एक्स्प्लोर

Kesavananda Bharati case: एक निकाल आणि तीन न्यायाधीशांचा राजीनामा, ऐतिहासिक केशवानंद खटल्याला 50 वर्षे पूर्ण

Kesavananda Bharati case:  न्यायालयांमध्ये जास्तीत जास्त वेळा संदर्भ दिला जाणारा खटला व निकाल म्हणजे 'केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार. सोमवारी केशवानंद भारती खटल्याच्या निर्णयाला 50 वर्षे पूर्ण झाले.

Kesavananda Bharati case:  केशवानंद भारती खटल्याच्या ऐतिहासिक निर्णयाला सोमवारी 50 वर्षे पूर्ण झाले आहेत. न्यायालयांमध्ये जास्तीत जास्त वेळा संदर्भ दिला जाणारा खटला व निकाल म्हणजे 'केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार.  प्रदीर्घ आणि ऐतिहासिक महत्त्वाचा निकालाला 50 वर्षे झाल्याच्या निमित्ताने  या संदर्भातील सर्व रेकॉर्ड सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या खंडपीठाने हा निर्णय दिला होता. सुप्रीम कोर्टाने खंडपीठाच्या  11 सदस्यांचे युक्तीवाद देखील वेबसाईटवर अपलोड केले आहे. 

काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय?

केशवानंद भारती खटल्याची सुनावणी ही 13 न्यायाधीशांच्या घटनापीठाने केला या घटनापीठामध्ये एसएम सीक्री यांच्या  अध्यक्षतेखाली जस्टिस जेएम शेलत, केएस हेगडे, एएन ग्रोवर, एएन रे, पीजे रेड्डी, डीजी पालेकर, एचआर खन्ना, केके मॅथ्यू, एमएच बेग. एसएन द्विदी, बीके मुखर्जी आणि वाय चंद्रचूड होते.  घटनेच्या कलम 368 नुसार संसदेला मूलभूत अधिकारांत बदल करण्याचा किती अधिकार आहे?  हा कळीचा मुद्दा होता. यावर खंडपीठाच्या न्यायाधीशांमध्ये मतभेद देखील  झाले.  न्यायाधीशांनी 7 विरुद्ध 6 अशा बहुमताने हा निकाल दिला. कोणत्याही परिस्थितीत  संसदेला घटनेची कोणतीही तरतूद बदलता येईल. परंतु, पायाभूत चौकट किंवा ढाचा बदलता येणार नाही. राज्यघटनेची  पायाभूत वैशिष्ट्ये कोणती हे सर्वोच्च न्यायालय ठरवेल.

CJI सिक्री आणि न्यायमूर्ती शेलत, हेगडे, ग्रोव्हर, खन्ना, रेड्डी आणि मुखर्जी हे निर्णयाच्या समर्थनार्थ होते. तर  दुसरीकडे न्यायमूर्ती रे, पालेकर, मॅथ्यू, बेग, द्विवेदी आणि चंद्रचूड यांनी निर्णयास विरोध दर्शवला होता. न्यायमूर्ती मॅथ्यू यांचा मुलगा केएम जोसेफ हे सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश आहेत तर न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे पुत्र  धनंजय चंद्रचूड  हे सरन्यायधीश आहेत.  

तिन्ही न्यायाधीशांचा राजीनामा

 सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पटणारा नव्हता. केशवानंद भारती प्रकरणाच्या निकालानंतर  इंदिरा गांधी यांनी तीन सीनिअर न्यायाधीशांना डावलून ए एन रे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. याचे कारण म्हणजे या तिन्ही ज्येष्ठ न्यायाधीशांनी केशवानंद भारती प्रकरणात इंदिरा सरकारविरोधात निर्णय दिला होता. जस्टिस शेलत, हेगडे आणि जस्टीस ग्रोवर या तिन्ही न्यायधीशांनी राजीनामा दिला. 26 एप्रिल 1973 साली जस्टिस रे यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली. ए एन रे यांनी सरन्यायाधीशाची सूत्रे हाती घेताच केशवानंद भारती प्रकरणाच्या समिक्षेसाठी पुन्हा एकदा 13 सदस्यीय खंडपीठ स्थापन करण्यात आले. सुप्रीम कोर्टाच्या अनेक न्यायाधीशांनी सरन्यायाधीश ए एन रे यांच्या या निर्णयाला विरोध केला. आपल्या सहकाऱ्यांच्या विरोधामुळे अखेरीस ए एन रे यांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला. 

काय आहे खटला?  

केशवानंद भारती हे इडनीर मठाचे प्रमुख होते.  1973 मध्ये केरळ सरकारने दोन भूमी सुधारणा कायदे आणले होते. त्यानुसार इडनीर मठाचे उत्तराधिकारी असलेल्या केशवानंद भारती यांच्या मठाच्या जमिनीवरही सरकारी नियंत्रण येणार होतं. त्यालाच केशवानंद भारती यांनी आव्हान दिलं होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Immigrant : मोदींच्या दौऱ्यानंतरही अमेरिकेतून हद्दपार होणाऱ्या भारतीयांच्या हातापायात साखळदंड सुरुच; 15 दिवस आंघोळ नाही, दातही घासले नाहीत, खायला सुद्धा कमी दिलं!
मोदींच्या दौऱ्यानंतरही अमेरिकेतून हद्दपार होणाऱ्या भारतीयांच्या हातापायात साखळदंड सुरुच; 15 दिवस आंघोळ नाही, दातही घासले नाहीत, खायला सुद्धा कमी दिलं!
Nana Patekar Wife In Chhaava Movie: 'छावा'मध्ये 'या' दिग्गज मराठमोळ्या अभिनेत्याच्या पत्नीनं साकारलीय 'धाराऊ'; नवऱ्यापासून वेगळी राहते, पण...
'छावा'मध्ये 'या' दिग्गज मराठमोळ्या अभिनेत्याच्या पत्नीनं साकारलीय 'धाराऊ'; नवऱ्यापासून वेगळी राहते, पण...
Tuljapur Drugs Case : तुळजापूर ड्रग्स प्रकरणाचे मुंबई कनेक्शन; आरोपींना बेड्या, तपासात धक्कादायक माहिती उघड
तुळजापूर ड्रग्स प्रकरणाचे मुंबई कनेक्शन; आरोपींना बेड्या, तपासात धक्कादायक माहिती उघड
Delhi stampede: तुम्ही पाहिलं का हो हिला? दिल्लीतील चेंगराचेंगरीत हरवलेल्या पत्नीचा मोबाईलमधला फोटो दाखवत नवऱ्याची विचारणा; अख्खी रात्र मृतदेह पाहिले पण...
तुम्ही पाहिलं का हो हिला? दिल्लीतील चेंगराचेंगरीत हरवलेल्या पत्नीचा मोबाईलमधला फोटो दाखवत नवऱ्याची विचारणा; अख्खी रात्र मृतदेह पाहिले पण...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

New India Co-Oprative Bank :  Hitesh Mehta ने व्यवसायासाठी धर्मेशला 70 कोटी दिल्याची कबुलीTop 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स : ABP Majha : Maharashtra News : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Headlines : 6.30 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 17 Feb 2025 : Maharashtra News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Immigrant : मोदींच्या दौऱ्यानंतरही अमेरिकेतून हद्दपार होणाऱ्या भारतीयांच्या हातापायात साखळदंड सुरुच; 15 दिवस आंघोळ नाही, दातही घासले नाहीत, खायला सुद्धा कमी दिलं!
मोदींच्या दौऱ्यानंतरही अमेरिकेतून हद्दपार होणाऱ्या भारतीयांच्या हातापायात साखळदंड सुरुच; 15 दिवस आंघोळ नाही, दातही घासले नाहीत, खायला सुद्धा कमी दिलं!
Nana Patekar Wife In Chhaava Movie: 'छावा'मध्ये 'या' दिग्गज मराठमोळ्या अभिनेत्याच्या पत्नीनं साकारलीय 'धाराऊ'; नवऱ्यापासून वेगळी राहते, पण...
'छावा'मध्ये 'या' दिग्गज मराठमोळ्या अभिनेत्याच्या पत्नीनं साकारलीय 'धाराऊ'; नवऱ्यापासून वेगळी राहते, पण...
Tuljapur Drugs Case : तुळजापूर ड्रग्स प्रकरणाचे मुंबई कनेक्शन; आरोपींना बेड्या, तपासात धक्कादायक माहिती उघड
तुळजापूर ड्रग्स प्रकरणाचे मुंबई कनेक्शन; आरोपींना बेड्या, तपासात धक्कादायक माहिती उघड
Delhi stampede: तुम्ही पाहिलं का हो हिला? दिल्लीतील चेंगराचेंगरीत हरवलेल्या पत्नीचा मोबाईलमधला फोटो दाखवत नवऱ्याची विचारणा; अख्खी रात्र मृतदेह पाहिले पण...
तुम्ही पाहिलं का हो हिला? दिल्लीतील चेंगराचेंगरीत हरवलेल्या पत्नीचा मोबाईलमधला फोटो दाखवत नवऱ्याची विचारणा; अख्खी रात्र मृतदेह पाहिले पण...
Beed News: वाल्मिक कराडचा मुक्काम असणाऱ्या बीड जिल्हा कारागृहाचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट, तुरुंग कमकुवत झाल्याने निर्णय
वाल्मिक कराडचा मुक्काम असणाऱ्या बीड जिल्हा कारागृहाचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट, तुरुंग कमकुवत झाल्याने निर्णय
BJP Kolhapur: विधानसभा जिंकल्यानंतर भाजपची 'शत-प्रतिशत'ची तयारी; महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत
कितीही काळी जादू करु दे, भाजपकडे 137 आमदार, सरकारला धक्का लागणार नाही: चंद्रकांत पाटील
Ajit Pawar: नैतिकता म्हणून राजीनामा द्यायचा की नाही, हे धनंजय मुंडेंनाच विचारा; अजित पवारांच्या सूचक वक्तव्याने भुवया उंचावल्या, नेमकं काय म्हणाले?
नैतिकता म्हणून राजीनामा द्यायचा की नाही, हे धनंजय मुंडेंनाच विचारा; अजित पवारांच्या सूचक वक्तव्याने भुवया उंचावल्या, नेमकं काय म्हणाले?
Earthquake Tremors in Delhi: राजधानी दिल्ली पहाटे भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली; साखरझोपेतील लोक खडबडून जागे, तीव्रता 4 रिश्टर स्केल
राजधानी दिल्ली पहाटे भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली; साखरझोपेतील लोक खडबडून जागे, तीव्रता 4 रिश्टर स्केल
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.