एक्स्प्लोर

सतयुगात राम कुठून आला? असा सवाल करत नेटीझन्सकडून साक्षी महाराज ट्रोल

उत्तर प्रदेशमधील उन्नाव मतदारसंघाचे भाजप खासदार साक्षी महाराज यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले आहे.

लखनौ : उत्तर प्रदेशमधील उन्नाव मतदारसंघाचे भाजप खासदार साक्षी महाराज यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले आहे. साक्षी महाराज म्हणाले की, हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस होता, त्याचा मुलगा प्रल्हाद 'जय श्री राम' म्हणायचा, म्हणून हिरण्यकश्यपने त्याला तुरुंगात डांबले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिरण्यकश्यप राक्षसाच्या वंशज आहेत, त्यामुळे त्यासुद्धा जय श्रीराम बोलणाऱ्यांना तुरुंगात डांबत आहेत. परंतु या विधानानंतर साक्षी महाराज मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत. सोशल मीडियावर नेटीझन्सनी साक्षी महाराजांची अक्कल काढली आहे. नेटीझन्स एवढ्यावरच थांबले नाहीत. नेटीझन्स आता साक्षी महाराजांना पुराण-विद्या शिकवू लागले आहेत. नेटीझन्सचे म्हणणे आहे की, हिरण्यकश्यप हा राक्षस सतयुगात होऊन गेला. या युगात भगवान विष्णूंनी त्यांचा तिसरा अवतार (नरसिंह अवतार) घेतला होता. त्रेतायुगात नरसिंहाचा अवतार घेऊन विष्णूंनी हिरण्यकश्यप राक्षसाला मारले होते. श्रीराम हा भगवान विष्णूंचा सातवा अवतार आहे. नरसिंह आणि राम हे दोन वेगवेगळ्या युगातील वेगवेगळे अवतार आहेत. तर मग सतयुगात भक्त प्रल्हात रामाचे नाव कसे काय घेईल? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. भक्त प्रल्हाद हा श्री नारायणाचे नाव घेत होता. त्यामुळे हिरण्यकश्यप राक्षसाने त्याला तुरुंगात डांबले होते. परंतु साक्षी महाराजांच्या दाव्यानुसार भक्त प्रल्हाद रामाचे नाव घेत होता, त्यामुळे त्याला तुरुंगात डांबून ठेवण्यात आले होते. साक्षी महाराज म्हणाले आहेत की,हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस होता, त्याचा मुलगा प्रल्हाद 'जय श्री राम' म्हणायचा, परंतु हिरण्यकश्यपने त्याला तुरुंगात डांबले. आता बंगालमध्ये अशी स्थिती निर्माण झाली आहे की, 'जय श्रीराम' म्हणाल्यानंतर ममता बॅनर्जी चिडू लागल्या आहेत. त्या शिव्या देऊ लागल्या आहेत. रस्त्यावर उतरु लागल्या आहेत. विरोधात जाऊन विविध योजना बनवू लागल्या आहेत. जय श्रीराम या घोषणेवरुन पश्चिम बंगालमध्ये राजकारण केले जाऊ लागले आहे. याबाबत ममता बॅनर्जी यांनी फेसबुक पोस्ट लिहून स्वतःची बाजू मांडली आहे. पोस्टमध्ये बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, भाजपवाल्यांनी जय श्रीराम या घोषणेला विकृत रुप देत त्यांच्या पक्षाची घोषणा बनवले आहे. याद्वारे भाजपवाले धर्म आणि राजकारण एकत्र मिसळण्याचा प्रयत्न करत आहेत. मला कोणत्याही पक्षाची सभा, रॅली किंवा त्यांच्या घोषणेची अडचण नाही. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील वाद विकोपाला जाऊ लागला आहे. साक्षी महाराजांनी वादग्रस्त विधान करुन त्यामध्ये अधिक भर टाकली आहे.  भाजप कार्यकर्ते ममता बॅनर्जींना 'जय श्रीराम' लिहिलेले 10 लाख पोस्टकार्ड पाठवणार | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'पुढील संघर्ष सीमेपुरता मर्यादित राहणार नाही, तर कोलकात्यापर्यंत पोहोचून घरात घुसून मारु' पाकिस्तानची भारताला धमकी
'पुढील संघर्ष सीमेपुरता मर्यादित राहणार नाही, तर कोलकात्यापर्यंत पोहोचून घरात घुसून मारु' पाकिस्तानची भारताला धमकी
BJP: चंदीगडच्या भाजप मुख्यालयावरील ग्रेनेड हल्ला प्रकरणात 5 जणांना अटक, ISI चा कट उघड, पोर्तुगाल- जर्मनी कनेक्शन समोर   
चंदीगडच्या भाजप मुख्यालयावरील ग्रेनेड हल्ला प्रकरणात 5 जणांना अटक, ISI चा कट उघड, पोर्तुगाल- जर्मनी कनेक्शन समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 एप्रिल 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 एप्रिल 2026 | शनिवार
देशाची राजधानी हादरली! दिल्ली आणि जम्मू काश्मीरसह अनेक राज्यात भूकंपाचे धक्के, घरं सोडून नागरिक रस्त्यावर 
देशाची राजधानी हादरली! दिल्ली आणि जम्मू काश्मीरसह अनेक राज्यात भूकंपाचे धक्के, घरं सोडून नागरिक रस्त्यावर 

व्हिडीओ

Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं
Nanded Crime : रुग्णालयात जाऊन काटा काढला, नांदेडमधील गँगवॉरची थरकाप उडवणारी कहाणी
Solapur Anjangaon : अंजनगावातील छ. शिवरायांच्या पुतळ्याचा वादावर तोडगा कसा निघाला?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'पुढील संघर्ष सीमेपुरता मर्यादित राहणार नाही, तर कोलकात्यापर्यंत पोहोचून घरात घुसून मारु' पाकिस्तानची भारताला धमकी
'पुढील संघर्ष सीमेपुरता मर्यादित राहणार नाही, तर कोलकात्यापर्यंत पोहोचून घरात घुसून मारु' पाकिस्तानची भारताला धमकी
Abbas Araghchi: 'उड्डाणपूल पुन्हा बांधता येतील, पण अमेरिकेला धडा शिकवण्याची संधी पुन्हा मिळणार नाही'; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या वक्तव्याची जगभरात चर्चा
'उड्डाणपूल पुन्हा बांधता येतील, पण अमेरिकेला धडा शिकवण्याची संधी पुन्हा मिळणार नाही'; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या वक्तव्याची जगभरात चर्चा
'होर्मुझ' सुरु करण्यासाठी इराणने ट्रम्पचा 48 तासांचा अल्टिमेटम फेटाळला; म्हणाले, 'तुम्ही हतबल झाल्याने घाबरुन धमक्या देत आहात आम्ही तुमच्यासाठी नरकाचा दरवाजा उघडू'
'होर्मुझ' सुरु करण्यासाठी इराणने ट्रम्पचा 48 तासांचा अल्टिमेटम फेटाळला; म्हणाले, 'तुम्ही हतबल झाल्याने घाबरुन धमक्या देत आहात आम्ही तुमच्यासाठी नरकाचा दरवाजा उघडू'
Ashok Kharat Crime news: आधी अशोक खरातने सर्वस्व लुटलं, मग इंटरनेटवर व्हिडीओ व्हायरल झाले, पीडित महिलांना प्रचंड मानसिक धक्का
आधी अशोक खरातने सर्वस्व लुटलं, मग इंटरनेटवर व्हिडीओ व्हायरल झाले, पीडित महिलांना प्रचंड मानसिक धक्का
Bhandara News: भंडाऱ्यात 34 कोटींचा रस्ता, पण कंत्राटदाराने सिमेंट वापरलंच नाही, 'फ्लाय ॲश'चा वापर केल्याचा खळबळजनक आरोप
भंडाऱ्यात 34 कोटींचा रस्ता, पण कंत्राटदाराने सिमेंट वापरलंच नाही, 'फ्लाय ॲश'चा वापर केल्याचा खळबळजनक आरोप
Navi Mumbai Crime: काळी जादू करण्यासाठी सांताक्रुझमधील आई अन् मुलीला फार्महाऊसवर नेऊन विवस्त्र व्हायला सांगितलं अन् नको ते केलं, नवी मुंबईतील विकृत भोंदूबाबाचा पर्दाफाश
नवी मुंबईतील विकृत भोंदूबाबाचा महिलांवर अत्याचार, मध्यरात्री खालापूरच्या फार्म हाऊसवर न्यायचा अन्...
Ashok Kharat Nashik Crime: मोठी बातमी: एसआयटीने चौकशी करुन घरी सोडलं अन् अशोक खरातच्या मुलाने रंग दाखवलेच, हर्षवर्धन खरात नॉट रिचेबल, पळून गेल्याची शक्यता
मोठी बातमी: एसआयटीने चौकशी करुन घरी सोडलं अन् अशोक खरातच्या मुलाने रंग दाखवलेच, हर्षवर्धन खरात नॉट रिचेबल, पळून गेल्याची शक्यता
Dharashiv News: भोंगा वाजताच दोन तास टीव्ही, मोबाईल बंद होणार, महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात अभ्यासाचा नवा पॅटर्न
भोंगा वाजताच दोन तास टीव्ही, मोबाईल बंद होणार, महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात अभ्यासाचा नवा पॅटर्न
Embed widget