एक्स्प्लोर

Independence Day 2022 : 'स्वातंत्र्यसैनिक' म्हणून सिद्ध करण्यासाठी तब्बल 32 वर्ष संघर्ष; मुंबईतील 91 वर्षांच्या स्वातंत्र्यसैनिकाची कहाणी नेमकी काय?

Independence Day 2022 : स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील 91 वर्षीय स्वातंत्र्यसैनिक गौर हरी दास यांची कहाणी जाणून घ्या.

Independence Day 2022 : भारताच्या स्वातंत्र्याला यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील 91 वर्षीय स्वातंत्र्यसैनिक गौर हरी दास (Gour Hari Das) यांची संघर्षमय कहाणी  सांगणार आहोत. ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्याबरोबर जवळून काम केले आहे. पण, दुर्दैवाने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांना स्वतःला "स्वातंत्र्यसैनिक" म्हणून सिद्ध करण्यासाठी 32 वर्ष संघर्ष करावा लागला. काय आहे गौर हरी दास यांची कहाणी..जाणून घ्या. 

32 वर्षांचा संघर्ष : 

गौर हरी दास हे मूळचे ओरिसाचे असून, गेल्या चार ते पाच दशकांपासून आपल्या कुटुंबासह मुंबईत राहतात. सेनानी गौर हरी दास सांगतात की, माझ्या मुलाला पूर्वीच्या स्वातंत्र्यसैनिक कोट्यातून अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने स्वत:ला स्वातंत्र्यसैनिक म्हणून सिद्ध करण्याचा त्यांचा लढा सुरू झाला. त्याच वर्षी त्यांनी स्वतःला स्वातंत्र्यसैनिक म्हणून सिद्ध करायचं ठरवलं. गौर हरी दास मूळचे ओरिसाचे असल्याने त्यांनी ओडिशातच स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. त्यामुळेच महाराष्ट्र सरकार इतर राज्यांतील माजी स्वातंत्र्यसैनिकांना मदत करत नाही, असे त्यांना अनेकदा ऐकायला मिळाले. आणि मग या कामासाठी ते तब्बल 32 वर्ष जिल्हाधिकारी कार्यालय ते मंत्रालयापर्यंत फिरत राहिले. अखेर 32 वर्षांच्या प्रदीर्घ कायदेशीर लढ्यानंतर 2008 साली त्यांना माजी स्वातंत्र्यसैनिक असल्याचा दाखला मिळाला.

महात्मा गांधींची मुलाखत

महात्मा गांधींसोबतच्या त्यांच्या पहिल्या आणि शेवटच्या भेटीची आठवण करून देत गौर हरी दास सांगतात की, "मी बापूंना भेटलो तेव्हा मी अवघ्या 14 वर्षांचा असावा. बापूंनी माझ्या कामाचे कौतुक केले. मी वयाच्या 16 व्या वर्षी देश स्वतंत्र झाला. पण, मी ठरवले की मी माझे जीवन महात्मा गांधींच्या विचारांवर पुढे जाणार आहे. 

वानर सेना काय होती? 

आम्ही "वानार सेना" म्हणून काम करायचो. स्वातंत्र्यसैनिकांची पत्रे त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचविणे आणि कुटुंबाकडून मिळालेली पत्रे त्या स्वातंत्र्यसैनिकांना परत करणे हे आमचे काम होते. आम्ही एका स्वातंत्र्यसैनिकाचे पत्र दुसऱ्या स्वातंत्र्यसैनिकालाही पाठवायचो. पत्रांची देवाणघेवाण करताना गोपनीयतेची काळजी घ्यावी लागायची. 

तुरुंगातील दिवस 

गौर हरी दास तुरुंगातील दिवसाबद्दल बोलताना म्हणाले की, "तिरंगा ध्वज फडकवल्याबद्दल मला एकूण 46 दिवस तुरुंगात ठेवण्यात आले. आम्ही राजकीय कैदी असल्यामुळे आम्हाला सामान्य कैद्यांपासून वेगळे ठेवण्यात आले होते. तुरुंगात असताना एक दिवस जेवण वाटपावरून दोन गटात मारामारी झाली, जी नंतर पोलिसांनी शांत केली."

ओरिसा ते बिहार प्रवास (आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत काम)

ओरिसात बरीच वर्ष काम केल्यानंतर मला वाटले की, देशासाठी काम करायचे असेल तर ओरिसाच्या बाहेर काम करावे. म्हणूनच मी ओरिसातून बिहारला गेलो. तिथे मला आचार्य विनोबा भावे भेटले. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत सहभागी होऊन मी जवळपास एक वर्ष बिहारमध्ये काम केले.

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates : महाराष्ट्राच्या राजकारणात अन् प्रशासनात मोठ्या घडामोडी; मनोज जरांगे पाटलांचे आजपासून आमरण उपोषण, तर पुण्यात विषारी दारूकांडानंतर पोलिसांवर बडगा!
Maharashtra Live Updates : महाराष्ट्राच्या राजकारणात अन् प्रशासनात मोठ्या घडामोडी; मनोज जरांगे पाटलांचे आजपासून आमरण उपोषण, तर पुण्यात विषारी दारूकांडानंतर पोलिसांवर बडगा!
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Rahul Gandhi: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या
Video: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News: वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
Mumbai CNG News : मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
Vaibhav Sooryavanshi RR vs GT IPL 2026: पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
Embed widget