एक्स्प्लोर

S. Jaishankar: संयुक्त राष्ट्र संघ अजूनही 1945 मध्येच वावरतोय, सदस्य देशांना न्याय देण्यास असमर्थ; जयशंकर यांनी व्यक्त केली नाराजी

S. Jaishankar: संयुक्त राष्ट्र संघ 1945 मधील वर्षात गोठले असून सदस्य देशांचे प्रश्न सोडवण्यास सक्षम नसल्याचे त्यांनी म्हटले.

S. Jaishankar: भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी संयुक्त राष्ट्राच्या (United Nation) कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करताना जोरदार टीका केली. संयुक्त राष्ट्र संघ अजूनही 1945 मध्येच असून त्याच वर्षात यूएन गोठलेल्या अवस्थेत आहे. संयुक्त राष्ट्र आपल्या सदस्य देशांचे प्रश्न सोडवण्यास सक्षम नसल्याचे जयशंकर यांनी म्हटले. व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिटच्या (Voice Of Global South Summit) दुसऱ्या दिवशी एस. जयशंकर संबोधित करत होते. यावेळी त्यांनी नवीन जागतिकीकरणाची व्यवस्था तयार करण्यासाठी त्या दिशेने प्रयत्न करण्यासाठी सामूहिकपणे काम करण्यासाठी त्यांनी यावेळी आवाहन केले. लोकशाही मूल्य आणि समताधिष्ठ जग केवळ अधिक विविधीकरण आणि क्षमतांच्या स्थानिकीकरणाच्या आधारावर तयार केले जाऊ शकते, असेही त्यांनी म्हटले. 

काही देशांकडून आंतरराष्ट्रीय समुदायाच्या हितांकडे दुर्लक्ष

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आपल्या भाषणात कर्ज, व्यापारातील अडथळे, आर्थिक प्रवाहाचा अभाव आणि हवामान बदलांमुळे आलेले संकट यासारख्या विकसनशील देशांसमोरील आव्हानांचाही उल्लेख केला. जयशंकर यांनी म्हटले की, भारत G20 देशांमधील हरित विकासाच्या करारावर सहमती तयार करण्यासाठी प्रयत्न करेल. काही देश केवळ स्वतःच्या फायद्यावर लक्ष केंद्रित करत असून आंतरराष्ट्रीय समुदायाच्या हिताकडे दुर्लक्ष करत असल्याचेही जयशंकर यांनी म्हटले.  G-20 मधील सदस्य देशांचेही स्वतःचे प्राधान्यक्रम आहेत. ते बदलण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे त्यांनी म्हटले. 

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी विकासासाठी डेटा मिळवण्याबाबतही चर्चा केली. विविध देश विविध स्तरांवर डेटा आधारीत संशोधनांवर काम करत आहेत. या मुद्यावरही आंतरराष्ट्रीय सहकार्यावर जयशंकर यांनी भर दिला. या सहकार्याच्या माध्यमातून सर्वांसाठी संधी उपलब्ध होईल असेही त्यांनी म्हटले.

जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सत्रात आर्मेनिया, अल साल्वाडोर, जॉर्जिया, इराण, जमैका, मालदीव, ओमान, पनामा, ट्युनिशिया आणि युगांडा या देशांचे परराष्ट्र मंत्री सहभागी झाले होते. 
 
जग अधिकाधिक अस्थिर होत असल्याकडे जयशंकर यांनी लक्ष वेधले. कोरोना महासाथीच्या आजाराने हा धोका पुन्हा एकदा अधोरेखित केला. तर, युक्रेन युद्धामुळे तणाव वाढला असून अन्न, ऊर्जा आणि खतांच्या सुरक्षितेबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.  भारताकडे यंदा जी-20 परिषदेचे अध्यक्षपद आहे. भारत आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात विकसनशील देशांचे मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget