एक्स्प्लोर

Independence Day 2022 : 'स्वातंत्र्यसैनिक' म्हणून सिद्ध करण्यासाठी तब्बल 32 वर्ष संघर्ष; मुंबईतील 91 वर्षांच्या स्वातंत्र्यसैनिकाची कहाणी नेमकी काय?

Independence Day 2022 : स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील 91 वर्षीय स्वातंत्र्यसैनिक गौर हरी दास यांची कहाणी जाणून घ्या.

Independence Day 2022 : भारताच्या स्वातंत्र्याला यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील 91 वर्षीय स्वातंत्र्यसैनिक गौर हरी दास (Gour Hari Das) यांची संघर्षमय कहाणी  सांगणार आहोत. ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्याबरोबर जवळून काम केले आहे. पण, दुर्दैवाने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांना स्वतःला "स्वातंत्र्यसैनिक" म्हणून सिद्ध करण्यासाठी 32 वर्ष संघर्ष करावा लागला. काय आहे गौर हरी दास यांची कहाणी..जाणून घ्या. 

32 वर्षांचा संघर्ष : 

गौर हरी दास हे मूळचे ओरिसाचे असून, गेल्या चार ते पाच दशकांपासून आपल्या कुटुंबासह मुंबईत राहतात. सेनानी गौर हरी दास सांगतात की, माझ्या मुलाला पूर्वीच्या स्वातंत्र्यसैनिक कोट्यातून अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने स्वत:ला स्वातंत्र्यसैनिक म्हणून सिद्ध करण्याचा त्यांचा लढा सुरू झाला. त्याच वर्षी त्यांनी स्वतःला स्वातंत्र्यसैनिक म्हणून सिद्ध करायचं ठरवलं. गौर हरी दास मूळचे ओरिसाचे असल्याने त्यांनी ओडिशातच स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. त्यामुळेच महाराष्ट्र सरकार इतर राज्यांतील माजी स्वातंत्र्यसैनिकांना मदत करत नाही, असे त्यांना अनेकदा ऐकायला मिळाले. आणि मग या कामासाठी ते तब्बल 32 वर्ष जिल्हाधिकारी कार्यालय ते मंत्रालयापर्यंत फिरत राहिले. अखेर 32 वर्षांच्या प्रदीर्घ कायदेशीर लढ्यानंतर 2008 साली त्यांना माजी स्वातंत्र्यसैनिक असल्याचा दाखला मिळाला.

महात्मा गांधींची मुलाखत

महात्मा गांधींसोबतच्या त्यांच्या पहिल्या आणि शेवटच्या भेटीची आठवण करून देत गौर हरी दास सांगतात की, "मी बापूंना भेटलो तेव्हा मी अवघ्या 14 वर्षांचा असावा. बापूंनी माझ्या कामाचे कौतुक केले. मी वयाच्या 16 व्या वर्षी देश स्वतंत्र झाला. पण, मी ठरवले की मी माझे जीवन महात्मा गांधींच्या विचारांवर पुढे जाणार आहे. 

वानर सेना काय होती? 

आम्ही "वानार सेना" म्हणून काम करायचो. स्वातंत्र्यसैनिकांची पत्रे त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचविणे आणि कुटुंबाकडून मिळालेली पत्रे त्या स्वातंत्र्यसैनिकांना परत करणे हे आमचे काम होते. आम्ही एका स्वातंत्र्यसैनिकाचे पत्र दुसऱ्या स्वातंत्र्यसैनिकालाही पाठवायचो. पत्रांची देवाणघेवाण करताना गोपनीयतेची काळजी घ्यावी लागायची. 

तुरुंगातील दिवस 

गौर हरी दास तुरुंगातील दिवसाबद्दल बोलताना म्हणाले की, "तिरंगा ध्वज फडकवल्याबद्दल मला एकूण 46 दिवस तुरुंगात ठेवण्यात आले. आम्ही राजकीय कैदी असल्यामुळे आम्हाला सामान्य कैद्यांपासून वेगळे ठेवण्यात आले होते. तुरुंगात असताना एक दिवस जेवण वाटपावरून दोन गटात मारामारी झाली, जी नंतर पोलिसांनी शांत केली."

ओरिसा ते बिहार प्रवास (आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत काम)

ओरिसात बरीच वर्ष काम केल्यानंतर मला वाटले की, देशासाठी काम करायचे असेल तर ओरिसाच्या बाहेर काम करावे. म्हणूनच मी ओरिसातून बिहारला गेलो. तिथे मला आचार्य विनोबा भावे भेटले. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत सहभागी होऊन मी जवळपास एक वर्ष बिहारमध्ये काम केले.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
जनता मालक तर  शिक्षणमंत्री हे सेवक, जनतेने राजीनामा मागितला तर तो दिला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर काय म्हणाले अण्णा हजारे?
जनता मालक तर  शिक्षणमंत्री हे सेवक, जनतेने राजीनामा मागितला तर तो दिला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर काय म्हणाले अण्णा हजारे?
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget