एक्स्प्लोर

Bihar Election Result 2025: प्रशांत किशोरांचा पहिल्याच निवडणुकीत टांगा पलटी, घोडं फरार! आता राजकारण सोडणार की कलटी मारणार?

Bihar Election Result 2025: 2024 मध्ये जन सुराजची घोषणा प्रशांत किशोर यांनी मोठ्या दिमाखात केली. “बदल हवा” अशी आकांक्षा घेऊन त्यांनी बिहारच्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचल्याचा दावा केला.

Bihar Election Result 2025: बिहार निवडणुकीत जन सुराजला एकही जागा न मिळाल्याने प्रशांत किशोर (Prashant Kishor Bihar Election 2025) जे देशातील सर्वात यशस्वी निवडणूक रणनीतीकार समजले जातात त्यांच्या राजकीय प्रवासाला पहिल्याच क्षणी तगडा झटका बसला आहे. निवडणुकांपूर्वी तीन वर्षांचा कष्टसाध्य प्रवास, हजारो किलोमीटरची पदयात्रा, डिजिटल माध्यमांवरील प्रचंड लोकप्रियता आणि ‘बिहार बदलण्यासाठी तिसरा पर्याय’ उभा करण्याचा दावा या सर्व गोंगाटानंतरही निकालाने PK यांची निराशा झाली आहे. त्यामुळे आता नितीशकुमार यांना 25 पेक्षा जास्त जागा मिळाल्यास राजकारण सोडतो, असे आव्हान दिलेल्या प्रशांत किशोर आता काय करणार? असा सवाल उपस्थित झाला आहे. अर्थात निकालामध्ये त्यांच्या पक्षाची निराशा झाली असली, तरी त्यांच्या पक्षाने केलेलं नुकसान एनडीएच्या पथ्यावर पडलेलं दिसून येत आहे. महाआघाडीला मोठा झटका या निवडणुकीच्या निमित्ताने बसला आहे.  

मोदी मोहिमेची रणनीती आखली (Prashant Kishor strategy vs politics) 

प्रशांत किशोर यांचा प्रवास साध्या गावातून संयुक्त राष्ट्रसंघापर्यंत गेला. कोनार गावात जन्मलेले PK बक्सरमध्ये शिक्षण घेऊन अचानकच UN च्या सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमात झेपावले. 2011 पर्यंतचे त्यांचे आरोग्य क्षेत्रातील नियोजन, सर्वेक्षण, सामुदायिक सहभागाचे कौशल् याचाच परिणाम नंतर त्यांच्या राजकीय रणनीतीत दिसून आला. म्हणजेच, 2012 च्या गुजरात निवडणुकीत भाजपला दिलेला पाठिंबा ही सुरुवात होती.

नेत्यांसाठी ते विजयी रणनीतीचे शिल्पकार ठरले (Prashant Kishor strategy)

2013 मध्ये 'CAG' या संस्थेची स्थापना करून 2014 च्या मोदी मोहिमेची रणनीती आखली. ती इतकी अचूक, इतकी धक्कादायक की भारतीय निवडणूक प्रचाराचा चेहराच बदलून गेला. 'चाय पे चर्चा', 3D रॅली, रन फॉर युनिटी, मंथन, डेटा-आधारित मायक्रो-टार्गेटिंग हे सर्व प्रयोग त्यांच्या नावावर गेले. त्यानंतर नितीश कुमार, ममता बॅनर्जी, स्टालिन, जगन रेड्डी, अमरिंदर सिंग, केजरीवालय. अर्थात देशातील जवळपास सर्व महत्त्वाच्या नेत्यांसाठी ते विजयी रणनीतीचे शिल्पकार ठरले.  पण हे सर्व “इतरांच्या” संघटनांवर आधारित होते हे स्वतः PK यांनी मान्य केले होते. त्यांचा यशाचा पाया म्हणजे त्यांच्या क्लायंटकडे आधीपासून असलेली संघटनात्मक ताकद, स्थानिक रूट्स आणि सामाजिक समीकरणे. मात्र स्वतः राजकारणात उडी घेताना हेच समीकरण त्यांच्याविरुद्ध उभे राहिले.

2024 मध्ये जन सुराज पक्षाची घोषणा  (Prashant Kishor Jan Suraaj)

2024 मध्ये जन सुराजची घोषणा त्यांनी मोठ्या दिमाखात केली. “बदल हवा” अशी आकांक्षा घेऊन त्यांनी बिहारच्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचल्याचा दावा केला. त्यांनी 3 हजार किलोमीटरची पदयात्रा केली, आणि “हड्डी जळाली” म्हणत स्वतःच्या श्रमांचा उल्लेखही केला. 30 कोटी व्ह्यूजचा डिजिटल गाजावाजा, 50 ते 70 लाख स्थलांतरित बिहारात राहिल्याचा अंदाज आणि त्यापैकी “किमान दोन-तृतीयांश आमच्याकडे येतील” हा दावा या सर्वांमुळे PK स्वतःच आपल्या अपेक्षांच्या जाळ्यात अडकले. 

भूगोल बदलण्याचा आत्मविश्वास पण... (PK Bihar politics) 

240 जागांवर उमेदवार उभे करून त्यांनी बिहारच्या राजकीय नकाशावर एक भव्य आकृती काढण्याचा प्रयत्न केला. पण अनुभवाचा अभाव, स्थानिक पातळीवर संघटनात्मक मुळांची कमकुवतता, आणि जातीच्या समीकरणांवर भक्कम पकड नसणेया सर्वांनी एकत्र येऊन जन सुराजचा वेग निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात ‘मंद’ केला. पाटण्यातील राजकीय वर्तुळाने हा अंदाज आधीच व्यक्त केला होता आणि निकालांनी त्याचीच पुष्टी केली. प्रशांत किशोर यांना यावेळी जिंकता आले नाही. इतकेच नाही, ते स्पर्धेतसुद्धा नाहीत हे स्पष्ट आहे. रणनीतीचा बादशाह असलेला PK, स्वतःच्या मैदानात मात्र शून्यावर मोजला गेला. हा पराभव नव्हे, तर ‘भूगोल बदलण्याचा आत्मविश्वास’ विरुद्ध ‘भूगोलाने दाखवलेली वास्तवता’ अशी झाली आहे. त्यांनी आयुष्यभर ज्यांच्यासाठी विजयाचा रोडमॅप तयार केला, त्याच नकाशावर स्वतःला स्थान शोधताना त्यांना पहिल्याच वेळी पूर्णपणे गडगडावे लागले. 

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Crime News: मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
EC Freeze TMC Name, Symbol : तृणमूलच्या फुटीर गटाच्या हालचालींना वेग; निवडणूक आयोगाला दिली तीन नावं, कोणतं पक्षचिन्ह अन् नाव मिळणार याकडे सर्वांचं लक्ष
तृणमूलच्या फुटीर गटाच्या हालचालींना वेग; निवडणूक आयोगाला दिली तीन नावं, कोणतं पक्षचिन्ह अन् नाव मिळणार याकडे सर्वांचं लक्ष
UPI Charges: '100 रूपयांवर फक्त 40 पैसे; तुमचा जीव जाणार आहे का?' UPI शुल्कावरून नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे वक्तव्य
'100 रूपयांवर फक्त 40 पैसे; तुमचा जीव जाणार आहे का?' UPI शुल्कावरून नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे वक्तव्य
Supreme Court On Rajpal Yadav Cheque Bounce Case: 'यांच्यावर कोण विश्वास ठेवणार?', सर्वोच्च न्यायालयाकडून राजपाल यादववर ताशेरे, कर्ज चुकवण्याची शेवटची संधी, नाहीतर...
'यांच्यावर कोण विश्वास ठेवणार?', सर्वोच्च न्यायालयाकडून राजपाल यादववर ताशेरे, कर्ज चुकवण्याची शेवटची संधी, नाहीतर...

व्हिडीओ

Sharad Pawar Letter to CM Devendra Fadnavis: 'महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा'; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report
Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report
Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime News: 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
Manoj Jarange Protest: शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
Delhi Crime News: मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
Thane Crime News: ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
Eknath Shinde Mobile: एकनाथ शिंदे लंडनवरून मुंबईत परतले; मोबाईल विमानातच विसरले; घरी पोहचल्यावर मध्यरात्री 3 वाजता समजलं, पुढे काय घडलं?
एकनाथ शिंदे लंडनवरून मुंबईत परतले; मोबाईल विमानातच विसरले; घरी पोहचल्यावर मध्यरात्री 3 वाजता समजलं, पुढे काय घडलं?
Pune Crime News: लग्नानंतर भांडी, वस्तूसाठी त्रास; खाण्यापिण्यावर बंधनं, नवऱ्याचं दुर्लक्ष अन्...., सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन; पुण्यातील घटना
लग्नानंतर भांडी, वस्तूसाठी त्रास; खाण्यापिण्यावर बंधनं, नवऱ्याचं दुर्लक्ष अन्...., सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन; पुण्यातील घटना
Pune Railway Mega Block: गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल! पुणे रेल्वे विभागातील 15 दिवसांचा ब्लॉक; अनेक ट्रेन्स रद्द, काहींचे मार्ग बदलले, कसं आहे नियोजन? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल! पुणे रेल्वे विभागातील 15 दिवसांचा ब्लॉक; अनेक ट्रेन्स रद्द, काहींचे मार्ग बदलले, कसं आहे नियोजन? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Maharashtra Weather Update : पावसाची 'रिटर्न इनिंग'! सप्टेंबरच्या शेवटी महाराष्ट्र पुनरागमन; हवामान विभागाचा मोठा अंदाज, 'या' जिल्ह्यांत बरसणार तुफान पाऊस, जाणून घ्या हवामान अंदाज
पावसाची 'रिटर्न इनिंग'! सप्टेंबरच्या शेवटी महाराष्ट्र पुनरागमन; हवामान विभागाचा मोठा अंदाज, 'या' जिल्ह्यांत बरसणार तुफान पाऊस, जाणून घ्या हवामान अंदाज
Embed widget