एक्स्प्लोर

BSNL 4G : बीएसएनएलचे रुपडं पालटणार! 20 हजार टॉवरच्या माध्यमातून 34 हजार गावात 4 G सेवा मिळणार

BSNL 4G-5G Services : राज्यातील 2 हजार 800 गावात 4G आणि 5G टॉवर उभारले जाणार आहेत.

BSNL 4G-5G Services : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांच्या दूरदृष्टीपणामुळे लवकरच बीएसएनएलची (BSNL) 4 जी आणि 5 जी सुरू करणार असून, त्यासाठी लागणारी जमीन देशातील सर्व राज्यसरकार मोफत उपलब्ध करवून देणार आहे. त्यामुळे लवकर ही सेवा सुरू होणार असून, बीएसएनएलला पूर्वीचे गतवैभव प्राप्त होणार असा विश्वास महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे बीएसएनएल मुख्य महाप्रबंधक रोहित शर्मा यांनी जालना (Jalna) येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. शर्मा हे जालना जिल्ह्यातील बीएसएनएलच्या सेवांचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुढे बोलताना शर्मा म्हणाले की, मार्केट कंट्रोल करण्यासाठी आणि प्राईस वार थांबवण्यासाठी बीएसएनएलची सेवा सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे. देशात सर्वात स्वस्त आणि किफायतशीर सेवा फक्त बीएसएनएल देऊ शकेल असा विश्वास केंद्र सरकारला असून, भारतात बीएसएनएलच्या 4G व 5G सेवेला गतवर्षी जुलै महिन्यात मंजुरी मिळाली होती. त्यानुसार बीएसएनएलच्या 4G व 5G सेवेसाठी देशभरात 20 हजार टावर्स उभारले जात आहेत. ज्या गावात 4G सेवेचे सिग्नल मिळत नाही, अशा 34 हजार गावातही 4G सेवा उपलब्ध होणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे बीएसएनएलच्या 4G व 5G सेवेचे तंत्रज्ञान हे भारतातच विकसित करण्यात आले असून, हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत हा जगातील पाचवा देश ठरला असल्याचे ते म्हणाले.

राज्यातील 2 हजार 800 गावात उभारणार 4G-5G टॉवर

महाराष्ट्र राज्यात 4G व 5G सेवा कार्यान्वित होण्यासाठी 2  हजार 800 गावात नवीन टावर्स उभारले जाणार असून, त्यासाठी सरकारी जमीनीचे अधिग्रहण करण्यात आले असल्याचे शर्मा यांनी सांगितले. बदलत्या तंत्रज्ञानामुळे बीएसएनएल आता कमी मनुष्यबळाचा वापर करीत आहे. त्यामुळे दूरसंचार विभागाच्या इमारती रिकाम्या झाल्या आहेत. जालना येथील टेलीफोन भवनातील खालचा मजला रिकामा झाला असून तो आता किरायाने देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. महाप्रबंधक संजय केशरवानी यांनी औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील बीएसएनएलच्या 4G व 5G सेवेसाठी नवीन टावर्स उभारले जाणार असल्याचे सांगून वर्तमान सेवा अधिक चांगल्या प्रकारे कशी देता येईल, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

BSNL Revival Plan: केंद्रीय मंत्रिमंडळाकडून BSNLसाठी 89,000 कोटी रुपयांच्या पुनरुज्जीवन पॅकेजला मंजुरी

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
मनोज जरांगे पाटलांचा हॉस्पिटलमधूनच मोठा निर्णय, मराठा आरक्षणाच्या सर्व अभ्यासकांना अंतरवाली सराटीत बोलावलं, नेमकं प्रकरण काय? 
मनोज जरांगे पाटलांचा हॉस्पिटलमधूनच मोठा निर्णय, मराठा आरक्षणाच्या सर्व अभ्यासकांना अंतरवाली सराटीत बोलावलं, नेमकं प्रकरण काय? 
चक्कर, ताप, मळमळ ते अशक्तपणा! मनोज जरांगे पाटलांची तब्बेत बिघडली, उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल
चक्कर, ताप, मळमळ ते अशक्तपणा! मनोज जरांगे पाटलांची तब्बेत बिघडली, उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल
Manoj Jarange: 'बावनकुळे साहेब तुम्ही मराठ्यांच्या नादाला लागलात म्हणून तुमच्यावर रडकुंडीला येण्याची वेळ; एकदा माफ केलं, इथून पुढे तुमच्यावर व्यंग करणार नाही' : मनोज जरांगे पाटील
'बावनकुळे साहेब तुम्ही व्यथित झालात, आईचं नाव घेतलं याचं आम्हालाही वाईट वाटलं; एकदा माफ केलं, इथून पुढे तुमच्यावर व्यंग करणार नाही; मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget