एक्स्प्लोर

18 October In History : हस्तिदंत, चंदनाचा कुख्यात तस्कर वीरप्पनला सुरक्षा दलांनी केलं ठार, ओम पुरी यांचा जन्मदिवस

On This Day In History : देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 18 ऑक्टोबर या तारखेला ऐतिहासिक महत्त्व आहे. भारतीय सुरक्षा दलांसाठी डोकेदुखी ठरलेला चंदन आणि हस्तिदंताची तस्करी करणारा कुख्यात तस्कर वीरप्पन 18 ऑक्टोबर 2004 रोजी चकमकीत ठार झाला होता.

मुंबई : देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 18 ऑक्टोबर या तारखेला ऐतिहासिक महत्त्व आहे. भारतीय सुरक्षा दलांसाठी डोकेदुखी ठरलेला चंदन आणि हस्तिदंताची तस्करी करणारा कुख्यात तस्कर वीरप्पन 18 ऑक्टोबर 2004 रोजी चकमकीत ठार झाला होता. वीरप्पन जवळपास दोन दशकांपासून सुरक्षा दलांसाठी डोकेदुखी ठरला होता. शेकडो हत्तींना मारून कोट्यवधी रुपयांच्या चंदनाची तस्करी करणाऱ्या वीरप्पनने दीडशेहून अधिक लोकांची हत्या केली होती. यातील निम्म्याहून अधिक पोलीस होते. त्याला जिवंत किंवा मृत पकडण्यासाठी देशातील अनेक राज्यांचे पोलीस आणि सुरक्षा दलांनी जंगलात शोध घेत होते. आजच्याच दिवशी सुरक्षा दलांनी त्याला ठार केलं होत. आजच्याच दिवशी म्हणजे 18 ऑक्टोबर 1950 रोजी अंबाला अंबाला, पंजाब (आता हरियाणा) येथे अभिनेता ओम पुरी यांचा जन्म झाला. ओम पुरी हे हिंदी चित्रपटांचे प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी ब्रिटिश आणि अमेरिकन सिनेमांमध्येही योगदान दिले आहे. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले होते. अमरीश पुरी, नसरूद्दीन शहा, शबाना आझमी आणि स्मिता पाटील यांच्याबरोबर त्यांनी अनेक कलात्मक चित्रपटात काम केले. त्यांनी 1980 मध्ये आलेल्या भवानी भवई, 1981 मधील सद्गती, 1928 मध्ये अर्धसत्य, 1968 मध्ये मिर्च मसाला आणि 1992 मध्ये आलेल्या धारावी चित्रपटात त्यांनी उत्कृष्ठ काम केले होते.

1871: चार्ल्स बॅबेज यांची पुण्यतिथी, ते पहिल्या यांत्रिकी संगणकाचे जनक होते

1820 मध्ये चार्ल्स बॅबेजने ज्या तत्वावर यांत्रिक गणकयंत्र आणि डिफरन्स इंजिनची रचना आणि निर्मिती केली होती. त्याच तत्वावरून आधुनिक इलेक्ट्रॉनिक संगणकाची कल्पना केली गेली आहे. बॅबेजने मांडलेली संकल्पना अखेरीस अभियंत्यांनी पहिल्या कॉम्प्युटर प्रोटोटाइपच्या विकासासाठी वापरली. यामुळे चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचे जनक म्हणून ओळखले जाते.

1925: नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक इब्राहीम अलकाजी यांचा जन्मदिन

इब्राहीम अलकाजी यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1925 रोजी पुण्यात झाला. ते भारतीय रंगभूमीचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी संचालक होते. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामासोबत त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले. इब्राहीम अलकाजी यांनी त्यांच्या हयातीत अभिनेत्यांच्या अनेक पिढ्या घडवल्या. या कलाकारांमध्ये नसीरुद्दीन शाह आणि ओम पुरी यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांची नावे आहेत. इब्राहीम अलकाजी यांनी दिग्दर्शित केलेल्या काही प्रमुख नाटकांमध्ये 'तुघलक' (गिरीश कर्नाड), 'आषाढ का एक दिन' (मोहन राकेश), धरमवीर भारतीचे 'अंधा युग' याशिवाय अनेक ग्रीक शोकांतिका आणि शेक्सपियरच्या कामांचा समावेश आहे. इब्राहीम अलकाजी यांना पद्मविभूषण (2010), पद्मभूषण (1991) आणि पद्मश्री (1966) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

1931: थॉमस अल्वा एडिसन यांची पुण्यतिथी

महान अमेरिकन शोधक आणि उद्योगपती थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1847 रोजी झाला. त्यांचं निधन 18 ऑक्टोबर 1931 रोजी झालं. त्याच्या नावावर 1,093 पेटंट आहेत. त्यांचा इलेक्ट्रिक बल्बचा शोध हा त्यांचा सर्वात मोठा शोध मानला जातो.

1951: पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार हिराबाई पेडणेकर यांची पुण्यतिथी 

हिराबाई पेडणेकर या पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार होत्या. त्यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1886 रोजी सावंतवाडीमध्ये संगीत, नृत्याची जाण असणार्‍या घराण्यामध्ये झाला. त्यांचं निधन 18 ऑक्टोबर 1951 रोजी झालं. हिराबाईंनी लिहिलेल्या नाटकांपैकी ‘जयद्रथ विडंबन’ (1904) व ‘संगीत दामिनी’ (1912) या नाटकांचा विशेष गाजली होती.

1983: विजय मांजरेकर यांचा जन्मदिवस 

विजय मांजरेकर हे माजी भारतीय क्रिकेटपटू होते. 1951-52 ते 1965 पर्यंत त्यांनी भारतीय क्रिकेट संघासाठी कसोटी क्रिकेट खेळले. ते माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांचे वडील आहेत. संजय मांजरेकर यांनी भारतासाठी 37 कसोटी आणि 74 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले. विजय मांजरेकर हे प्रामुख्याने उजव्या हाताचा फलंदाज होते. त्यांनी 55 कसोटी सामने खेळले. ज्यात त्यांनी 3208 धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Divija Fadnavis on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget