एक्स्प्लोर

गुन्हेगारीत उत्तर प्रदेश अव्वल, महाराष्ट्र देशात तिसरा

2016 मध्ये उत्तर प्रदेशात सर्वाधिक (9.5 टक्के) गुन्हे नोंदवण्यात आले. त्यानंतर मध्य प्रदेश (8.9 टक्के), महाराष्ट्र (8.8 टक्के) आणि केरळ (8.7 टक्के) या राज्यांचा क्रमांक लागतो.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात देशातील सर्वाधिक गुन्हेगारी माजल्याचं समोर आलं आहे. यूपीमध्ये 2016 मध्ये 9.5 टक्के गुन्ह्यांची नोंद झाली आहे. खेदाची बाब म्हणजे गुन्हेगारीच्या यादीत महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्यूरो (नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो - एनसीआरबी)ने 2016 सालातील जारी केलेली आकडेवारी जाहीर केली. 2016 मध्ये उत्तर प्रदेशात सर्वाधिक (9.5 टक्के) गुन्हे नोंदवण्यात आले. त्यानंतर मध्य प्रदेश (8.9 टक्के), महाराष्ट्र (8.8 टक्के) आणि केरळ (8.7 टक्के) या राज्यांचा क्रमांक लागतो. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात तिसऱ्या, तर अपहरणाच्या आणि लहान मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. 48 लाख 31 हजार 515 दखलपात्र गुन्ह्यांची नोंद गेल्या वर्षी झाली. त्यामध्ये 29 लाख 75 हजार 711 गुन्हे हे आयपीसी अंतर्गत तर 18 लाख 55 हजार 804 गुन्हे हे विशेष आणि स्थानिक कायद्यांअंतर्गत येतात. 2015 च्या तुलनेत (47 लाख 10 हजार 676 गुन्हे) यामध्ये 2.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे, उत्तर प्रदेशात 50 टक्के गुन्हेगारांवरील आरोप सिद्ध झाले आहेत. त्या तुलनेत महाराष्ट्रातील Rate of Conviction अवघा 11 टक्के आहे. हत्येच्या गुन्ह्यांमध्ये घट 2015 च्या तुलनेत देशात हत्यांच्या घटनांमध्ये 5.2 टक्क्यांनी घट झाली आहे. 2016 मध्ये 30 हजार 450 हत्यांचे गुन्हे नोंदवण्यात आले. दंगल (5 टक्के) आणि दरोडे (11.8 टक्के) या केसेसमध्येही गतवर्षीच्या तुलनेत घट आहे. मात्र अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये 6 टक्क्यांनी वाढ आहे. महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये 2.9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये पती किंवा सासरच्या मंडळींनी केलेला छळ (32.6 टक्के), विनयभंग (25 टक्के), महिलांचं अपहरण (19 टक्के) आणि बलात्कार (11.5 टक्के) यांचा समावेश आहे. बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र तिसरा 2015 मध्ये बलात्काराच्या 34 हजार 651 गुन्ह्यांची नोंद झाली होती. ते 2016 मध्ये 12.4 टक्क्यांनी वाढून 38 हजार 947 वर पोहचले आहेत. बलात्काराच्या घटनांमध्ये मध्य प्रदेश (4 हजार 882 केसेस - 12. 5 टक्के) अव्वल असून दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश ( 4 हजार 816 केसेस - 12.4 टक्के) आणि तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र ( 4 हजार 189 केसेस - 10.7 टक्के) आहे. लहान मुलांविरोधातील गुन्ह्यांमध्येही उत्तर प्रदेश अव्वल आहे. महाराष्ट्र दुसऱ्या, तर मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. अपहरणाच्या केसेसमध्येही उत्तर प्रदेश दबंग आहे. देशातील 54 हजार 723 घटनांपैकी 7 हजार 956 अपहरणाच्या घटना महाराष्ट्रात घडल्या. इथेही महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. 2016 मध्ये अनुसूचित जाती किंवा जमातींतील नागरिकांविरोधातील अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यांमध्ये 5.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 40 हजार 801 केसेसमध्ये उत्तर प्रदेश (20 हजार 426 केसेस - 25.6 टक्के) अव्वल असून त्यानंतर बिहार (5 हजार 701 केसेस - 14 टक्के) आणि राजस्थान ( 5 हजार 134 केसेस - 12.6 टक्के) यांचा क्रमांक लागतो. इतर ठळक मुद्दे : सायबर गुन्हेगारीमध्येही 2015 च्या तुलनेत 6.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 15 कोटी 92 लाख 50 हजार 181 रुपये किमतीच्या खोट्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. गुजरातमध्ये सर्वाधिक (2 कोटी 37 लाख 24 हजार 50 रुपये) खोट्या नोटा ताब्यात घेण्यात आल्या. त्यानंतर पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. मेट्रो शहरांची आकडेवारी पाहता, दिल्लीमध्ये सर्वाधिक (38.8 टक्के) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर बंगळुरु (8.9 टक्के) आणि मुंबई (7.7 टक्के) या शहरांचा क्रमांक लागतो. अपहरणाच्या केसेसमध्ये दिल्ली (5 हजार 453), तर मुंबई (1 हजार 876 ) दुसऱ्या स्थानी आहे. कोठडीत झालेल्या 60 मृत्यूंपैकी 12 महाराष्ट्रात झाले आहेत. एकूण 3 लाख 50 हजार 862 किलो वजनाचे विविध प्रकारचे ड्रग्ज 2016 मध्ये जप्त करण्यात आले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली

व्हिडीओ

Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं
Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE
Sanjay Raut PC : कल्याण-डोंबिवलीत आमचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत, संजय राऊतांची कबुली
Akshay Kumar Car Accident : जूहूत 3 गाड्यांचा अपघात, अपघातग्रस्त रिक्षाची अक्षय कुमारच्या कारला धडक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
Pune Shivsena UBT: सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
Prashant Jagtap: मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
Embed widget