एक्स्प्लोर

Rashmi Shukla : खडसे, संजय राऊत फोनटॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांना दिलासा, खटला चालवण्यास राज्य सरकारचा नकार

Rashmi Shukla : एकनाथ खडसे आणि संजय राऊत फोन टॅपिंग प्रकरणी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना दिलासा मिळाला आहे.

Rashmi Shukla : एकनाथ खडसे आणि संजय राऊत फोन टॅपिंग प्रकरणी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना दिलासा मिळाला आहे. रश्मी शुक्ला यांच्याविरोधात खटला चालवण्यास राज्य सरकारनं नकार दिला आहे.  खटला चालवण्यास मागितलेली परवानगी गृह खात्याने नाकारलेली आहे. हा सर्व अहवाल न्यायालयात सादर केल्यानंतर ही केस बंद केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

एकनाथ खडसे आणि संजय राऊत फोनटॅपिंग प्रकरणानं राज्यात खळबळ उडाली होती. मागील काही दिवसांमध्ये रश्मी शुक्ला यांनी राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट रश्मी शुक्ला यांनी घेतली होती. रश्मी शुक्ला यांच्याविरोधात खटला चालवण्यास मागितलेली परवानगी गृह विभागाने फेटाळली आहे. हा रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा मानला जातोय.   

मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर कुलाबा पोलिस स्थानकात फोन टॅपिंग प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यासंदर्भात आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते. कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी अथवा हा खटला चालवायचा की नाही, यासाठी गृह विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. मागील वेळी याबाबत परवानगी घेतली नव्हती. पण यावेळी हे प्रकरण परवानगीसाठी गृह विभागाकडे पाठवलं होतं. गृह विभागानं ही परवानगी नाकारली आहे. पोलीस हा सर्व रिपोर्ट आता न्यायालयात सादर करणार आहेत. त्यानंतर रश्मी शुक्ला यांच्याविरोधातील आरोपपत्र अथवा खटला मागे घेण्यात येणार आहे. 

पुण्यामध्येही रश्मी शुक्ला यांच्याविरोधात पुण्यातही अशाच प्रकाराचा गुन्हा दाखल झाला आहे. तो खटलाही पुढे चालेल की नाही , याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे. की या खटल्याप्रमाणेच तो खटलाही मागे घेण्यात येणार... हे येणाऱ्या काही दिवसातच समजेल. 

मुंबई पोलिसांकडे असे काही पुरावे होते, त्यानुसार रश्मी शुक्ला यांनी परवानगीशिवाय फोन टॅपिंग केले होते. तरिही खटला थांबवण्यात आल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होतेय. त्यामुळे येणाऱ्या काळात काय घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप काय?

- रश्मी शुक्ला यांच्यावर टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल. 

- फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात.

- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत आरोप केले होते. 

- राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना डॉ. रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Mahalakshmi Race Course वर थीम पार्कचा मार्ग मोकळा,120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरीMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे ExclusiveMahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
Embed widget