एक्स्प्लोर

Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराचा उद्रेक, सुरक्षारक्षक आणि स्थानिकांमध्ये चकमक

Manipur Violence: मणिपूरमधील हिंसाचाराचे सत्र अजूनही सुरुच आहे. सुरक्षारक्षक आणि स्थानिक लोकांमध्ये चकमक झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Manipur Violence: मागील काही महिन्यांपासून हिंसाचाराचं (Violence) सत्र सुरु असलेल्या मणिपूरमध्ये (Manipur) शांतता काही केल्या निर्माण होत नाही. गुरुवार (03 ऑगस्ट) रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरमधील परिस्थिती अजूनही तणावपूर्वकच आहे. तर गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यामध्ये गोळीबार आणि बेशिस्त जमावाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. 

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, राज्याच्या कौत्रुक, हरोथेल आणि सेंजम चिरांग या भागात झालेल्या गोळीबारामध्ये एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. राज्यातील हिंसाचाराच्या या घटना ताज्या असतानाच काही वेळा पूर्वी मणिपूरमधील जातीय हिंसाचारामध्ये मारल्या गेलेल्या कुकी आणि मेतई लोकांचा सामूहिक दफनविधी थांबवण्यात आला होता. 

सुरक्षा रक्षकांना थांबवण्यासाठी रस्त्यावर उतरले लोक

राज्यामध्ये गुरुवारी अनेक ठिकाणी अत्यंत तणावपूर्वक स्थिती होती. विष्णुपूरमध्ये तर जवळपास 600 लोकं सुरक्षारक्षकांना विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरात झालेल्या या जमावामुळे पोलिसांना कठोर कारवाई करावी लागली. यामध्ये 25 जणं जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच या संतप्त जमावाने अनेक ठिकाणी हल्ला केला असून त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे देखील जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच संवेदनशील परिसरामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी सुरक्षा बल देखील तैनात करण्यात आले आहेत. 

हजारो लोक पोलिसांच्या ताब्यात

वृत्तानुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये एकूण 129 पोलीस चौकी उभारण्यात आलेल्या आहेत. तसेच आतापर्यंत पोलिसांनी कायद्याचं उल्लंघन केल्याबद्दल सुमारे  1,047 लोकांना ताब्यात घेतले आहे. सर्वसामान्य जनतेला अफवांवर विश्वास ठेवू नका आणि इंटरनेटवर पसरवल्या जाणाऱ्या बनावट व्हिडिओंपासून सावध राहण्याचा इशारा पोलिसांना नागरिकांना केला आहे. तसेच लोकांनी लुटलेली  शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटके पोलिसांना परत करण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे.  

मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हिंसाचार सुरु आहे. यावर ससंदेच्या पावसाळी अधिवेशनात देखील घमासान सुरु आहे. तर विरोधी पक्षाकडून याच मुद्द्यावर अविश्वाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तर या प्रस्तावावर संसदेत 8 आणि 9 ऑगस्ट रोजी चर्चा करण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याच मुद्द्यावर 10 ऑगस्ट रोजी संसदेत भाष्य करणार आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची एकजूट असलेल्या इंडियाचे शिष्टमंडळ देखील मणिपूरच्या दौऱ्यावर गेले होते. त्यांनी तिथे जाऊन मणिपूरमधील परिस्थिती आढावा घेतला. 

हेही वाचा : 

No Confidence Motion : अविश्वास प्रस्तावावर 8 आणि 9 ऑगस्टला चर्चा होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ऑगस्ट रोजी संसदेत देणार उत्तर

महत्त्वाच्या बातम्या

Maitreya Dadashree: 'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
RSS on Ram Mandir: राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
Raja Raghuvanshi Case: सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?
सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhimashankar Temple : स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Raigad Rain Rice Farming: चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Eknath Shinde Health: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना कामाचा अतिताण, उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल
मोठी बातमी: एकनाथ शिंदे अचानक रुग्णालयात दाखल, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
Embed widget