एक्स्प्लोर

'समृद्धी'च्या भूसंपादन अधिकाऱ्याकडे 100 कोटी सापडतील : भाजप आमदार

समृध्दी महामार्गाच्या भूसंपादनाचे काम करणाऱ्या उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांचे थेट नाव घेत या अधिकाऱ्यावर कारवाई केल्यास 100 कोटी रूपये पकडले जातील. त्यामुळे तातडीने गायकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कथोरे यांनी केली आहे.

ठाणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृध्दी महामार्गाच्या भूसंपादनामध्ये खऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असून बोगस शेतकऱ्यांवर नावे 29 कोटी रुपये जमा झाल्याचा गंभीर आरोप भाजपच्याच आमदाराने ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला आहे. भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांची चौकशी केल्यास 100 कोटी रुपये सापडतील, असा गौप्यस्फोट भाजप आमदार किसन कथोरे यांनी केला आहे. रेवती गायकर यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. जमीन खरेदीची संपूर्ण प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखालील 12 सदस्यीय समितीने केली असून मी फक्त त्याचा एक भाग होते. त्यामुळे मला काहीच अधिकार नसल्याचा दावा गायकर यांनी केला आहे. ठाणे जिल्ह्यातील समृद्धी महामार्गासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या भूखंड घोटाळ्याबाबत गंभीर आरोप या बैठकीत करण्यात आले. घनश्याम अग्रवाल हा शेतकरी नसल्याचा दाखला असताना देखील अधिकाऱ्यांनी संगनमत करून बोगस शेतकरी अग्रवालच्या नावे जमीन खरेदी केल्या आहेत. अग्रवालला 29 कोटी रुपयांचे पेमेंटही देण्यात आले, असे आ. कथोरे यांनी म्हटले आहे. समृध्दी महामार्गाच्या भूसंपादनाचे काम करणाऱ्या उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांचे थेट नाव घेत या अधिकाऱ्यावर कारवाई केल्यास 100 कोटी रूपये पकडले जातील. त्यामुळे तातडीने गायकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कथोरे यांनी केली आहे. शहापूर तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी समृद्धी महामार्ग जात असून समृद्धी महामार्ग बाधित झालेल्या काही शेतकऱ्यांना अजून पर्यंत त्यांच्या खात्यात मोबदला मिळालेला नाही. विशेष म्हणजे बोगस शेतकऱ्यांचा नावाखाली अधिकाऱ्यांना हाताशी धरून मूळ शेतकऱ्यांच्या खात्यात मोबदला न घेता बोगस शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत असल्याचा धक्कादायक आरोप कथोरे यांनी केला आहे. यासंदर्भात समृद्धी महामार्ग बाधित झालेल्या शेतकऱ्यांची विचारणा केली असता त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, समृद्धी महामार्ग बाधित झालेल्या मूळ शेतकरी  ज्यांच्या नावावर सातबारा आहे अशा शेतकऱ्यांकडून बिल्डर लॉबीने जमिनी कमी दरात विकत घेतल्या आहेत. या बिल्डर्सनी अशाच प्रकारे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून घेतल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा हक्क  मिळत नाही. शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्ग बाधित अनेक शेतकरी असे आहेत ज्यांच्या नावावर सातबारा तर नाही मात्र त्यांचा कब्जा  आहे. अशा शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाने सातबारा मालकाला 60 टक्के आणि कब्जाधारक शेतकऱ्याला 40 टक्के मोबदला देण्याचा ठरवलं होतं. मात्र सध्या या कब्जाधारकांना वगळून बोगस शेतकरी उभा करून जमिनीची खरेदी केली जात आहे.  त्यामुळे कब्जाधारक शेतकऱ्यांना एक दमडीही  मिळत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी समृद्धी महामार्ग होणाऱ्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Neet Paper Leak: केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
Maharashtra Live News Updates: सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे
Maharashtra Live News Updates: सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे
नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल
नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल
Sonam Wangchuk React On Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
Neet Paper Leak: केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
EPFO : पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
JP Nadda on CJP Meeting : 3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल
नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल
Pune Crime News: पुण्यात पोलिस चौकीसमोरच गोळीबार; पूर्व वैमन्यासातून तरुणावर फायरिंग, अवघ्या २० मिनिटात आरोपीला घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
पुण्यात पोलिस चौकीसमोरच गोळीबार; पूर्व वैमन्यासातून तरुणावर फायरिंग, अवघ्या २० मिनिटात आरोपीला घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
RBI : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला आरबीआयकडून 13.30 लाखांचा दंड, RBI नं सहा बँकांना ठोठावला आर्थिक दंड
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला आरबीआयकडून 13.30 लाखांचा दंड, RBI नं सहा बँकांना ठोठावला आर्थिक दंड
Sonam Wangchuk React On Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
Embed widget