एक्स्प्लोर

Sumangalam Lokotsav : राजकारणातील 'एन्ट्री'वर काडसिद्धेश्वर स्वामींची थेट प्रतिक्रिया; म्हणाले, चर्चा रंगलीय पण..

गेल्या अनेक दिवसांपासून सुमंगलम महोत्सवाची राजकीय पातळीवरून मोठी चर्चा होत असल्याने काडसिद्धेश्वर महाराज (Adrushya Kadsiddheshwar Swamiji) यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा रंगली होती.

Sumangalam Lokotsav : कोल्हापुरातील कणेरी येथील सिद्धगिरी मठावर पंचमहाभूतांवर आधारित होत असलेल्या सुमंगलम महोत्सवाचे उद्घाटन आज करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून सुमंगलम महोत्सवाची राजकीय पातळीवरून मोठी चर्चा होत असल्याने काडसिद्धेश्वर महाराज (Adrushya Kadsiddheshwar Swamiji) यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा रंगली होती. मात्र, त्यांनी महोत्सवाच्या व्यासपीठावरून मनोगत व्यक्त करताना राजकीय चर्चेच्या प्रवेशावर भाष्य केले.  

माझा दिवसाचा खर्च 10 रुपये : काडसिद्धेश्वर महाराज

स्वामीजी (Adrushya Kadsiddheshwar Swamiji) म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून राजकीय प्रवेशाची चर्चा रंगली आहे. मात्र, राजकीय प्रवेश या जन्मात तरी शक्य होणार नाही. एका संन्याशाने संन्यास घेतल्यानंतर त्यापेक्षा मोठा अलंकार होऊ शकत नाही. मी संन्याशी आहे, लंगोट घातला निघू लागलो, माझा दिवसाचा खर्च 10 रुपये आहे. ते पुढे म्हणाले की, स्वामीजी त्या विचारांचे नाहीत हे लक्षात आल्यानंतर शासकीय पातळीवरून सहकार्य सुरू झाले. सरकारने आपला कार्यक्रम समजला. आम्ही हा कार्यक्रम छोट्या प्रमाणात करणार होतो. राजा प्रसन्न झाल्यास बरंच काही होते. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दिवसरात्र काम करत आहेत. सरकारी अधिकारी या पद्धतीने सुद्धा काम करु शकतात, यावर विश्वास नाही. 

आम्ही विचार राखणारे आहोत

दरम्यान, स्वामीजी पर्यावरणाच्या ऱ्हासावर भाष्य केले. ते म्हणाले पृथ्वीवर माती खराब होऊ लागली आहे. पाण्याची अवस्था बिकट झाली आहे. हवाही प्रदुषित झाली आहे, कार्बन डायऑक्साईड वाढत आहे. नायट्रोयन आहे तेवढाच आहे. पृथ्वीचे तापमान वाढत असल्याने ग्लेशियअर वितळत आहेत. तापमान वाढल्यास ऊसावर परिणाम होणार आहे. कार्बन वाढल्यास परिस्थिती बिकट होईल. त्यामुळे आपल्याला जीवनशैलीत बदल करावा लागेल. अमेरिकेमध्ये 70 च्या दशकात पाच टक्के लोक 25 टक्के लोकांची उर्जा खर्च करत होते. याबाबत त्यांना इशारा देऊनही त्यांनी काही केलं नाही. मात्र, आम्ही विचार राखणारे आहोत. एक संदेश घेऊन जावावे हा प्रयत्न आहे. वेस्टचे (प्लास्टिक कचरा) वेल्थमध्ये रुपांतर करा.

सुमंगलम विचारसंपदा पुस्तक प्रकाशित

दरम्यान, या कार्यक्रमात स्वामीजींच्या विचारावर आधारित सुमंगलम विचारसंपदा हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. पत्रकार गुरुबाळ माळी यांनी पुस्तक लिहिलं आहे. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते उद् घाटन करण्यात आले. तसेच, पाण्यात विरघळणाऱ्या कापडी पिशव्या उद्धाटन करण्यात आले. तीन लाख कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात येणार आहे. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी आपल्या मनोगतामध्ये कणेरी मठावर होत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच महोत्सवात होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. 

महत्वाच्या इतर बातम्या : 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसविरुद्ध भाजप रस्त्यावर, राहुल गांधींविरुद्ध घोषणाबाजी; कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची, बॅरिकेड्सही ढकलले
काँग्रेसविरुद्ध भाजप रस्त्यावर, राहुल गांधींविरुद्ध घोषणाबाजी; कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची, बॅरिकेड्सही ढकलले
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
आंदोलकांवर कारवाई करुन सरकार लोकशाहीचा गळा घोटतंय, राजू शेट्टींचा हल्लाबोल, म्हणाले, लोकशाही जिवंत ठेवायची विरोधकांचा आदर ठेवा
आंदोलकांवर कारवाई करुन सरकार लोकशाहीचा गळा घोटतंय, राजू शेट्टींचा हल्लाबोल, म्हणाले, लोकशाही जिवंत ठेवायची विरोधकांचा आदर ठेवा
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
Embed widget