एक्स्प्लोर

Rain Update: राज्यात परतीच्या पावसाने दाणादाण! शेतकऱ्यांचं स्वप्न झालं भुईसपाट, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

राज्यातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने सर्वत्र एकच दाणादाण उडवली आहे. दरम्यान, राज्यात परतीच्या पावसाच सर्वत्र एकच थैमान घातल्याचे चित्र आहे.

Maharashtra Weather Update :राज्याच्या काही भागामध्ये सुरुवातील ऑक्टोबर हिटचा (October Heat) परिणाम जाणवू लागला होता. मात्र ऑक्टोबरच्या शेवटाला पावसाने हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत. राज्यात ढगाळ वातावरण आणि कडक ऊन्हाचा तडाखा असे वातावरण निर्माण झाल्याने दिवसभर कमालीचा उकाडा जाणवत आहे. अशातच  राज्यातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने (Rain Update) सर्वत्र एकच दाणादाण उडवली आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, पुणे, नाशिक, कोल्हापूर, परभणी, अकोला, पालघर, बुलढाणा (Buldhana) इत्यादि अनेक जिल्ह्यात देखील परतीच्या पावसाच थैमान घातल्याचे चित्र आहे. या पावसाचा सर्वअधिक फटाका फळबागांसह धानपिकाला बसला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडला आहे. या परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

 मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

राज्याच्या विविध भागात मागील काही दिवसांमध्ये परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या तसेच इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, त्याचबरोबर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यातील विविध भागांमध्ये किंवा तालुक्यांमध्ये मागील काही दिवसात मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी शेतपिकांचे नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी शेतात काढून ठेवलेल्या विविध प्रकारच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तर काढलेली पिके भिजली आहेत.

यात विशेषतः भात, सोयाबीन, तूर, कपाशी, ऊस आदी विविध प्रकारच्या पिकांसह फळबागांचेही नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत. नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पंचनामे आणि नुकसान भरपाईसाठी नुकसानग्रस्त गावांमध्ये त्वरित यंत्रणा कार्यरत करण्यात यावी. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तसेच जिल्हास्तरावरील आपत्ती व्यवस्थापन कक्ष, तालुकास्तरीय यंत्रणा, इतर सर्व संबंधित विभाग यांनी यासाठी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

शेतकऱ्यांचं स्वप्न झालं भुईसपाट

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला मध्यरात्री झालेल्या पावसानं झोडपले आहे. रात्री अकरा वाजता सुरू झालेला पाऊस पहाटे दोन वाजेपर्यंत सुरू होता. या जोरदार पावसाने शेताची तळी झाली आहेत आणि या शेततळ्यामध्ये शेतकऱ्यांची काढलेली मका बोंड फुटलेली कपाशी तुर यासह अन्य पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.परिणामी शेतकऱ्यांची सहा महिन्याची मेहनत वाया गेली आहे.

परभणीच्या येलदरीचे 10 तर लोअर दुधनाचे 6 दरवाजे उघडले 

परभणी जिल्ह्यात शनिवारच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प ओव्हर फ्लो झालेत. दरम्यान, येलदरी प्रकल्पाचे सर्व 10 दरवाजे उघडण्यात आले असुन तब्बल 29 हजार 481 क्युसेक्स वेगाने पाणी पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे पूर्णा नदी दूथडी भरून वाहत आहे. तर दुसरीकडे लोअर दुधना प्रकल्पाचे ही 6 दरवाजे उघडण्यात आले आहेत. या 6 दरवाज्यांमधून 10 हजार 20 क्युसेक्स वेगाने पाणी दुधना नदीत सोडण्यात आले असून दोन्ही प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पूर्णा आणि दुधना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Cough Syrup Death: विषारी कफ सिरपचा आणखी एक बळी, चार वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत, महिनाभर सुरु होते उपचार, नागपुरात मृतांची संख्या 18 वर
विषारी कफ सिरपचा आणखी एक बळी, चार वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत, महिनाभर सुरु होते उपचार, नागपुरात मृतांची संख्या 18 वर
RPI Leader Prakash Londhe: RPI नेता प्रकाश लोंढेच्या अनधिकृत बांधकामावर हतोडा; नाशिकमधील गुन्हेगारीवर मनपा अन् पोलिसांची संयुक्त कारवाई
RPI नेता प्रकाश लोंढेच्या अनधिकृत बांधकामावर हतोडा; नाशिकमधील गुन्हेगारीवर मनपा अन् पोलिसांची संयुक्त कारवाई
Pune : मानव-बिबट्या संघर्षावर मोठी उपाययोजना, दिवसा वीजपुरवठा, सौर कुंपण आणि AI निरीक्षण प्रणाली लागू
मानव-बिबट्या संघर्षावर मोठी उपाययोजना, दिवसा वीजपुरवठा, सौर कुंपण आणि AI निरीक्षण प्रणाली लागू
EPFO : कर्मचाऱ्यांना नोकरी जाताच 75 टक्के रक्कम काढता येणार, एका वर्षानंतर 100 टक्के रक्कम काढता येईल, ईपीएफओचं स्पष्टीकरण
कर्मचाऱ्यांना नोकरी जाताच 75 टक्के रक्कम काढता येणार, एका वर्षानंतर 100 टक्के रक्कम काढता येईल, ईपीएफओचं स्पष्टीकरण
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Operation Thunder: 'ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करणार , nagpur पोलीस आयुक्तांचा इशारा । ABP Majha
Malshiras Politics : श्रीपूरमध्ये राजकीय वैर संपले? मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात कट्टर विरोधक एकाच मंचावर!
Stray Dogs Pune : 'पुणे Mahapalika कडून भटक्या कुत्र्यांना मायक्रोचिप बसवण्याची सुरुवात
Devendra Fadanavis :'Solapur मध्ये पाऊस सरकारने आणला', Praniti Shinde वर फडवीसांची टीका
Thackeray Alliance: 'आता आम्ही एकत्र, आमच्यामध्ये कुणी येणार नाही'; Uddhav Thackeray यांच्या वक्तव्यानंतरही Raj Thackeray सावध

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cough Syrup Death: विषारी कफ सिरपचा आणखी एक बळी, चार वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत, महिनाभर सुरु होते उपचार, नागपुरात मृतांची संख्या 18 वर
विषारी कफ सिरपचा आणखी एक बळी, चार वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत, महिनाभर सुरु होते उपचार, नागपुरात मृतांची संख्या 18 वर
RPI Leader Prakash Londhe: RPI नेता प्रकाश लोंढेच्या अनधिकृत बांधकामावर हतोडा; नाशिकमधील गुन्हेगारीवर मनपा अन् पोलिसांची संयुक्त कारवाई
RPI नेता प्रकाश लोंढेच्या अनधिकृत बांधकामावर हतोडा; नाशिकमधील गुन्हेगारीवर मनपा अन् पोलिसांची संयुक्त कारवाई
Pune : मानव-बिबट्या संघर्षावर मोठी उपाययोजना, दिवसा वीजपुरवठा, सौर कुंपण आणि AI निरीक्षण प्रणाली लागू
मानव-बिबट्या संघर्षावर मोठी उपाययोजना, दिवसा वीजपुरवठा, सौर कुंपण आणि AI निरीक्षण प्रणाली लागू
EPFO : कर्मचाऱ्यांना नोकरी जाताच 75 टक्के रक्कम काढता येणार, एका वर्षानंतर 100 टक्के रक्कम काढता येईल, ईपीएफओचं स्पष्टीकरण
कर्मचाऱ्यांना नोकरी जाताच 75 टक्के रक्कम काढता येणार, एका वर्षानंतर 100 टक्के रक्कम काढता येईल, ईपीएफओचं स्पष्टीकरण
Indian Economy : सण आणि लग्नाच्या हंगामात अर्थव्यवस्था जोरदार वेग पकडणार, 7 लाख कोटींच्या उलाढालीचा अंदाज
सण आणि लग्नाच्या हंगामात अर्थव्यवस्था जोरदार वेग पकडणार, 7 लाख कोटींच्या उलाढालीचा अंदाज
PAK vs AFG :  पाकिस्ताननं अफगाणिस्तानपुढं गुडघे टेकले, तालिबान सोबत शस्त्रसंधीची विनंती, 48 तासांसाठी संघर्ष थांबला
पाकिस्ताननं अफगाणिस्तानपुढं गुडघे टेकले, तालिबान सोबत शस्त्रसंधीची विनंती, 48 तासांसाठी संघर्ष थांबला
पाकिस्तानचा विजय अन् गौतम गंभीर, गिलला झटका, WTC पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ, टीम इंडियाची घसरण
पाकिस्तानचा विजय अन् गंभीर, गिलला झटका, WTC पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ, टीम इंडियाची घसरण
पुणे अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांचीच सुरक्षा रामभरोसे; दीड वर्षे होऊनही फायर सूट मिळेना, माहिती अधिकारातून आलं समोर
पुणे अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांचीच सुरक्षा रामभरोसे; दीड वर्षे होऊनही फायर सूट मिळेना, माहिती अधिकारातून आलं समोर
Embed widget