एक्स्प्लोर

Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघातातील 83 मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही, तपासासाठी रेल्वे वापरणार AI तंत्रज्ञान

Balasore Train Accident : ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातातील मृतदेहांची ओळख पटवण्यात प्रशासन सतत गुंतलं आहे.

Odisha Train Accident : ओडिशातील (Odisha) बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत 288 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातातील मृतदेहांची ओळख पटवण्यात प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, भारतीय रेल्वे जीव गमावलेल्या लोकांची ओळख पटवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (Artificial Intelligence) चालणारी वेबसाइट आणि सिम कार्ड ट्रायंग्युलेशन (SIM Card Triangulation) वापरत आहे.

बेपत्ता लोकांचा शोध घेणे हे आमचे ध्येय : रेल्वेमंत्री

ओडिशा रेल्वे अपघातातील अनेक जण अद्यापही बेपत्ता आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे की, "बेपत्ता झालेल्यांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर त्यांच्या नातेवाईकांना भेटता यावे, हा आमचा उद्देश आहे. ते लवकरात लवकर सापडावेत यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. आमची जबाबदारी अजून संपलेली नाही."

ओडिशा रेल्वे अपघातात 288 जणांचा मृत्यू

ओडिशातील बालासोर येथे तीन ट्रेनची धडक होऊन भीषण अपघात घडला. ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालासोर रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 288 वर पोहोचली आहे. यापैकी 193 मृतदेह भुवनेश्वर येथील एम्समध्ये तर 94 मृतदेह बालासोर येथील विविध रुग्णालयांमध्ये ठेवण्यात आले होते. पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिंकेश रॉय यांनी सांगितले की, ओडिशाच्या विविध रुग्णालयांमध्ये 200 हून अधिक लोक उपचार सुरु असून इतर जखमींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोमंडल ट्रेन दुर्घटना कधी आणि कशी घडली?

कोरोमंडल एक्सप्रेस 2 जून रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास एका थांबलेल्या मालगाडीवर धडकली. अपघातात त्याचे बहुतांश डबे रुळावरून घसरले. त्यानंतर त्याचवेळी जाणाऱ्या बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेसच्या डब्यांशी त्याचे काही डबे आदळले. अपघातामागे मानवी चूक, सिग्नल बिघाड आणि इतर संभाव्य कारणांचा शोध सुरू आहे. ते लवकरच उघड होईल.

रेल्वे अपघाताची सीबीआय चौकशी होणार

ओडिशा रेल्वे अपघाताच्या प्रकरणाची चौकशी आधीच सुरू आहे, मात्र आता सीबीआय चौकशीही केली जाईल आणि दोषीवर कारवाई करण्यात येईल. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, दोषींना शिक्षा करण्यास सरकार मागेपुढे पाहणार नाही.

मानवी चुकीमुळे घडला अपघात?

या रेल्वे अपघाताचं खरं कारण समोर आलं आहे. इलेक्ट्रॉनिक इंटर लॉकींग सिस्टीममुळे (Electronic Inter Locking System) घडल्याचं समोर आलं आहे. या सिग्नल यंत्रणेत काही बदल केल्यामुळे हा अपघात झाल्याचं कळतंय. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी ही माहिती दिली. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी हे कारण शोधून काढल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या रेल्वे सेवा पूर्ववत करण्यावर भर असल्याचंही रेल्वेमंत्री म्हणाले.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Odisha Train Accidnet: ओडिशा रेल्वे अपघाताची सीबीआय चौकशी होणार; रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सरकारी नोकरीची मोठी संधी! रेल्वेत 11 हजाराहून अधिक पदांसाठी भरती, काय आहे पात्रता? कसा कराल अर्ज?
सरकारी नोकरीची मोठी संधी! रेल्वेत 11 हजाराहून अधिक पदांसाठी भरती, काय आहे पात्रता? कसा कराल अर्ज?
पेट्रोलच्या पाठोपाठ औद्योगिक डिझेलच्याही दरात मोठी वाढ, वाहतूक खर्चावर परिणाम, नेमकी किती झाली वाढ?
पेट्रोलच्या पाठोपाठ औद्योगिक डिझेलच्याही दरात मोठी वाढ, वाहतूक खर्चावर परिणाम, नेमकी किती झाली वाढ?
Post Office Yojana : एकदाच गुंतवणूक करा, दरमहा 17000 रुपये मिळवा, जाणून घ्या पोस्टाच्या भन्नाट योजनेबद्दल माहिती 
Post Office Yojana : एकदाच गुंतवणूक करा, दरमहा 17000 रुपये मिळवा, जाणून घ्या पोस्टाच्या भन्नाट योजनेबद्दल माहिती 
Rupee Plunged to Record Low: भारताचा रुपया अक्षरश: रक्तबंबाळ; देशाच्या इतिहासात प्रथमच डाॅलरच्या तुलनेत तब्बल 93.15 या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला
भारताचा रुपया अक्षरश: रक्तबंबाळ; देशाच्या इतिहासात प्रथमच डाॅलरच्या तुलनेत तब्बल 93.15 या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला

व्हिडीओ

Praful Patel On Rupali Chakankar Ashok Kharat Case मोठी बातमी: अशोक खरात अतिशय घाणेरडा, जे कुणी त्याच्यासोबत...; प्रफुल पटेल यांचं मोठं विधान
Sushma Andhare : चाकणकर रात्री दोन वाजता फोन करून पीडितांना धमक्या द्यायच्या; खरात अन् चाकणकरांमध्ये कोणत्या वेळी काय बोलणं झालं
Iran vs US Israel Conflict : नजर अमेरिकेवर, युद्ध उंबरठ्यावर? Special Report
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat : अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
Satara : साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
Rupali Chakankar : अरविंद शिंदे म्हणतात, रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, गरज पडल्यास काँग्रेसमध्ये घेण्यासाठी शिफारस करु, यावर अतुल लोंढे म्हणाले...
रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची भूमिका; अतुल लोंढे म्हणतात ती शिंदेंची वैयक्तिक भूमिका
Mahesh Shinde : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीनंतर साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
Shambhuraj Desai : सुरुवात भाजपनं केलीय, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शेवट करु, शंभूराज देसाईंचा जिल्हा परिषदेतील घडामोडींनंतर थेट इशारा
कामेश कांबळेंना शिवेंद्रराजे भोसले यांनी दम दिला, जिल्हा परिषदेत काय घडलं? शंभूराज देसाईंनी सगळं सांगितलं
'आगीशी खेळ खेळू नका, तुम्हाला जर खुमखुमी असेल, तर..' जयंत पाटलांनी झेडपी विजयाची 'छुपी मदत' जाहीरपणे सांगताच संजयकाका संतापले! सांगलीत वादाचा नवा अध्याय सुरु
'आगीशी खेळ खेळू नका, तुम्हाला जर खुमखुमी असेल, तर..' जयंत पाटलांनी झेडपी विजयाची 'छुपी मदत' जाहीरपणे सांगताच संजयकाका संतापले! सांगलीत वादाचा नवा अध्याय सुरु
'जर तुम्ही आमच्या रस्त्यांची नासधूस केली तर...' लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकून उकिरडा करणाऱ्या दोन भारतीयांना जबरी दणका
'जर तुम्ही आमच्या रस्त्यांची नासधूस केली तर...' लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकून उकिरडा करणाऱ्या दोन भारतीयांना जबरी दणका
Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषदेत भाजप सत्तेत, राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना पोलिसांनी उचललं तर शंभूराज देसाईंना दुखापत, साताऱ्यात कोण कोण फुटलं?  
सातारा जिल्हा परिषदेत हाय व्होल्टेज ड्रामा, भाजपची सत्ता तर राष्ट्रवादीच्या दोघांना पोलिसांनी उचललं, देसाईंना दुखापत, कोण फुटलं?
Embed widget