एक्स्प्लोर

लष्करप्रमुखांच्या वक्तव्यानंतर पाक हादरलं, अणूबॉम्बची धमकी

युद्ध झालं आणि सरकारची संमती मिळाली तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू. त्यामुळे अणूबॉम्बच्या धमक्या देणं पाकिस्तानने बंद करावं, असं बिपिन रावत यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली : लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. युद्ध झालंच तर पाकिस्तानात घुसून मारु, अशा शब्दात रावत यांनी पाकला सुनावलं. भारत आणि पाक दरम्यान सध्या वाकयुद्ध सुरु आहे. भारतीय लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी स्पष्ट केलंय, की युद्ध झालं आणि सरकारची संमती मिळाली तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू. त्यामुळे अणूबॉम्बच्या धमक्या देणं पाकिस्तानने बंद करावं. 12 जानेवारीला बिपिन रावत यांनी ही भूमिका मांडली आणि पाकिस्तानला मिरच्या झोंबल्या. त्यामुळे पाकिस्तानचे विदेश मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही त्यावर स्पष्टीकरण दिलं. ''भारतीय सेना प्रमुखांकडून आलेलं विधान जबाबदारीने केलेलं नाही. जर भारत आमच्याकडून अणूबॉम्ब युद्धाची भाषा करत असेल तर आम्हालाही आमची ताकद दाखवून देण्याची संधी आहे. त्यामुळे जनरल बिपिन रावत यांच्या मनातली शंका दूर होईल'', असं ख्वाजा असिफ यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी आपल्याच मंत्र्यांच्या सुरात सूर मिसळला आहे. ''भारताच्या सेना प्रमुखांनी दिलेली धमकी ही भारताच्या नव्या विचारांना स्पष्ट करते. कोणत्याही गैरसमजात राहू नका. कारण, पाकिस्तान आपल्या शस्त्रास्त्रांनीशी पूर्णपणे सज्ज आहे'', असं पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. कुणाची ताकद किती? पाकिस्तानने मोठ-मोठ्या बाता मारण्याच्या आधी एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, की ग्लोबल फायरच्या अहवालानुसार भारत हा जगातला सगळ्यात शक्तिशाली असा चौथा देश आहे, तर पाकिस्तानचा क्रमांक यामध्ये 13 वा आहे.
  • भारताकडे सुमारे साडे 13 लाख सैनिकांची फौज आहे, तर पाकिस्तानकडे 6 लाखांची
  • भारताकडे सुमारे 4426 रनगाडे आहेत, तर पाकिस्तानकडे 2924
  • भारताकडे असणाऱ्या लढाऊ विमानांची संख्या 2100 च्या घरात आहे, तर पाकिस्तानकडे 950
  • भारताकडे 3 विमानवाहक युद्धनौका आहेत, तर पाकिस्तानकडे एकही नाही.
  • भारताकडे 15 पाणबुड्या आहेत, तर पाकिस्तानकडे 8
  • भारताकडे 110 ते 120 अणुबॉम्ब आहेत, तर पाकिस्तानकडे 120 ते 130
म्हणजेच भूमी, जल आणि वायू या तिन्ही पातळ्यांवरच्या युद्धासाठी भारत हा पाकिस्तानपेक्षा 100 टक्के उजवा आहे आणि त्यामुळे जर युद्ध झालं तर 1965, 71 आणि 99 सारख्या युद्धाची परिस्थिती पाकिस्तानला सहन करावी लागू शकते. त्यामुळे लष्कर प्रमुख बिपिन रावतांच्या भूमिकेला पाकिस्तानने अजिबात सल्ला वगैरे न समजता आव्हान समजणं गरजेचं आहे. अन्यथा भारत आपल्या शत्रूशी दोन हात करण्यासाठी भक्कमपणे उभा राहिल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : सुप्रिया सुळेंसमोरच संतोष देशमुखांच्या आईच्या अश्रूंचा फुटला बांध; म्हणाल्या, मी माझं लेकरू कुठं शोधू?
सुप्रिया सुळेंसमोरच संतोष देशमुखांच्या आईच्या अश्रूंचा फुटला बांध; म्हणाल्या, मी माझं लेकरू कुठं शोधू?
Mumbai Crime News: युपीमधील जमिनीच्या वादाचा मुंबईत घेतला बदला! प्रेमाचं नाटक, भेट अन् लोखंडी रॉड व दगडाने ठेचून केला शेवट
युपीमधील जमिनीच्या वादाचा मुंबईत घेतला बदला! प्रेमाचं नाटक, भेट अन् लोखंडी रॉड व दगडाने ठेचून केला शेवट
SIP : शेअर बाजारात घसरण सुरुच, म्युच्युअल फंडमधील SIP थांबवावी की सुरु ठेवावी? सहा प्रमुख मुद्दे
शेअर बाजारात घसरण सुरुच, म्युच्युअल फंडमधील SIP थांबवावी की सुरु ठेवावी? सहा प्रमुख मुद्दे
Shahaji Bapu Patil : एक दिवस आदित्यच उद्धव ठाकरेंना सोडून जाण्याची भाषा करतील, शहाजीबापूंची तुफान टोलेबाजी
एक दिवस आदित्यच उद्धव ठाकरेंना सोडून जाण्याची भाषा करतील, शहाजीबापूंची तुफान टोलेबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar : हर हर महादेव, शिवजयंतीनिमित्त Ambadas Danve यांची तलवारबाजीABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 18 February 2025Chandrahar Patil : एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घ्या; चंद्रहार पाटलांची मागणी, उपोषण करणारABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 18 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : सुप्रिया सुळेंसमोरच संतोष देशमुखांच्या आईच्या अश्रूंचा फुटला बांध; म्हणाल्या, मी माझं लेकरू कुठं शोधू?
सुप्रिया सुळेंसमोरच संतोष देशमुखांच्या आईच्या अश्रूंचा फुटला बांध; म्हणाल्या, मी माझं लेकरू कुठं शोधू?
Mumbai Crime News: युपीमधील जमिनीच्या वादाचा मुंबईत घेतला बदला! प्रेमाचं नाटक, भेट अन् लोखंडी रॉड व दगडाने ठेचून केला शेवट
युपीमधील जमिनीच्या वादाचा मुंबईत घेतला बदला! प्रेमाचं नाटक, भेट अन् लोखंडी रॉड व दगडाने ठेचून केला शेवट
SIP : शेअर बाजारात घसरण सुरुच, म्युच्युअल फंडमधील SIP थांबवावी की सुरु ठेवावी? सहा प्रमुख मुद्दे
शेअर बाजारात घसरण सुरुच, म्युच्युअल फंडमधील SIP थांबवावी की सुरु ठेवावी? सहा प्रमुख मुद्दे
Shahaji Bapu Patil : एक दिवस आदित्यच उद्धव ठाकरेंना सोडून जाण्याची भाषा करतील, शहाजीबापूंची तुफान टोलेबाजी
एक दिवस आदित्यच उद्धव ठाकरेंना सोडून जाण्याची भाषा करतील, शहाजीबापूंची तुफान टोलेबाजी
Torres Scam : टोरेस गैरव्यवहाराबाबत मोठी अपडेट, मुंबईकरांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या टोळीने बल्गेरियात नवा बिझनेस थाटला
टोरेस गैरव्यवहाराबाबत मोठी अपडेट, मुंबईकरांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या टोळीने बल्गेरियात नवा बिझनेस थाटला
Ladki Bahin :लाडकी बहीण योजनेतील झाडाझडती सुरु, मराठवाड्यातील 55 हजार महिलांचे 1500 रुपये बंद होणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची झाडाझडती सुरु, मराठवाड्यातील 55 हजार महिलांचा लाभ बंद होणार?
Harshvardhan Sapkal: हर्षवर्धन सपकाळ फाईव्हस्टार हॉटेल सोडून गिरगावच्या आश्रमात राहिले, रात्रभर जमिनीवर झोपले, काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यांची राजकीय वर्तुळात चर्चा
पंचतारांकित हॉटेल सोडून काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांचा मुक्काम गिरगावच्या आश्रमात, हर्षवर्धन सपकाळ पदभार स्वीकारणार
Maharashtra Weather: मुंबईतील तापमानात प्रचंड चढउतार, यंदाचा उन्हाळा भयंकर? हवामान खात्याचा इशारा
मुंबईतील तापमानात प्रचंड चढउतार, यंदाचा उन्हाळा भयंकर? हवामान खात्याचा इशारा
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.