एक्स्प्लोर

गृह मंत्रालयाच्या आदेशाने 2400 पोलिस डझनभर प्रशासकांकडून 3 लाख लडाखींवर अत्याचार आणि छळ; भारत खरोखर स्वतंत्र आहे का? सोनम वांगचूक यांच्या पत्नीचा उद्गिग्न सवाल

Gitanjali J Angmo on Sonam Wangchuk: लडाखी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना NSA अंतर्गत अटक झाल्यानंतर पत्नी गीतांजली अंग्मो यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली.

Gitanjali J Angmo on Sonam Wangchuk: लडाखी जनतेच्या हक्कांसाठी आयुष्य वेचलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंग्मो (Geetanjali Angmo Statement) यांनी आज (2 ऑक्टोबर) केंद्र सरकारवर सडकून टीका केली. गीतांजली यांनी लडाखमधील सध्याच्या परिस्थितीची तुलना ब्रिटिश भारताशी केली. गृह मंत्रालय लडाख पोलिसांचा गैरवापर करत असल्याचे त्यांनी सांगितले. गीतांजली यांनी X वर लिहिले की, "भारत खरोखर स्वतंत्र आहे का? 1857 मध्ये, राणीच्या आदेशानुसार 24 हजार ब्रिटीश सैनिकांनी 30 कोटी भारतीयांवर अत्याचार करण्यासाठी 1लाख 35 हजार भारतीय सैनिकांचा वापर केला. आज, गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार डझनभर प्रशासक 3 लाख लडाखींवर अत्याचार करण्यासाठी 2400 लडाखी पोलिस अधिकाऱ्यांचा गैरवापर करत आहेत."

सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक (Sonam Wangchuk Arrest) 

लडाखला राज्यत्व (पूर्ण राज्याचा दर्जा) मिळावे यासाठी झालेल्या हिंसक निदर्शनांनंतर सोनम वांगचुक यांना 26 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. त्यांच्यावर कठोर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (NSA) आरोप ठेवण्यात आले आणि त्यांना जोधपूर मध्यवर्ती तुरुंगात पाठवण्यात आले. 24 सप्टेंबरच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात (Students Protest Ladakh) चार जणांचा मृत्यू झाला. संतप्त विद्यार्थ्यांनी भाजप कार्यालय पेटवून दिलं होतं. 

राष्ट्रपतींना पत्र, वांगचुक यांच्या बिनशर्त सुटकेची मागणी  (Geetanjali Angmo Letter to President) 

गीतांजली अंग्मो यांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले. लडाखमधील लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी त्यांनी राष्ट्रपतींना आवाहन केले. अंग्मो यांनी हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनाही पाठवले. पत्रात अंग्मो यांनी सोनम वांगचुक यांच्या बिनशर्त सुटकेची मागणी केली. त्यांनी सोनम यांचे वर्णन हवामान बदलाविरुद्ध आणि मागास आदिवासी भागांच्या विकासासाठी मोहीम चालवणारे शांतताप्रिय गांधीवादी आंदोलक म्हणून केले.

हिंसाचारासाठी सीआरपीएफ जबाबदार

गीतांजली यांनी त्यांच्या पाकिस्तान संबंधांच्या आरोपांचे खंडन केले. रविवारी, त्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की वांगचुक नेहमीच गांधीवादी पद्धतीने निषेध करत असत आणि 24 सप्टेंबर रोजी झालेल्या हिंसाचारासाठी सीआरपीएफ जबाबदार होते. अंग्मो यांनी स्पष्ट केले की त्यांच्या पतीच्या पाकिस्तान भेटी हवामान बदलाशी संबंधित होत्या. त्या म्हणाल्या, "आम्ही संयुक्त राष्ट्रांनी आयोजित केलेल्या परिषदेत गेलो होतो. आम्हाला हिमालयीन हिमनद्यांच्या पाण्यात भारत किंवा पाकिस्तान दिसत नाही."

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget