एक्स्प्लोर

शिवसेनेसोबत युतीबाबत काय सुरु आहे भाजपात?

लोकसभा निवडणुकीच्या अभूतपूर्व यशानंतर 'अब की बार 220 पार' चा नारा देणाऱ्या भाजपची युतिबाबत संभ्रमावस्था असल्याचं बोललं जातं आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची मनधरणी करुन युतीत लढलेल्या भाजपला आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची गरज आहे का असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातो आहे. याचं कारण आहे विधानसभेचा जागावाटपाच्या 50 - 50 चा फॉर्म्युला. सध्या भाजपचे 122 तर सेनेचे 63 आमदार आहेत. घटकपक्षांना 20 जागा सोडून 135-135 जागा शिल्लक राहतात. यंदाच्या विधानसभेत भाजपच्या पारड्यात फक्त 13 जागांची भर पडते आहे, तर शिवसेनेच्या वाट्याला तब्बल 72 जागा वाढत आहेत. अशा परिस्थितीत भाजपला युतीचा मोठा फटका बसतो आहे हे सांगायला कुठल्या राजकीय पंडिताची गरज नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या अभूतपूर्व यशानंतर 'अब की बार 220 पार' चा नारा देणाऱ्या भाजपची युतिबाबत संभ्रमावस्था असल्याचं बोललं जातं आहे. यासाठीच कालच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणूक युतीतच लढणार असल्याचं स्पष्ट केलं, मात्र मुख्यमंत्री मीच होणार असल्याचंही ठणकावून सांगितलं. याखेरीज नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही 288 जागांवर ताकदीने काम करून गरज पडेल तिथे मित्रपक्षांना मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर प्रदेश प्रभारी सरोज पांडे यांनी मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित करून शिवसेनेचे दावे उडवून लावले. शिवसेना-भाजपचा जागावाटपाचा फॉर्म्युला अजून ठरला नाही : चंद्रकांत पाटील एकीकडे शिवसेनेकडून 50-50 टक्क्यांच्या फॉर्म्युल्यावर दावा केला जात आहे. मात्र युतीचा कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याचं भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. भाजप-शिवसेनेची ज्या जागांवर सत्ता आहे, त्या जागा त्याच पक्षांनी लढवल्या पाहिजेत असं साधारण सूत्र असायला हवं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. भाजपने लोकसभेत 7 जागांवर उमेदवार बदलले, त्यावेळी आम्हाला वेड्यात काढण्यात आलं, मात्र आम्ही त्याठिकाणी यशस्वी झालो, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. त्याप्रमाणे विधानसभेतही काही जागांवर उमेदवार बदलले गेल्यास हरकत नाही. मात्र ज्याठिकाणी शिवसेना-भाजपची सत्ता आहे, तिथे एकमेकांच्या जागांवर दावा न सांगितल्यास युतीतले बरेच प्रश्न सुटतील, असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदाचा कुठलाही वाद नाही, शिवसेना-भाजप म्हणजे जुळे भाऊ : संजय राऊत जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत. शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपासंदर्भात कोणताही तिढा नाही आणि मुख्यमंत्री पदासाठी कुठलाही वाद नाही. आम्ही जुळ्या भावाप्रमाणे काम करतोय, असे प्रतिपादन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांचं भविष्य, मुख्यमंत्रिपद, जागावाटप यासह विविध विषयांवर संवाद साधला. मी फक्त भाजपचाच नाही तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस एकट्या भाजपचाच नाही तर मी शिवसेनेचाही मुख्यमंत्री आहे, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. भाजप कार्यकारिणीच्या मुंबईत आयोजित बैठकीत देवेंद्र फडणवीस बोलत होते. फडणवीस यांनी कोणत्याही पदावरुन शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात वाद नसल्याचा दावा देखील केला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाच्या वादात आपल्याला पडण्याचे कोणतेही कारण नाही. मुख्यमंत्री हा जनता निवडत असते. आपल्या मित्रपक्षांकडे खुमखुमी असणाऱ्या लोकांची कमी नाही. तरीदेखील मीच पुढचा मुख्यमंत्री असेन. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मी आधीच सांगितलंय की, 'मी पुन्हा येईन, मग तुम्ही काळजी कशाला करता? मी केवळ भाजपचा मुख्यमंत्री नाही, शिवसेनेचाही मुख्यमंत्री मीच आहे. आरपीआय, रासप आणि शिवसंग्रामसह सर्व मित्रपक्षांचा मुख्यमंत्रीदेखील मीच आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: भूकंपानं महाराष्ट्र हादरला; हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात मध्यरात्री भूकंपाचे धक्के
Maharashtra Breaking LIVE: भूकंपानं महाराष्ट्र हादरला; हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात मध्यरात्री भूकंपाचे धक्के
मोठी बातमी! समान नागरी कायदा लवकरच विधिमंडळात; 7 जणांची समिती गठीत, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
मोठी बातमी! समान नागरी कायदा लवकरच विधिमंडळात; 7 जणांची समिती गठीत, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध?? केंद्राने नेमलेल्या 15 पैकी 12 ट्रस्टी RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित, बाकी कोणीच नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल
राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध?? केंद्राने नेमलेल्या 15 पैकी 12 ट्रस्टी RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित, बाकी कोणीच नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल
Ram Kadam on Raj Thackeray: राज ठाकरेंनी मिसिंग लिंकवरुन देवेंद्र फडणवीसांना फटकारताच राम कदमांचा पलटवार, म्हणाले, 'हिंदीत बोललं तर काय झालं?'
राज ठाकरेंनी मिसिंग लिंकवरुन देवेंद्र फडणवीसांना फटकारताच राम कदमांचा पलटवार, म्हणाले, 'हिंदीत बोललं तर काय झालं?'

व्हिडीओ

Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Omraje Nimbalkar: धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या राजकारणाला 'उजवं' वळण, संघाच्या नेत्यांच्या भेटीगाठी पण राणा जगजितसिंहांना विरोधच
धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या राजकारणाला 'उजवं' वळण, संघाच्या नेत्यांच्या भेटीगाठी पण राणा जगजितसिंहांना विरोधच
राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध?? केंद्राने नेमलेल्या 15 पैकी 12 ट्रस्टी RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित, बाकी कोणीच नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल
राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध?? केंद्राने नेमलेल्या 15 पैकी 12 ट्रस्टी RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित, बाकी कोणीच नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल
मोठी बातमी! समान नागरी कायदा लवकरच विधिमंडळात; 7 जणांची समिती गठीत, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
मोठी बातमी! समान नागरी कायदा लवकरच विधिमंडळात; 7 जणांची समिती गठीत, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
Sairat Fame Actor Arbaaz Sheikh Tukaram Munde Action: FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापूरच्या रुग्णालयातील मेडिकल दुकान बंद; अभिनेता सल्ल्या म्हणाला, 'माझ्यासाठी विषय संपला'
FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापूरच्या रुग्णालयातील मेडिकल दुकान बंद; अभिनेता सल्ल्या म्हणाला, 'माझ्यासाठी विषय संपला'
बीडमध्ये ऊसतोड कामगाराला अमानुष मारहाण; अपहरण करुन 4 दिवस छळ, तोंडात लघुशंका केल्याचाही आरोप
बीडमध्ये ऊसतोड कामगाराला अमानुष मारहाण; अपहरण करुन 4 दिवस छळ, तोंडात लघुशंका केल्याचाही आरोप
Trinamool Congress: सत्ता गेली, आमदार खासदार फुटले, आता ईडीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तीन खात्यांमधील तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली
सत्ता गेली, आमदार खासदार फुटले, आता ईडीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तीन खात्यांमधील तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली
'कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशन आणि 'पे सीएम' च्या एका घोषणेवर गेलं, महाराष्ट्रात त्यापेक्षाही भयानक परिस्थिती..' मिसिंग लिंक अन् सीएम फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर पृथ्वीराज बाबा काय काय म्हणाले?
'कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशन आणि 'पे सीएम' च्या एका घोषणेवर गेलं, महाराष्ट्रात त्यापेक्षाही भयानक परिस्थिती..' मिसिंग लिंक अन् सीएम फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर पृथ्वीराज बाबा काय काय म्हणाले?
Embed widget