एक्स्प्लोर

Pahalgam terror attack Vinay Narwal: काश्मीर खोऱ्यातील तो रोमँटिंग Video विनय नरवाल अन् हिमांशीचा नाहीच; पहलगाममधील व्हायरल व्हिडिओचं सत्य समोर

Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश आहे. नौदलाच्या लेफ्टनंट विनय नरवाल यांचा मृत्यू.

Vinay Narwal died in Pahalgam Attack: काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 भारतीयांचा बळी गेला आहे. दहशतवाद्यांच्या गोळीने जीव गमावलेल्या या लोकांमध्ये भारतीय नौदलाच लेफ्टनंट पदावर असलेल्या विनय नरवाल यांचाही समावेश होता. विनय नरवाल (Vinay Narwal) आणि त्यांची पत्नी हिमांशी नरवाल (Himnashi Narwal) यांचे अवघ्या आठवडाभरापूर्वी लग्न झाले होते. त्यानंतर हे दोघेही हनिमुनसाठी निसर्गरम्य अशा पहलगाल येथे आले होते. मात्र, दहशतवाद्यांनी विनय नरवाल यांना गोळी घालून ठार केले. या हल्ल्यापूर्वी काही क्षण आधी विनय नरवाल आणि हिमांशी हे दोघेही जण बैसरन व्हॅलीत आनंद लुटत होते. त्याच अनुषंगाने व्हायरल झालेला दुसराच व्हिडिओ नरवाल दाम्पत्याचा असल्याचं सांगण्यात येत आहे.

या दोघांनी फिल्मी स्टाईलमध्ये एक व्हिडीओ चित्रीत केला होता. त्यामध्ये पुरुष बॉलीवूड किंग शाहरुख खान याची सिग्नेचर पोझ देताना दिसत आहे. दहशतवादी हल्ल्यापूर्वीचा (Pahalgam Attack) या दोघांचा हा रोमँटिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं सांगण्यात येतंय. नरवाल पती-पत्नीचा हा शेवटचा व्हिडिओ असल्याचेही सांगतिले जाते. मात्र, हा व्हिडिओ नरवाल दाम्पत्याचा नसून दुसऱ्याच कपलचा आहे.  

लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पार्थिवाला बुधवारी दिल्ली विमानतळावर भारतीय नौदलाकडून मानवंदना देण्यात आली. यावेळी हिमांशी नरवाल यांनीही आपल्या पतीला रडत मानवंदना दिली होती. दिल्ली विमानतळावरील हे चित्र अत्यंत भावूक करणारे होते. यानंतर विनय नरवाल यांच्या पार्थिवाला त्यांची बहीण आणि वडिलांनी मुखाग्नी दिला. त्यावेळीही स्मशानभूमीत भावूक वातावरण पाहायला मिळाले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या मृतदेहाशेजारी सुन्न होऊन बसलेल्या हिमांशी नरवाल यांचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर, एक व्हिडिओ व्हायरल होत असून तो नरवाल यांचा असल्याचे लिहिलं जात आहे. मात्र, तो व्हिडिओ नरवाल दाम्पत्याचा नसून क्रिकेटर आशिष शेरावत आणि कॅबिन क्रू याशिका शर्मा शेरावत यांचा असल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: शेरावत दाम्पत्याने याबाबत व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ABP News (@abpnewstv)

शेवटच्या क्षणी व्हिसा मिळाला नाही अन् विनय-हिमांशी काश्मीरला आले

लग्न झाल्यानंतर फिरण्यासाठी आधी विनय आणि हिमांशी युरोपला जाणार होते. पण, शेवटच्या क्षणी व्हिसा मिळाला नाही. त्यामुळे ते जम्मू आणि काश्मीरला गेले.  युरोपचा व्हिसा रद्द झाला म्हणून दोघे फिरायला काश्मीरला गेले. लग्नानंतर त्यांनी युरोपमध्ये हनिमूनचा प्लॅन केला होता. यासाठी व्हिसासाठी देखील अर्ज केला होता. पण ऐनवेळी व्हिसा मिळू शकला नाही आणि युरोपला जाण्याचा कार्यक्रम रद्द झाला. यानंतर, 21 एप्रिल रोजी दोघेही जम्मू आणि काश्मीरला रवाना झाले. 22 एप्रिल रोजी ते पहलगाममधील एका हॉटेलमध्ये थांबले होते. जेवण केल्यानंतर, ते फिरण्यासाठी गेले. त्यावेळी बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी विनय नरवाल यांना गोळ्या झाडून ठार केले होते. लेफ्टनंट विनय यांचा वाढदिवस 8 दिवसांनी 1 मे रोजी होता. लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसासाठी कुटुंबाने पार्टी आयोजित केली होती.  2 मे रोजी त्यांना पत्नीसह ड्युटीसाठी कोचीला परतावे लागणार होते. 

आणखी वाचा

Video: काल मृतदेहासमोर सुन्न होऊन बसली, आज लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन म्हणाली, जय हिंद विनय!

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget