एक्स्प्लोर

EVM: मतदान यंत्राच्या माध्यमातून हरल्यावर EVM मुळे हरलो असं सांगण्याची एक संधी, अजित पवारांची मिश्किली

राज्यातील मतदारांना ईव्हीएमसोबतच (EVM) मतपत्रिकेचा पर्याय उपलब्ध करुन देण्याची चर्चा सरकारी पातळीवर सुरु असताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यावर मिश्किल भाष्य केलं आहे.

मुंबई: राज्य सरकारच्या वरिष्ठ पातळीवर राज्यातील मतदारांना ईव्हीएमसोबतच मतपत्रिकेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी चाचपणी सुरु असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र त्यावर मिश्किल भाष्य केलं आहे. मतदान यंत्राच्या माध्यमातून हरल्यावर EVM मुळे हरलो असं सांगण्याची एक संधी उपलब्ध असते असं अजित पवार म्हणाले.

राज्यातील मतदारांना ईव्हीएम सोबत मतपत्रिका उपलब्ध करुन देण्यासाठीच्या हालचाली सुरु आहेत का असं विचारल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, "निवडणुकीत मतपत्रिका असणे यात काही अर्थ नाही. आम्ही मतदान यंत्रणांच्या माध्यमातूनच निवडून आलो आहोत. अजूनही मत पत्रिकेचा कोणताही निर्णय झाला नाही. मतदान यंत्राच्या माध्यमातून हरल्यावर आपण EVM मुळे हरलो असं सांगण्याची एक संधी असते."

महाराष्ट्रातील मतदारांना ईव्हीएम व्यतिरिक्त मतपत्रिकेद्वारे देखील मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर चर्चा करण्यासाठी 2 फेब्रुवारी रोजी विधानसभेचे त्या वेळचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली होती.

पंतप्रधान शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भावूक झाले तर आनंद होईल: अजित पवार

स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांना ईव्हीएम व्यतिरिक्त मतपत्रिकेव्दारे देखील मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्याच्या सूचना विधानसभेचे अध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी दिल्या होत्या. त्या दृष्टीने महाराष्‍ट्र विधानमंडळाने कायदा करावा अशा प्रकारच्या सूचनाही अध्यक्षांनी दिल्या होत्या. त्यामुळे राज्य सरकार आता मतपत्रिकेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी कायदेशीर मार्गाने प्रयत्न करणार अशी चर्चा सुरु होती.

राज्य सरकारच्या पातळीवर ईव्हीएम सोबत मतपत्रिका उपलब्ध करुन देण्यासाठी चाचपणी सुरु असताना सरकारचाच एक भाग अललेल्या उपमुख्यमंत्र्यानी अशा प्रकारचे मिश्किल भाष्य केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. उपमुख्यमंत्र्याचं हे विधान भाजपच्या भूमिकेला बळ देणारं आहे का असा सवालही अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी पक्षासह सर्वच विरोधी पक्षांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित करत मतदान बॅलेट पेपरवर घ्यावं यासाठी रान उठवलं होतं. लोकसभा निवडणूक झाल्यानंतरही या पक्षाच्या अनेकांनी ईव्हीएममुळेच आपली हार झाल्याचा दावा केला होता. त्यामुळे सर्वच विरोधी पक्षाचा ईव्हीएमच्या वापराला विरोध आहे.

आता सरकारचाच भाग असलेल्या उपमुख्यमंत्र्यांनी निवडणुकीत मतपत्रिका असणे यात काही अर्थ नाही, आम्ही मतदान यंत्रणांच्या माध्यमातूनच निवडून आलो आहोत असं वक्तव्य करत ईव्हीएमवर मिश्किल भाष्य केलंय. त्यामुळे अजित पवारांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असल्याचं पहायला मिळतंय.

महाराष्ट्रातील मतदारांना आता मतत्रिकेचाही पर्याय उपलब्ध होणार? विधानसभा अध्यक्षांची कायदा करण्याची सूचना

महत्त्वाच्या बातम्या

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget