एक्स्प्लोर

भाजप नेत्यांच्या बेताल वक्तव्याने कतार, बहरीनमध्ये संताप; जाणून घ्या आखाती देश भारतासाठी महत्त्वाचे का?

India and Gulf Countries : भाजप नेत्यांच्या बेताल वक्तव्याचे पडसाद आखाती देशात उमटले. त्यानंतर भाजपने नुपूर शर्मा यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. जाणून घ्या आखाती देश भारतासाठी महत्त्वाचे का आहेत?

इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपने प्रवक्त्या नुपूर शर्मा, दिल्ली भाजप नेते नवीन कुमार जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर बहारीन, कतार, कुवेत, इराण आणि ओमानसह अन्य आखाती देशांमध्ये भारताविरोधात संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याचे म्हटले जाते.   आखाती देशांसोबत भारताचे चांगले संबंध राहिले आहेत. अशा परिस्थितीत भारताविरोधात आखाती देशांमध्ये संताप व्यक्त होणे ही चिंतेची बाब म्हटली जाते. 

गल्फ को-ऑपरेशन कौन्सिलच्या (GCC) सदस्य देशांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय वास्तव्य करतात. गल्फ को-ऑपरेशन कौन्सिलमध्ये प्रामुख्याने कुवेत, ओमान, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार आणि बहरीन या देशांचा समावेश  आहे. या देशांमध्ये लाखो भारतीय काम करतात. आखाती देशात स्थलांतरित कामगारांपैकी 30 टक्के कामगार हे भारतीय आहेत. 

आखाती देशांतून भारताला निधी 

आखाती देशांमध्ये काम करणाऱ्या भारतीय कामगारांकडून संबंधित देशांच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावला जातो. पण, त्याचवेळी रोजगारासाठी स्थलांतरीत असलेल्या कामगारांच्या मार्फत देशात परकीय चलनदेखील मोठ्या प्रमाणावर मिळते. परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, पश्चिम आशियात जवळपास 80 लाखांहून अधिक भारतीयांचे वास्तव्य आहे. यातील बहुतांशी GCC या देशांमध्ये वास्तव्य करतात. या देशांमधून रोजगारासाठी स्थलांतरीत असलेल्या भारतीयांकडून 40 अब्ज डॉलरहून अधिक रक्कम भारतात येतात. 

भारतासाठी आखाती देशाचे महत्त्व काय?

भारतासाठी राजकीय, आर्थिक, सामरीक आणि सांस्कृतिकदृष्ट्या आखाती देश महत्त्वाचे आहेत. GCC सदस्य देश आणि भारत परस्पर सहकार्याने विकास करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच भारतासाठी व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा यांसारख्या क्षेत्रात महत्त्वाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. तर, तंत्रज्ञान, बांधकाम, हॉटेल आणि  वित्त सेवांशी संबंधित कंपन्या आखाती देशांमध्ये सक्रिय आहेत. भारत आणि आखाती देशांमध्ये चांगले व्यापारी संबंध आहेत. यामध्ये युएई आणि सौदी अरेबिया महत्त्वाचे देश आहेत. या आखाती देशांचे भौगोलिक महत्त्वदेखील आहेत. भारत इराणमार्गे मध्य आशिया आणि युरोपमध्ये पोहचू शकतो. तर, ओमानमार्गे पश्चिम हिंदी महासागरावर नियंत्रण ठेवतो. ओमानमध्ये भारतीय नौदलाचा तळ आणि एक हवाई तळ आहे. 

आंतरराष्ट्रीय राजकारणात आखाती देशांनी भारतासोबत सहकार्याची भूमिका घेतली असल्याचे दिसून आले आहे. पाकिस्तानने भारताविरोधात काश्मीरच्या मुद्यावर अनेकदा कांगावा करण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय मंचावर केला. मात्र,  आखाती देशांनी आपले वजन भारताच्या बाजूने ठेवले.  

महत्त्वाच्या बातम्या

संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
CJP Protest : सीजेपीकडून उद्या देशव्यापी आंदोलनाची घोषणा, विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटनांना सहभागाचं आवाहन
सीजेपीकडून उद्या देशव्यापी आंदोलनाची घोषणा, विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटनांना सहभागाचं आवाहन
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सुरु असलेली सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
CJP Protest: एका राजीनाम्याने सीजेपीचे आंदोलन थांबू शकते, पण मोदी सरकार धर्मेंद्र प्रधानांच्या पाठीशी का उभे? जाणून घ्या 7 प्रमुख कारणे
एका राजीनाम्याने सीजेपीचे आंदोलन थांबू शकते, पण मोदी सरकार धर्मेंद्र प्रधानांच्या पाठीशी का उभे? जाणून घ्या 7 प्रमुख कारणे

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सुरु असलेली सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
Embed widget