एक्स्प्लोर

ना फ्रान्स ना इटली, आकाश अंबानीचं लग्न 'या' मंदिरात?

हिमालयाच्या गिरीशिखरांमध्ये वसलेल्या रुद्रप्रयागमधल्या त्रियुगी नारायण मंदिरात मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आकाश आणि श्लोका मेहता यांचा विवाह होणार आहे

मुंबई : त्रियुगी नारायण मंदिर... इथे शिव आणि पार्वतीचा विवाह सोहळा झाल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे इथे झालेली लग्नं सात जन्म टिकतात, अशी भक्तांची धारणा आहे. हिमालयाच्या गिरीशिखरांमध्ये वसलेल्या त्याच रुद्रप्रयागमधल्या त्रियुगी नारायण मंदिरात होणार आहे आशियातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या मोठ्या मुलाचं लग्न. मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आकाश अंबानी आणि श्लोका मेहता याच मंदिरामध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. पण प्रश्न असा आहे, की आशिया खंडातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या मुलाचं लग्न अशा कडेकपारीतल्या छोट्याशा गावातल्या एका लहानशा मंदिरात का होत आहे? खरं तर अंबानी यांच्या मुलाचं लग्न एखाद्या प्रायव्हेट बीचवर किंवा एखाद्या प्रायव्हेट हिल स्टेशनवरही करता आलं असतं. देशातलंच काय, परदेशातलं सर्वात महागडं हॉटेलही अंबानी सहज बुक करु शकतात. पण तसं न करता अंबानी यांनी हेच मंदिर का निवडलं? अनंत अंबानी आणि राधिकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल हिंदू मान्यतेनुसार, त्रियुगी नारायण मंदिराच्या जवळच असलेल्या गौरीकुंडामध्ये तपश्चर्या करुन पार्वतीनं भगवान शंकरांना प्रसन्न केलं होतं. त्यानंतर या दोघांचा विवाहसोहळा याच त्रियुगी नारायण मंदिरात पार पडला. या मंदिरात असलेला अग्नी हा तीन युगांपासून विझलेला नाही. त्रेता युग, द्वापार युग आणि कलियुगातही हा अग्नी अखंड तेवत आहे, असं मानलं जातं. याच अग्नीला साक्षी मानून शंकर आणि पार्वती लग्नबंधनात अडकले. या लग्नात पार्वतीचे बंधू म्हणून भगवान नारायण यांनी व्यवस्था पाहिली, तर भगवान ब्रह्मांनी या लग्नाचं पौरोहित्य केल्याचीही आख्यायिका आहे. इथे लग्न करणाऱ्या दाम्पत्याचं लग्न हे यशस्वी होतं, अशीही धारणा आहे. हिरे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहतासोबत जुलै महिन्यात आकाशचा साखरपुडा झाला होता. या सोहळ्याला राजकारणी, उद्योगपती, क्रिकेट स्टार्स तसेच ख्यातनाम बॉलिवूड दिग्गजांनी हजेरी लावली. उत्तराखंड सरकारनेही या मंदिराला वेडिंग डेस्टिनेशनचा दर्जा दिला आहे. आतापर्यंत अभिनेत्री कविता कौशिक, उत्तराखंडचे माजी मंत्री धनसिंह रावत आणि आयएएस अपर्णा रावत यांचीही लग्नं इथेच झाली आहेत. मुळात हे वेडिंग डेस्टिनेशन अत्यंत छोटं असल्यानं या लग्नात अगदी मोजक्याच पाहुण्यांना आमंत्रित केलं जाणार आहे. अंबानींसारख्या उद्योगपतीच्या मुलाचं लग्न आपल्या राज्यात होत असल्यानं उत्तराखंड सरकारचीही धांदल उडाली आहे. समुद्रसपाटीपासून 9 हजार फूट उंचीवर होणारा हा विवाहसोहळा, तितक्याच उंचीचा ठरेल यात शंका नाही.

महत्त्वाच्या बातम्या

सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget