एक्स्प्लोर

शाळेतील विद्यार्थ्यांना आता महाभारत आणि रामायणाचे पाठ मिळणार, देशभक्ती आणि स्वाभिमान वाढवण्यासाठी NCERT पॅनेलची शिफारस

Ramayana Mahabharata In school textbooks: गेल्या वर्षी स्थापन करण्यात आलेल्या सात सदस्यीय समितीने सामाजिक शास्त्राच्या पुस्तकांमध्ये रामायण आणि महाभारताचा समावेश करण्याची शिफारस केली होती.

नवी दिल्ली : मुलांमध्ये लहान वयातच स्वाभिमान, देशभक्ती आणि राष्ट्रप्रेम वाढवण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात महाभारत आणि रामायणाच्या अभ्यासाचा समावेश करण्यात येणार आहे. एनसीईआरटीच्या (NCERT) पॅनेलने ही शिफारस केली असून त्याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल, रिसर्च अँड ट्रेनिंग म्हणजे एनसीईआरटीने शालेय अभ्यासक्रमात सुधारणा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती (NCERT Panel) स्थापन केली होती. समितीने रामायण आणि महाभारत यांसारख्या महाकाव्यांचा पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करण्याची आणि शाळांमधील वर्गखोल्यांच्या भिंतींवर राज्यघटनेची प्रस्तावना लिहिण्याची शिफारस केली आहे. समितीचे अध्यक्ष सीआय इसाक यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

मुलांमध्ये राष्ट्रप्रेम वाढवण्यासाठी शिफारस

इयत्ता 7 ते 12 च्या विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारत शिकवणे महत्त्वाचे आहे यावर समितीचे अध्यक्ष सीआय इसाक यांनी भर दिला. ते म्हणाले की, "समितीने सामाजिक शास्त्राच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारत यांसारखी महाकाव्ये शिकवण्यावर भर दिला आहे. आमचा विश्वास आहे की किशोरावस्थेत विद्यार्थ्यामध्ये स्वाभिमान, देशभक्ती आणि आपल्या राष्ट्राचा अभिमान वाढतो."

'विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचा अभाव'

एनसीईआरटी समितीचे अध्यक्ष सीआय इसाक म्हणाले की, देशभक्तीच्या अभावामुळे दरवर्षी हजारो विद्यार्थी देश सोडून इतर देशांचे नागरिकत्व घेतात. त्यामुळे त्यांची मूळे समजून घेऊन त्यांच्या देशाबद्दल आणि संस्कृतीबद्दल प्रेम वाढवणे गरजेचे आहे. सध्या काही शिक्षण मंडळे विद्यार्थ्यांना रामायण शिकवतात, मात्र ते मिथक म्हणून शिकवतात. जर ही महाकाव्ये विद्यार्थ्यांना शिकवली गेली नसती तर शिक्षण पद्धतीचा कोणताही उद्देश नाही आणि ती राष्ट्रसेवा ठरणार नाही. पॅनेलने इयत्ता 3 ते 12 वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये प्राचीन इतिहासाऐवजी 'शास्त्रीय इतिहास' समाविष्ट करण्याची आणि 'इंडिया' नाव बदलून 'भारत' करण्याची शिफारस केली होती.

NSTC अंतिम करण्याचा विचार करेल

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी स्थापन करण्यात आलेल्या सात सदस्यीय समितीने सामाजिक शास्त्राच्या अभ्यासक्रमासाठी अनेक शिफारसी केल्या आहेत. या शिफारशी एनसीईआरटीच्या नवीन पुस्तकांसाठी महत्त्वाचे निर्देशात्मक दस्तऐवज आहेत. राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि अध्यापन साहित्य समितीद्वारे (NSTC) जुलैमध्ये वर्गांसाठी अभ्यासक्रम, पुस्तके आणि शिक्षण सामग्री अंतिम करण्यासाठी समितीच्या शिफारशींचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.

पुढील सत्रात नवीन पुस्तके येऊ शकतात

अलीकडेच NSTC ने सामाजिक शास्त्रांसाठी अभ्यासक्रम आणि शिक्षक शिक्षण सामग्री विकसित करण्यासाठी एक अभ्यासक्रम क्षेत्र गट (CAG) देखील तयार केला आहे.  NCERT राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 नुसार शालेय अभ्यासक्रमात सुधारणा करत आहे. एनसीईआरटीची नवीन पुस्तके पुढील शैक्षणिक सत्रापर्यंत तयार होण्याची शक्यता आहे.

ही बातमी वाचा: 

 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक; पाणी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला जाणार
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक; पाणी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला जाणार
K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईंचा पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईंचा पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
देशात NEET घोटाळा, CBSEचा तमाशा सुरु असतानाच दिल्लीतील स्कूल ऑफ प्लॅनिंगच्या इमारतीत आगीचा भडका; कार्यालयातील आग संशयास्पद असल्याचा काँग्रेसचा आरोप
देशात NEET घोटाळा, CBSEचा तमाशा सुरु असतानाच दिल्लीतील स्कूल ऑफ प्लॅनिंगच्या इमारतीत आगीचा भडका; कार्यालयातील आग संशयास्पद असल्याचा काँग्रेसचा आरोप
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री

व्हिडीओ

Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report
Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
Embed widget