एक्स्प्लोर
Advertisement
आईप्रमाणे वडिलांनाही मारुन टाकतील; अश्विनी बिद्रेंच्या मुलीचं मुख्यमंत्र्यांना पत्र
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या मृत्यूचं गुढ अजून उकललं नाही. त्यातच आता अश्विनी बिद्रे यांच्या मुलीने मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहलंय. यात माझ्या वडिलांनाही आईप्रमाणे मारुन टाकतील, अशी भीती तिने व्यक्त केलीय.
कोल्हापूर : माझ्या आईचा मृतदेह शोधून द्या, असं पत्र पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या मुलीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. आईप्रमाणे वडिलांनादेखील मारुन टाकतील अशी भीतीही मुलीने पत्रात व्यक्त केली. तसंच मागच्या मुख्यमंत्र्यांसारखे आपण वागणार नाही ना? असा प्रश्न विचारत तुमची भेट घ्यायची आहे, अशी इच्छा मुलीने व्यक्त केली आहे.
अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण काय आहे?
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे उर्फ अश्विनी राजू गोरे या नवी मुंबईतील कळंबोलीतून 15 एप्रिल 2016 पासून बेपत्ता झाल्या होत्या. अश्विनी बिद्रे गायब होण्यामागे वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांचा हात असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता. पोलीस सुरुवातीला या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप बिद्रे यांच्या कुटुंबियांनी केला होता.
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण, सरकारकडून मानधन मिळत नसल्याने सरकारी वकील खटला सोडणार
अश्विनी बिद्रे यांचा 2005 साली हातकणंगले गावातील राजू गोरे यांच्यासोबत विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात अश्विनी स्पर्धा परीक्षा पास झाल्या आणि त्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाली. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली याठिकाणी झाली. यावेळी त्यांची ओळख त्याच पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली. या दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यानंतर 2013 साली अश्विनी गोरे यांना प्रमोशन मिळाल्याने त्या रत्नागिरीला रुजू झाल्या. इथेही अभय कुरुंदकर अश्विनीला भेटण्यासाठी वारंवार येत होता. हे सर्व प्रकरण अश्विनी यांचे पती आणि वडिलांना समजलं.
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण, नवी मुंबई पोलिस सहकार्य करत नसल्याने सरकारी वकील केसमधून माघार घेणार?
यानंतर अभय कुरुंदकर आणि अश्विनीमध्ये सतत वाद होत होते. तेव्हा कुरुंदकरने अश्विनी यांना गायब करण्याच्या धमक्याही पतीला दिल्या होत्या. यामुळे अश्विनी यांचं कुटुंब व्यथित झालं होतं. या काळातच 2015 साली अश्विनी यांची बदली नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यात झाली. मात्र, त्या हजर झाल्या नाहीत. त्या हजर का झाल्या नाहीत? या आशयाचं पत्र पोलीस खात्याने पाठवलं. त्यावेळी अश्विनीच्या घरातील लोकांना त्या गायब झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी कळंबोली पोलिसात याची तक्रार दाखल केली.
Ashwini Bidre Case | आईचा मृतदेह शोधा ,वडिलांनाही मारतील मुलीला भीती,अश्विनी बिद्रेंच्या मुलीचं मुख्यमंत्र्यांना पत्र
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Blog
Advertisement