एक्स्प्लोर

Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघातातील 83 मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही, तपासासाठी रेल्वे वापरणार AI तंत्रज्ञान

Balasore Train Accident : ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातातील मृतदेहांची ओळख पटवण्यात प्रशासन सतत गुंतलं आहे.

Odisha Train Accident : ओडिशातील (Odisha) बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत 288 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातातील मृतदेहांची ओळख पटवण्यात प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, भारतीय रेल्वे जीव गमावलेल्या लोकांची ओळख पटवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (Artificial Intelligence) चालणारी वेबसाइट आणि सिम कार्ड ट्रायंग्युलेशन (SIM Card Triangulation) वापरत आहे.

बेपत्ता लोकांचा शोध घेणे हे आमचे ध्येय : रेल्वेमंत्री

ओडिशा रेल्वे अपघातातील अनेक जण अद्यापही बेपत्ता आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे की, "बेपत्ता झालेल्यांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर त्यांच्या नातेवाईकांना भेटता यावे, हा आमचा उद्देश आहे. ते लवकरात लवकर सापडावेत यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. आमची जबाबदारी अजून संपलेली नाही."

ओडिशा रेल्वे अपघातात 288 जणांचा मृत्यू

ओडिशातील बालासोर येथे तीन ट्रेनची धडक होऊन भीषण अपघात घडला. ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालासोर रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 288 वर पोहोचली आहे. यापैकी 193 मृतदेह भुवनेश्वर येथील एम्समध्ये तर 94 मृतदेह बालासोर येथील विविध रुग्णालयांमध्ये ठेवण्यात आले होते. पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिंकेश रॉय यांनी सांगितले की, ओडिशाच्या विविध रुग्णालयांमध्ये 200 हून अधिक लोक उपचार सुरु असून इतर जखमींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोमंडल ट्रेन दुर्घटना कधी आणि कशी घडली?

कोरोमंडल एक्सप्रेस 2 जून रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास एका थांबलेल्या मालगाडीवर धडकली. अपघातात त्याचे बहुतांश डबे रुळावरून घसरले. त्यानंतर त्याचवेळी जाणाऱ्या बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेसच्या डब्यांशी त्याचे काही डबे आदळले. अपघातामागे मानवी चूक, सिग्नल बिघाड आणि इतर संभाव्य कारणांचा शोध सुरू आहे. ते लवकरच उघड होईल.

रेल्वे अपघाताची सीबीआय चौकशी होणार

ओडिशा रेल्वे अपघाताच्या प्रकरणाची चौकशी आधीच सुरू आहे, मात्र आता सीबीआय चौकशीही केली जाईल आणि दोषीवर कारवाई करण्यात येईल. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, दोषींना शिक्षा करण्यास सरकार मागेपुढे पाहणार नाही.

मानवी चुकीमुळे घडला अपघात?

या रेल्वे अपघाताचं खरं कारण समोर आलं आहे. इलेक्ट्रॉनिक इंटर लॉकींग सिस्टीममुळे (Electronic Inter Locking System) घडल्याचं समोर आलं आहे. या सिग्नल यंत्रणेत काही बदल केल्यामुळे हा अपघात झाल्याचं कळतंय. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी ही माहिती दिली. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी हे कारण शोधून काढल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या रेल्वे सेवा पूर्ववत करण्यावर भर असल्याचंही रेल्वेमंत्री म्हणाले.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Odisha Train Accidnet: ओडिशा रेल्वे अपघाताची सीबीआय चौकशी होणार; रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Noida Worker Protest: 'दिवसाला 10-12 तास काम, 25 हजार सांगतात आणि हातावर 15 हजार टेकवतात आणि 250 ची वाढ करतात' नोएडामधील सहा खासगी कंपन्यांविरोधात आक्रोश केलेल्या कामगारांची व्यथा
'दिवसाला 10-12 तास काम, 25 हजार सांगतात आणि हातावर 15 हजार टेकवतात आणि 250 ची वाढ करतात' नोएडामधील सहा खासगी कंपन्यांविरोधात आक्रोश केलेल्या कामगारांची व्यथा
Chandra Kumar Bose: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नातवाचा तृणमुल काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; म्हणाले, 'भाजपचं विभाजनकारी जातीय द्वेषाचं राजकारण, आपल्याला भारताला वाचवण्यासाठी लढायचं आहे'
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नातवाचा तृणमुल काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; म्हणाले, 'भाजपचं विभाजनकारी जातीय द्वेषाचं राजकारण, आपल्याला भारताला वाचवण्यासाठी लढायचं आहे'
उत्तर प्रदेशात पगारवाढीसाठी सहा कंपन्यातील कामगारांचा एकाचवेळी उद्रेक; पोलिसांची वाहने उलथवून टाकली, कंपनीवर तुफान दगडफेक, महिला कर्मचारी सुद्धा रस्त्यावर
उत्तर प्रदेशात पगारवाढीसाठी सहा कंपन्यातील कामगारांचा एकाचवेळी उद्रेक; पोलिसांची वाहने उलथवून टाकली, कंपनीवर तुफान दगडफेक, महिला कर्मचारी सुद्धा रस्त्यावर
Share Market Today: बाजार सुरु होताच सेन्सेक्स 1500 अंकांनी कोसळला; निफ्टी सुद्धा 450 हून अधिक अंकांनी खाली
बाजार सुरु होताच सेन्सेक्स 1500 अंकांनी कोसळला; निफ्टी सुद्धा 450 हून अधिक अंकांनी खाली

व्हिडीओ

Yavatmal Water Issue : पाण्यासाठी वणवण, लालफितीची अडचण Special Report
Ashok Kharat Case : कारनामे नवीन कोट्यवधींची जमीन, कल्पना खरात अजूनही फरार Special Report
Sangli Old Age Home : सांगलीत उभी राहिली ज्येष्ठांसाठी आनंदशाळा, सर्वत्र कौतुक Special Report
US Talks Fail : टॉक्स वाया, सरसावल्या बाह्या, वाटाघाटीत अपयश, पुन्हा शाब्दिक हल्ले Special Report
Pakistan On US Iran Talks : बेगानी दलाली मे पाकिस्तान दिवाना Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Mhada Scam: नाशिकमधील म्हाडा घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट, महसूलमंत्र्यांकडून SIT गठीत; बिल्डर लॉबीमध्ये खळबळ
नाशिकमधील म्हाडा घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट, महसूलमंत्र्यांकडून SIT गठीत; बिल्डर लॉबीमध्ये खळबळ
इंस्टाग्रामवरुन मैत्री, तरुणीकडून लैंगिक अत्याचाराची तक्रार; बीडच्या आरोपीला पुण्यातून अटक, बंजरंग दल आक्रमक
इंस्टाग्रामवरुन मैत्री, तरुणीकडून लैंगिक अत्याचाराची तक्रार; बीडच्या आरोपीला पुण्यातून अटक, बंजरंग दल आक्रमक
Hardik Pandya Viral video: पांड्या बंधूंमध्ये बिनसलं की मैदानातील ईर्ष्येचा राग? आता दोघांमध्ये संशयाचा धूर करणारा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल!
Video: पांड्या बंधूंमध्ये बिनसलं की मैदानातील ईर्ष्येचा राग? आता दोघांमध्ये संशयाचा धूर करणारा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल!
Noida Worker Protest: 'दिवसाला 10-12 तास काम, 25 हजार सांगतात आणि हातावर 15 हजार टेकवतात आणि 250 ची वाढ करतात' नोएडामधील सहा खासगी कंपन्यांविरोधात आक्रोश केलेल्या कामगारांची व्यथा
'दिवसाला 10-12 तास काम, 25 हजार सांगतात आणि हातावर 15 हजार टेकवतात आणि 250 ची वाढ करतात' नोएडामधील सहा खासगी कंपन्यांविरोधात आक्रोश केलेल्या कामगारांची व्यथा
मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय; आशाताईंना राज्य सरकारची अनोखी आदरांजली
मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय; आशाताईंना राज्य सरकारची अनोखी आदरांजली
माझा भाऊ इथं आयजी आहे, त्याला मला धर्मसंकटात टाकायचं नाही; नांगरे पाटलांनी सांगितला आशाताईंचा किस्सा
माझा भाऊ इथं आयजी आहे, त्याला मला धर्मसंकटात टाकायचं नाही; नांगरे पाटलांनी सांगितला आशाताईंचा किस्सा
Asha Bhosle and Uddhav Thackeray: आशाताईंना शेवटचा निरोप द्यायला आवडता चाफ्याचा हार घेऊन पोहोचले, उद्धव ठाकरेंच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या, हळूच चष्मा बाजूला सारुन डोळे पुसले
आशाताईंना शेवटचा निरोप द्यायला आवडता चाफ्याचा हार घेऊन पोहोचले, उद्धव ठाकरेंच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या, हळूच चष्मा बाजूला सारुन डोळे पुसले
Vaibhav Sooryavanshi: थेट बुमराहला 'अस्मान' दाखवणाऱ्या वैभव सूर्यवंशीच्या हातात बॅटरुपी 'बुलडोझर'! आयपीएलमध्ये तब्बल 19 गोलंदाजांची धुलाई, फक्त या 4 जणांना रोखण्यात यश
थेट बुमराहला 'अस्मान' दाखवणाऱ्या वैभव सूर्यवंशीच्या हातात बॅटरुपी 'बुलडोझर'! आयपीएलमध्ये तब्बल 19 गोलंदाजांची धुलाई, फक्त या 4 जणांना रोखण्यात यश
Embed widget