एक्स्प्लोर

शिवसेनेसोबत युतीबाबत काय सुरु आहे भाजपात?

लोकसभा निवडणुकीच्या अभूतपूर्व यशानंतर 'अब की बार 220 पार' चा नारा देणाऱ्या भाजपची युतिबाबत संभ्रमावस्था असल्याचं बोललं जातं आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची मनधरणी करुन युतीत लढलेल्या भाजपला आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची गरज आहे का असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातो आहे. याचं कारण आहे विधानसभेचा जागावाटपाच्या 50 - 50 चा फॉर्म्युला. सध्या भाजपचे 122 तर सेनेचे 63 आमदार आहेत. घटकपक्षांना 20 जागा सोडून 135-135 जागा शिल्लक राहतात. यंदाच्या विधानसभेत भाजपच्या पारड्यात फक्त 13 जागांची भर पडते आहे, तर शिवसेनेच्या वाट्याला तब्बल 72 जागा वाढत आहेत. अशा परिस्थितीत भाजपला युतीचा मोठा फटका बसतो आहे हे सांगायला कुठल्या राजकीय पंडिताची गरज नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या अभूतपूर्व यशानंतर 'अब की बार 220 पार' चा नारा देणाऱ्या भाजपची युतिबाबत संभ्रमावस्था असल्याचं बोललं जातं आहे. यासाठीच कालच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणूक युतीतच लढणार असल्याचं स्पष्ट केलं, मात्र मुख्यमंत्री मीच होणार असल्याचंही ठणकावून सांगितलं. याखेरीज नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही 288 जागांवर ताकदीने काम करून गरज पडेल तिथे मित्रपक्षांना मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर प्रदेश प्रभारी सरोज पांडे यांनी मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित करून शिवसेनेचे दावे उडवून लावले. शिवसेना-भाजपचा जागावाटपाचा फॉर्म्युला अजून ठरला नाही : चंद्रकांत पाटील एकीकडे शिवसेनेकडून 50-50 टक्क्यांच्या फॉर्म्युल्यावर दावा केला जात आहे. मात्र युतीचा कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याचं भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. भाजप-शिवसेनेची ज्या जागांवर सत्ता आहे, त्या जागा त्याच पक्षांनी लढवल्या पाहिजेत असं साधारण सूत्र असायला हवं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. भाजपने लोकसभेत 7 जागांवर उमेदवार बदलले, त्यावेळी आम्हाला वेड्यात काढण्यात आलं, मात्र आम्ही त्याठिकाणी यशस्वी झालो, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. त्याप्रमाणे विधानसभेतही काही जागांवर उमेदवार बदलले गेल्यास हरकत नाही. मात्र ज्याठिकाणी शिवसेना-भाजपची सत्ता आहे, तिथे एकमेकांच्या जागांवर दावा न सांगितल्यास युतीतले बरेच प्रश्न सुटतील, असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदाचा कुठलाही वाद नाही, शिवसेना-भाजप म्हणजे जुळे भाऊ : संजय राऊत जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत. शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपासंदर्भात कोणताही तिढा नाही आणि मुख्यमंत्री पदासाठी कुठलाही वाद नाही. आम्ही जुळ्या भावाप्रमाणे काम करतोय, असे प्रतिपादन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांचं भविष्य, मुख्यमंत्रिपद, जागावाटप यासह विविध विषयांवर संवाद साधला. मी फक्त भाजपचाच नाही तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस एकट्या भाजपचाच नाही तर मी शिवसेनेचाही मुख्यमंत्री आहे, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. भाजप कार्यकारिणीच्या मुंबईत आयोजित बैठकीत देवेंद्र फडणवीस बोलत होते. फडणवीस यांनी कोणत्याही पदावरुन शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात वाद नसल्याचा दावा देखील केला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाच्या वादात आपल्याला पडण्याचे कोणतेही कारण नाही. मुख्यमंत्री हा जनता निवडत असते. आपल्या मित्रपक्षांकडे खुमखुमी असणाऱ्या लोकांची कमी नाही. तरीदेखील मीच पुढचा मुख्यमंत्री असेन. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मी आधीच सांगितलंय की, 'मी पुन्हा येईन, मग तुम्ही काळजी कशाला करता? मी केवळ भाजपचा मुख्यमंत्री नाही, शिवसेनेचाही मुख्यमंत्री मीच आहे. आरपीआय, रासप आणि शिवसंग्रामसह सर्व मित्रपक्षांचा मुख्यमंत्रीदेखील मीच आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गॅस टंचाईवर मात! भंडाऱ्यातील रेंगेपार कोहळी' गाव ठरलं आदर्श, बायोगॅसच्या मदतीनं भागवली ऊर्जेची गरज 
गॅस टंचाईवर मात! भंडाऱ्यातील रेंगेपार कोहळी' गाव ठरलं आदर्श, बायोगॅसच्या मदतीनं भागवली ऊर्जेची गरज 
महाराष्ट्रात शासकीय नोकरीची मोठी संधी, 571 पदांसाठी मोठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
महाराष्ट्रात शासकीय नोकरीची मोठी संधी, 571 पदांसाठी मोठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
पेट्रोलसाठी बुलढाणा आणि परभणीत हाहाकार! 2 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, अनेक पेट्रोल पंप बंद असल्यानं नागरिकांची तारांबळ
पेट्रोलसाठी बुलढाणा आणि परभणीत हाहाकार! 2 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, अनेक पेट्रोल पंप बंद असल्यानं नागरिकांची तारांबळ
सप्तशृंगी गडाकडे पायी चालणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कारने चिरडल्याने महिला ठार, दोन भाविक जखमी
सप्तशृंगी गडाकडे पायी चालणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कारने चिरडल्याने महिला ठार, दोन भाविक जखमी

व्हिडीओ

Vavi Villegers On Ashok kharat : अशोक खरातचे झोल, ग्रामस्थांकडून पोलखोल Special Report
Iran VS US Israel Conflict : नवी आवई, युद्ध नव्हे कारवाई Special Report
Sushma Andhare Vs Sheetal Mhatre : फार्म हाऊसला पाणी, राजकीय उणीदुणी Special Report
Ashok Kharat Cheat Businessman : खरात भुकेला, कुबेर भिकेला; क्राईम फाईल्सचा नव अंक Special Report
Rohit Pawar On Sunil Tatkare :तटकरे-पटेलांनी आयोगाला पत्र देऊन पक्ष काबीज करण्याचा प्रयत्न केला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local : पंजाब एक्सप्रेसच्या धडकेत एकाचा मृत्यू, टिटवाळा-कल्याण मार्गावर लोकल सेवा दीड तास विस्कळीत
पंजाब एक्सप्रेसच्या धडकेत एकाचा मृत्यू, टिटवाळा-कल्याण मार्गावर लोकल सेवा दीड तास विस्कळीत
Rinku Singh: उत्तर प्रदेशात रिंकू सिंहला स्पेशल गिफ्ट पण ते स्वीकारण्यासाठी गेलाच नाही! कार्यक्रमात तोच धागा पकडत सीएम योगी नेमकं काय म्हणाले?
उत्तर प्रदेशात रिंकू सिंहला स्पेशल गिफ्ट पण ते स्वीकारण्यासाठी गेलाच नाही! कार्यक्रमात तोच धागा पकडत सीएम योगी नेमकं काय म्हणाले?
सप्तशृंगी गडाकडे पायी चालणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कारने चिरडल्याने महिला ठार, दोन भाविक जखमी
सप्तशृंगी गडाकडे पायी चालणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कारने चिरडल्याने महिला ठार, दोन भाविक जखमी
पेट्रोल खरेदीवर 200 रुपयांची मर्यादा नाही, सरकारचं स्पष्टीकरण; कलेक्टर म्हणाले, अफवा पसरवू नका
पेट्रोल खरेदीवर 200 रुपयांची मर्यादा नाही, सरकारचं स्पष्टीकरण; कलेक्टर म्हणाले, अफवा पसरवू नका
पुण्यात महिलेवर बलात्कार, आणखी एका स्वयंघोषित गुरुविरुद्ध महिलेची तक्रार; मी शंकर तू पार्वती म्हणायचा भोंदू
पुण्यात महिलेवर बलात्कार, आणखी एका स्वयंघोषित गुरुविरुद्ध महिलेची तक्रार; मी शंकर तू पार्वती म्हणायचा भोंदू
Income Tax Update : 1 एप्रिलपासून नवे आयकर नियम लागू; PAN, ITR ते जेवणाच्या कार्डपर्यंत काय बदल? जाणून घ्या
1 एप्रिलपासून नवे आयकर नियम लागू; PAN, ITR ते जेवणाच्या कार्डपर्यंत काय बदल? जाणून घ्या
मोठी बातमी : IPL 2026 साठी दुसऱ्या सत्रातील वेळापत्रक जाहीर, 50 लढती, 12 शहरांत सामने खेळवणार!
मोठी बातमी : IPL 2026 साठी दुसऱ्या सत्रातील वेळापत्रक जाहीर, 50 लढती, 12 शहरांत सामने खेळवणार!
...तर झिरवाळांना आपण सोडायचं नाही; व्हायरल व्हिडिओवर रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं, तटकरेंनाही टोला
...तर झिरवाळांना आपण सोडायचं नाही; व्हायरल व्हिडिओवर रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं, तटकरेंनाही टोला
Embed widget