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात चर्चा होणार

सरकारला संसद चालू द्यायचं नाही, गोंधळात विधेयकं मंजूर करायची आहेत: संजय राऊत 

केंद्र सरकारला संसद चालवू द्यायचं नाही, सरकारला गोंधळ निर्माण करायचाय आणि विधेयक संमत करायची आहेत असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पेगॅसिसवर सत्य ऐकण्याची भिती सरकारला वाटतेय असं सांगत पेगॅसिस चर्चेवर मोदींनी, अमित शाहांनी संसदेत उपस्थित रहावं असं आव्हानही संजय राऊत यांनी दिलं आहे. 

नाशिक शहरात तरुणाची हत्या

नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने चांगलंच डोकं वर काढलं असतांनाच सिडको परिसरात काल रात्री 10 वाजेच्या सुमारास प्रसाद भालेराव या तरुणाची किरकोळ वादातून डोक्यात दगड घालत निघृणपणे हत्या करण्यात आलीय. वेळेच बंधन असतांनाही उशिरापर्यंत सुरु असलेल्या सोनाली मटण भाकरी हॉटेलमध्ये प्रसाद जेवणासाठी आला असता त्याचे काही तरुणांसोबत वाद झाले आणि या वादातून हॉटेल समोरच प्रसादला मारहाण करून डोक्यात दगड घालत आरोपी फरार झाले, प्रसादला जिल्हा रुग्णालयात दाखल करताच उपचारा दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करतायत.

कोयना धरणातून पन्नास हजारांचा विसर्ग करण्याचे नियोजन  

सध्या कोयना धरणात पाणी साठा 90 टीएमसी असून (87 टक्के) धरणातून 30 हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात येतंय. पुढील आठवड्यात मोठ्या पावसाचा अंदाज असून धरणातून पाणी विसर्ग थोडासा वाढवून पाणी साठा कमी केल्यास मोठ्या पावसाच्या कालावधीत विसर्ग नियंत्रित ठेवतां येईल. त्यामुळे कोयनेतून पन्नास हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्याचे नियोजन असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. 


 

कोणवासियांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु, बुलढाण्यातून शिवसैनिकांनी पाठवली मदत

बुलढाणा : मागील एका आठवड्यापासून कोकण परिसरात पावसाने थैमान घातले आहे. पावसाच्या या थैमानामुळे कोकण येथील महाड, चिपळूण, खेड, सुतारवाडी, तळीये, पोलादपूर आदी ठिकाणी महापूराची परिस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूणमध्ये तर सातत्याने ढगफूटी सारखा पाउस झाल्याने सर्व सामान्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पावसातच दरड कोसळत असल्याने अनेकजन मृत्यूमुखी पडली आहेत. नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या परिसरात पाहणी दौरा देखील केला.  त्यानंतर त्‍यांनी या ठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना  मदत पाठविण्याचे आवाहन केले. या आवाहानाला प्रतिसाद देत बुलढाणा जिल्हा शिवसेनेने बुलडाणा येथून तब्बल 4122 किलो धान्य, कपडे, औषधं कोकणात पाठवली आहेत. 

पार्श्वभूमी

परमबीर सिंह यांना ॲट्रॉसिटी तर रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणी अटकेपासून 6 ऑगस्टपर्यंत दिलासा


मुंबई : परमबीर सिंह इतरांवर आरोप करून कारवाईपासून स्वतः लांब राहत आहेत. संजय पांडे यांनी परमबीर सिंह यांच्या चौकशीस नकार दिला असला तरी नव्या अधिकाऱ्यांमार्फत या प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी कितीही ठरवले तरी ते चौकशी टाळू शकत नाहीत आणि कायद्यापेक्षा कुणीही मोठ नाही, असा दावा राज्य सरकारनं बुधवारी हायकोर्टात केला.


कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप, एकापाठोपाठ दाखल होणारे गुन्हे रद्द करण्यासाठी परमबीर सिंह यांनी हायकोर्टात विविध याचिका दाखल केल्या आहेत. अशाच एका प्रकरणात निलंबन रद्द करण्यासाठी परमबीर यांनी दोन कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप पोलीस निरिक्षक अनुप डांगे यांनीही केला आहे. याची दखल घेत राज्य सरकारने परमबीर यांची एसीबीमार्फत प्राथमिक चौकशी करण्याचा निर्णय घेतला. ही चौकशी टाळण्यासाठी परमबीर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी राज्य सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ दरायस खंबाटा यांनी कोर्टाला सांगितले की, परमबीर यांनी आपली तक्रार केंद्रीय प्रशासकीय लवादासमोर (कॅट) मांडायला हवी होती, पण त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली. त्यांच्या या याचिकेत तथ्य नाही त्यामुळे ती फेटाळून लावावी.


परमबीर यांच्यावतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला की, "त्या पत्रानंतर केवळ राज्य सरकारने सूड उगवण्यासाठीच प्राथमिक चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर डिजीपी संजय पांडे यांच्यावतीने ज्येष्ठ वकील नवरोज सिरवई यांनीही बाजू मांडताना परमबीर यांच्या याचिकेला विरोध केला आणि त्यांची याचिका प्रशासकीय सेवेशी निगडित असल्याने उच्च न्यायालयाने ती फेटाळून लावावी अशी मागणी केली. दरम्यान राज्य सरकारच्यावतीने अॅड. जयेश याग्निक यांनी या दोन्ही प्रकरणाच्या चौकशीचा सीलबंद अहवाल खंडपीठासमोर सादर केला. न्यायालयाने याची दखल घेत याप्रकरणावरील निकाल राखून ठेवला आहे. 


लाखोंचे प्राण वाचवणारे स्वतः मात्र असुरक्षित; टीडीआरएफ जवान अजूनही कंत्राटी कर्मचारीच


ठाणे : टीडीआरएफ, म्हणजेच ठाणे आपत्ती प्रतिसाद दल! महाडच्या तळीये दुर्घटनमुळे हे दल सर्वांच्या नजरेस आलं. एनडीआरएफपेक्षा 2 दिवस आधी जाऊन, सोबत कोणतीही साधनं नसताना, मोठमोठ्या मशीन नसताना यांनी भर पावसात, चिखलात काम केलं, पण त्यांच्या स्वतःच्या जीवाला काही झालं तर त्यांचे कुटुंब वाऱ्यावर सोडले जाईल. कारण शेकडो जणांचे प्राण वाचवणाऱ्या या जवानांना कायमस्वरूपी नोकरी नाही. कंत्राटी पध्दतीने ते काम करतात. त्यांना न्याय कधी मिळणार?


कोकणातील महाड येथील तळीये गावावर दरड रूपात साक्षात मृत्यूनं घाला केला. गावाकडे जाणारे सर्व रस्ते बंद झाले. वीज नसल्याने मोबाईल फोन बंद होते. दुर्घटना होऊन पंधरा तासानंतर देखील मदत कार्य पोहचले नाही. अशा परिस्थितीत ठाण्यातील देवदूत त्या ठिकाणी पोहोचले. ते होते ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान. जिथे एनडीआरएफ देखील पोहोचू शकली नाही त्या ठिकाणी हे जवान देवदुतासारखे पोहोचले. 


मात्र ही त्यांची पहिली वेळ नाही, महालक्ष्मी एक्सप्रेस दुर्घटना, महाड आणि भिवंडीतील इमारत कोसळण्याची दुर्घटना, ठाणे, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ अशा विविध शहरात आलेले पूर, या सर्व ठिकाणी टीडीआरएफ जवानांनी अतुलनीय मेहनत करून शेकडो जणांचे प्राण वाचवले आहेत. मात्र हेच जोखमीचं काम करत असताना त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याची जबाबदारी घेण्यासाठी मात्र कोणी नाही. कारण टीडीआरएफचे संपूर्ण पथक हे कंत्राटी पद्धतीवर कामावर ठेवण्यात आलं आहे. 2018 पासून हे जवान आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. पण त्यांच्या जिवाची जबाबदारी घ्यायला तरतुदच करण्यात आलेले नाही आणि हे ठाणे महानगरपालिकेनं देखील मान्य केलं आहे. ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी एबीपी माझाला अशी माहिती दिली. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.