Jalna News: चारित्र्यावर संशय घेत पत्नीसोबत वाद घातला. याच रागातून पोटच्या दोन्ही मुलींना उंदीर मारायचे औषध पाजले. यात एकीचा पाच दिवसांपूर्वी तर दुसरीचा मंगळवारी (16 मे) सकाळी उपचार सुरु असताना मृत्यू झाला. यात निर्दयी बापावर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून तो सध्या कारागृहात आहे. तर कृष्णा पंडित (वय 31 वर्षे, रा. शहागड, ता. अंबड) असे आरोपीचं नाव असून, शिवाज्ञा कृष्णा पंडित असे मयत मुलीचे नाव आहे. 


कृष्णा पंडित हा कॉम्प्युटरचा व्यवसाय करतो आणि त्याची पत्नी मनीषा या एका बँकेत काम करतात. दरम्यान 8 मे रोजी सोमवारी बँक बंद झाल्यानंतर मनीषा या घरी गेल्या. तर कृष्णा हा सतत मनीषा यांच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण होत असे. तसेच 8 मे रोजी देखील मनीषा घरी आल्यावर असेच भांडण झाले होते. त्यामुळे नेहमीच्या वादाला कंटाळून मनीषा या दोन्ही मुलींना घेऊन माहेरी निघाल्या होत्या. याचा राग आल्याने कृष्णाने त्यांच्या डोक्यात वीट मारली. ज्यात मनीषा या जखमी झाल्या आणि त्यांच्या डोक्यातून रक्त निघाले. त्यांनी तात्काळ खासगी रुग्णालय गाठले आणि उपचार घेतल्यानंतर त्या मावस भावाकडे राहण्यासाठी गेल्या. दरम्यान दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी दहा वाजता कृष्णा हा दोन्ही मुलींना घेऊन पत्नीकडे गेला. मनीषा यांना घरी चल, नाही तर मी मुलींना मारुन टाकीन, अशी धमकी देखील दिली. 


कृष्णा याने घरी येण्याचे सांगितल्यावर देखील मनीषा यांनी जाण्यास नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात दोन्ही मुलींना घराबाहेर घेऊन गेल्यावर कृष्णाने विषारी द्रव पाजले. नंतर त्याने स्वत: विष प्राशन केले. दरम्यान यावेळी पहिली मुलगी श्रद्धा आणि कृष्णा यांना उलट्या होऊन दोघेजण बेशुद्ध पडले. त्यामुळे नातेवाईकांनी तात्काळ दोघांना सुरुवातीला गेवराई आणि नंतर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. ज्यात श्रद्धाचा मृत्यू झाला होता. तर पाच दिवसांनी उपचार सुरु असताना दुसरी मुलगी शिवाज्ञाचं देखील मृत्यू झाला आहे.  


मुलींना उंदीर मारायचे विषारी द्रव्य पाजले


मनीषा यांनी कृष्णासोबत जाण्यास नकार दिला. त्यानंतर कृष्णा घराबाहेर गेला. त्याने श्रद्धा आणि शिवाज्ञा या दोन्ही मुलींना उंदीर मारायचे विषारी द्रव पाजले. नंतर त्यानेदेखील विष प्राशन केले. यात सर्वचजण बेशुद्ध पडले. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यावर 10 मे रोजी कृष्णा याची तब्येत बरी झाली. परंतु, मुलीच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. 11 मे रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास श्रेयाची तर 16 मे  रोजी सकाळी शिवाज्ञाची प्राणज्योत मालवली. दोघींवरही शहागड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


धक्कादायक! डोक्यात संशयाचं भूत घुसला, म्हणून कुऱ्हाडीने वार करून थेट पत्नीचा जीवच घेतला