एक्स्प्लोर

Raj and Uddhav Thackeray : 'राज व उद्धव साहेबांनी महाराष्ट्र हितासाठी दोन पावले पुढे टाकली असताना' इकडं एकनाथ शिंदे भलतेच चिडले, पण तिकडं केदार दिघेंच्या भूमिकेनं लक्ष वेधलं!

संजय राऊत यांनी आज बोलताना कोणत्याही अटीशर्ती नसल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी या घडामोडीवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. 

Raj and Uddhav Thackeray : महाराष्ट्रात ठाकरे बंधूंबद्दलची (Raj and Uddhav Thackeray) चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मतभेद छोटे असल्याचे सांगितल्यानंतर बंधू उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्र आणि मराठीच्या अस्तित्वाच्या तुलनेत त्यांच्या आणि उद्धव ठाकरे यांच्यातील लढाई खूपच लहान असल्याचे मनसे प्रमुखांनी म्हटले आहे. राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी 9 मार्च 2006 रोजी पक्षाची स्थापना केली होती. दरम्यान, दोन्ही बंधूनी एकमेकांना सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "जर ते एकत्र आले तर आम्हाला आनंद होईल कारण जर वेगळे झालेले लोक एकत्र आले आणि एखाद्याचा वाद संपला तर ती चांगली गोष्ट आहे, त्यात वाईट वाटण्याचे काय, पण त्यांनी ऑफर दिली आणि त्यांनी प्रतिसाद दिला याबद्दल आपण काय म्हणू शकतो?" दुसरीकडे, याच मुद्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारणा करण्यात आली असता भलतेच चिडल्याचे दिसून आले. अत्यंत रागाने अरे जाऊदे म्हणत त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. 

केदार दिघेंच्या भूमिकेनं लक्ष वेधले 

दुसरीकडे, ठाणे शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी ठाकरे बंधूच्या घडामोडींवर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, उद्धव साहेब व राज साहेब हे दोन्ही भाऊ आहेत. महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायचं झाल्यास त्याचा निर्णय हे दोन्ही बंधू घेतील.राज व उद्धव साहेबांनी महाराष्ट्र हितासाठी दोन पावले पुढे टाकलेले असताना अन्य नेत्यांनी भाजपला फायदा होईल अशी भूमिका घेऊन टीकाटिपणी करू नये. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाकडून युतीवर संयमी प्रतिक्रिया येत असताना मनसे नेत्यांकडून जुने मुद्दे समोर आणून कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज बोलताना कोणत्याही अटीशर्ती नसल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी या घडामोडीवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. 

दुसरीकडे, महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शनिवारी (19 एप्रिल) सांगितले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे राजकारण वेगळे आहे. दानवे म्हणाले की, "दोघेही भाऊ आहेत, पण त्यांचे राजकारण वेगळे आहे. जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र यायचे असेल तर त्यांना एकमेकांशी बसून चर्चा करावी लागेल. ही चर्चा टीव्हीवर नाही तर खासगीत व्हायला हवी."

राज ठाकरेंनी दिला प्रतिसाद 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी (19 एप्रिल) सांगितले की, महाराष्ट्राच्या हितासाठी जर त्यांना उद्धव ठाकरेंसोबत एकत्र यावे लागले तर ते (राज ठाकरे) त्यासाठी तयार आहेत.  

2009 मध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत 13 जागा जिंकल्या

2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिल्यांदा 13 जागा जिंकल्या. 2014 मध्ये पक्षाची जागा 1 वर आली. 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत खाते उघडले गेले नाही. 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 101 जागांवर उमेदवार उभे करण्यात आले होते पण फक्त 1उमेदवार जिंकला.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Embed widget