एक्स्प्लोर

Vande Bharat Express : देशात 'वंदे भारत' एक्स्प्रेसची शंभरी पार; कोल्हापूरला फक्त आश्वासनाचं 'गाजर' दाखवणार आहेत का?

Vande Bharat Express : वंदे भारत गाड्या पहिल्यांदा 15 फेब्रुवारी 2019 रोजी मेक इन इंडिया योजनेअंतर्गत सुरू करण्यात आल्या होत्या. सध्या देशात 100 हून अधिक वंदे भारत गाड्या धावत आहेत.

Vande Bharat Express between Kolhapur and Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज (31 ऑगस्ट) 3 नवीन वंदे भारत ट्रेनना हिरवा झेंडा दाखवला. या तीन ट्रेन चेन्नई ते नागरकोइल, मदुराई ते बेंगळुरू आणि मेरठ ते लखनौ दरम्यान धावतील. यावेळी पीएम मोदी म्हणाले की, वंदे भारत (Vande Bharat Express) हा भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाचा नवा चेहरा आहे. आज प्रत्येक मार्गावर वंदे भारताची मागणी होत आहे. आता देशभरात 102 वंदे भारत ट्रेन धावत आहेत. या गाड्यांमधून 3 कोटींहून अधिक लोकांनी प्रवास केला आहे. वंदे भारत गाड्या पहिल्यांदा 15 फेब्रुवारी 2019 रोजी मेक इन इंडिया योजनेअंतर्गत सुरू करण्यात आल्या होत्या. सध्या देशात 100 हून अधिक वंदे भारत धावत आहेत. वंदे भारत ट्रेनचे मार्ग देशातील 280 हून अधिक जिल्ह्यांना जोडत आहेत.

कोल्हापूरसाठी फक्त आश्वासनांचे गाजर मिळणार का?

देशातील अनेक मार्गांवर वंदे भारत सुरु असताना गेल्या वर्षभरापासून कोल्हापूरसाठी फक्त आश्वासनाचे गाजर मिळालं आहे. चालू वर्षात जानेवारी महिन्यात कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत सुरु होणार असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अजूनही ते आश्वासन राहिलं आहे. मागील महिन्यात राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन कोल्हापूर-मुंबई दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेसची मागणी केली होती.

पीएम मोदींकडून वंदे भारत धावणार असल्याचे आश्वासन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा वंदे भारत एक्स्प्रेस कोल्हापुरातून धावणार असल्याचे आश्वासन जिल्ह्यातील जनतेला दिले होते. एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी मोदी कोल्हापुरात होते. यापूर्वीच्या सरकारने कोल्हापूर आणि आसपासच्या भागाकडे विकास आणि वारसा संधींनी भरलेले असतानाही दुर्लक्ष केले होते, असे म्हणत मोदींनी टीका केली होती. मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. शक्तीपीठ एक्स्प्रेस वेमुळे राज्याच्या मोठ्या भागाला आधुनिक कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. आम्ही कोल्हापुरातून नवीन गाड्या सुरू केल्या आहेत. लवकरच कोल्हापुरातून वंदे भारत ट्रेनही धावणार आहे. आम्ही कोल्हापूर-वैभववाडीलाही मंजुरी दिली असून, त्यामुळे कोल्हापूरला कोकणाशी रेल्वेने जोडण्यास मदत होईल, असे मोदी म्हणाले होते. वास्तवात कोल्हापूर-वैभववाडीला मार्गाने कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडण्याचा प्रस्ताव सुद्धा अजूनही हवेतच आहे. शक्तीपीठ महामार्गाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कडाडून विरोध सुरु आहे.  

कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणाचे उद्घाटन करताना मी भाग्यवान असल्याचे पंतप्रधान म्हणाले होते. रस्ते आणि इतर सुविधांचा वापर करून देवी अंबाबाईचा आशीर्वाद घेण्यासाठी लाखो भाविक कोल्हापुरात दाखल होतील. कनेक्टिव्हिटीमुळे कोल्हापुरातील उद्योग आणि विकासाला चालना मिळेल, असेही मोदी म्हणाले होते. मात्र, या सर्व निवडणुकीतील घोषणा झाल्या आहेत. 

तिन्ही खासदारांनीच आता ताकद लावावी लागेल 

दरम्यान, मध्य रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला. शिवनाथ बियाणी यांनी कोल्हापूर ते मुंबई मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस दिवाळीपर्यंत सुरु होण्यासाठी कोल्हापूरच्या तिन्ही खासदारांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत. कोणत्याही परिस्थितीत राजकीय बळ वापरावं लागेल, असे आवाहन केले. 

दोन शहरातील वेळ 4 ते 5 पाच तासांनी कमी होईल

मुंबई आणि कोल्हापूर दरम्यानच्या वंदे भारतला फक्त 7 तास लागतील आणि या शहरांमधील प्रवासाचा वेळ 4 ते 5 तासांनी कमी होणार आहे. अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूर बारा महिने पर्यटकांनी बहरुन जाते. मात्र, प्रवासात खूप वेळ जात असल्याने मोठी कुचंबणा होत आहे. वंदे भारत सुरु करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या असल्या, तरी तत्काळ सुरू होईल याची शक्यता कमी आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये. गेल्या सहा वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.    
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Israel vs Iran War: दुबई प्रशासनाचा दिलदारपणा, कोल्हापूरच्या पर्यटकांना प्रत्येकी 26 हजारांचं गिफ्ट, झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरीही व्यक्त!
दुबई प्रशासनाचा दिलदारपणा, कोल्हापूरच्या पर्यटकांना प्रत्येकी 26 हजारांचं गिफ्ट, झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरीही व्यक्त!
Krishnaraaj Mahadik BJP Yuva Morcha: भाजपने मुलाच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली, धनंजय महाडिक म्हणाले, 'कृष्णराज हा उगवता सूर्य आहे, त्याला कोणी झाकू शकत नाही'
'कृष्णराज उगवता सूर्य, त्याला कोणी झाकू शकत नाही', लेकाच्या निवडीवर धनंजय महाडिकांची प्रतिक्रिया
Ashwini Bidre : अश्विनी बिद्रे हत्याकांड, आरोपीला जन्मठेप होऊन वर्ष उलटलं, तरीही बिद्रे कुटुंबाला मृत्यू प्रमाणपत्र नाहीच; पतीची इच्छामरणाची मागणी
अश्विनी बिद्रे हत्याकांड, आरोपीला जन्मठेप होऊन वर्ष उलटलं, तरीही बिद्रे कुटुंबाला मृत्यू प्रमाणपत्र नाहीच; पतीची इच्छामरणाची मागणी
Kolhapur Crime News: आदल्या रात्री वडिलांनी सेवा केली अन् दुसऱ्या दिवशी सकाळी मुलानं संपवलं, कोल्हापुरातील घटनेत धक्कादायक खुलासे समोर
आदल्या रात्री वडिलांनी सेवा केली अन् दुसऱ्या दिवशी सकाळी मुलानं संपवलं, कोल्हापुरातील घटनेत धक्कादायक खुलासे समोर

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
Ayatollah Ali Khamenei: इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
Vasai Crime News: चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
Iran : अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
Jayant Patil on NCP Merger : राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
Embed widget