एक्स्प्लोर

Deadliest floods in india : जाणून घ्या, भारताच्या इतिहासातील विध्वंसक भयावह पूर कोणते?

हवामान बदलामुळे पूर दुर्घटनेत वाढ झाल्याचं पाहायला मिळतं ! भारताच्या इतिहासात अनेक भीषण महापूर झाले, ज्यांनी लाखो लोकांचे प्राण घेतले, गेल्या काही वर्षात भारतात आलेल्या पूर दुर्घटनांचा आढावा घेऊया..

भारताच्या इतिहासात अनेक भीषण महापूर झाले आहेत, ज्यांनी लाखो लोकांचे प्राण घेतले, कोट्यवधींचे नुकसान केले आणि संपूर्ण भाग उद्ध्वस्त केले. खाली काही सर्वात भयावह महापुरांची माहिती दिली आहे


1987 चा बिहार पूर 

 ऑगस्ट1987 मध्ये कोसी नदीमुळे आलेल्या पुरामुळे बिहारचा 40 टक्के भाग पाण्याखाली गेला होता. ज्यामध्ये बिहारमधील एकूण 19 जिल्हे आणि 4722 पेक्षा जास्त गावांचा समावेश होता. यादरम्यान 1,00,00,000 हेक्टर शेतजमीन प्रभावित झाली होती. 17 लाखांहून अधिक घरे उद्धस्त झाली. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार या पुरात 1,399 लोक आणि 5,302 जनावरे मृत्युमुखी पडली.

2005 चा मुंबई पूर 

26 जुलै 2005 रोजी मुंबई महानगरात झालेल्या विक्रमी  944 मिमी या 24 तासांच्या रेकॅार्ड मधील पावसामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात पूर आला. या दिवशी शहराला आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पावसाचा सामना करावा लागला होता.तर सकाळी 8 ते रात्री 8 या 12 तासांच्या कालावधीत मुंबईत 644 मिमी पाऊस पडला होता. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, पुरात अंदाजे 1094 लोकांचा मृत्यू झाला .मुंबईसाठी 24 तासांच्या कालावधीत 1974 मध्ये 575 मिमी (22.6 इंच) इतका विक्रमी पाऊस पडला होता.हा मुंबईतील रेकॉर्डवरील सर्वात जास्त पावसाचा दिवस आहे. 

2013 चा उत्तराखंड पूर

भारताच्या अलीकडील इतिहासातील सर्वात वाईट हवामानाशी संबंधित पूर जून 2013 मध्ये आला होता, जेव्हा काही दिवसांच्या मुसळधार पावसामुळे आणि ढगफुटीमुळे राज्यात अचानक पूर आणि भूस्खलन होऊन उत्तराखंडमध्ये विनाशकारी पूर आला होता.

13 ते 17 जून 2013 दरम्यान पडलेल्या या भयावह पावसामुळे 5700 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते. राज्याच्या डोंगराळ भागात भूस्खलनामुळे अडकलेल्या 1,00,000 हून अधिक लोकांना बाहेर काढण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले. अनेकांना विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.राज्यातील 13 पैकी 12 जिल्ह्यांवर याचा परिणाम झाला तर रुद्रप्रयाग, उत्तरकाशी, पिथोरागड आणि चमोली हे चार जिल्हे सर्वात जास्त प्रभावित झाले. 

2015 मधील तामिळनाडूचा पूर

नोव्हेंबर शेवट आणि डिसेंबर पूर्वमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे तामिळनाडू मधील अड्यार आणि कूम नद्यांना पूर आला होता. यामुळे भरपूर प्रमाणात आर्थिक नुकसान होऊन मानवी जीवितहानी झाली. ज्यामुळे 18लाख लोक प्रभावित होऊन या पूर दुर्घटनेमध्ये किमान 470 लोक मृत्युमुखी पडले तर 40,000 हून अधिक लोक विस्थापित झाले.

2018 चा केरळ पूर

2018 च्या केरळ पूर "शतकातील आपत्ती" म्हणून वर्णन केले गेले, केरळमध्ये पडलेल्या या अभूतपूर्व मुसळधार पावसामुळे भयावह पूर येऊन  483 लोक मृत्युमुखी पडले. केरळ राज्यात आलेला 1924 नंतरचा हा सर्वात मोठा पूर मानला जातो. यादरम्यान दहा लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले. या पूरादरम्यान केरळ राज्यातील 54धरणांपैकी तब्बल 35  दरवाजे केरळच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच उघडण्यात आले होते.या भयावह महापूर दुर्घटनांमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होऊन पायाभूत सुविधा आणि शेतीचे मोठे नुकसान झाले.

2021 चा महाराष्ट्रातील पूर

या पूरामुळे एकूण 251 लोकांचा मृत्यू होऊन शेकडो लोक बेपत्ता झाले. या पूरादरम्यान झालेल्या मुसळधार पाऊसामुळे आणि भूस्खलणामुळे महाराष्ट्रातील  13 जिल्ह्यांना फटका बसला. ज्यामध्ये रायगड जिल्हा सर्वाधिक प्रभावित झाला होता. मान्सून अभ्यासकांच्या म्हणण्यांनुसार महाराष्ट्राच्या इतिहासातील जुलै महिन्यात 40 वर्षांत झालेला हा सर्वात मोठा पाऊस होता. या पूराचा सर्वाधिक फटका रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना बसला होता.

महत्वाच्या बातम्या:
रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट!

पूर्वमोसमी पावसाचा जोर वाढला, अनेक भागात वादळी वाऱ्यासह वरुणराजाची जोरदार हजेरी, काही भागात पिकांना फटका

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात अजित पवारांचा काँग्रेसला दे धक्का; शिवाजीनगरमधून विधानसभा लढलेला नेता राष्ट्रवादीत
पुण्यात अजित पवारांचा काँग्रेसला दे धक्का; शिवाजीनगरमधून विधानसभा लढलेला नेता राष्ट्रवादीत
पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य
पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
Kuldeep Singh Sengar: उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

व्हिडीओ

Nitin Deshmukh : निवडणुकीतून माघार पण शरद पवारांना सोडू शकत नाही,नितिन देशमुख EXCLUSIVE
NCP Merger Vastav 256 : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठीचं पहिलं पाऊल? कार्यकर्त्यांची कोंडी?
Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात अजित पवारांचा काँग्रेसला दे धक्का; शिवाजीनगरमधून विधानसभा लढलेला नेता राष्ट्रवादीत
पुण्यात अजित पवारांचा काँग्रेसला दे धक्का; शिवाजीनगरमधून विधानसभा लढलेला नेता राष्ट्रवादीत
पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य
पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
Kuldeep Singh Sengar: उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापुरात काँग्रेसची दुसरी यादी सुद्धा आली, महायुतीमध्ये अजूनही शिरोलीपासून जिल्हा बँकेच्या मुख्यालयापर्यंत 'चर्चा पे चर्चा' सुरुच
कोल्हापुरात काँग्रेसची दुसरी यादी सुद्धा आली, महायुतीमध्ये अजूनही शिरोलीपासून जिल्हा बँकेच्या मुख्यालयापर्यंत 'चर्चा पे चर्चा' सुरुच
Nashik News: लग्नाच्या मंगलाष्टका गायल्या जाण्यापूर्वीच काळाचा घाला, नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अंत; नाशिक हळहळलं!
लग्नाच्या मंगलाष्टका गायल्या जाण्यापूर्वीच काळाचा घाला, नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अंत; नाशिक हळहळलं!
Raj Thackeray BMC Election 2026: नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायचेय; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायचेय; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
Embed widget