एक्स्प्लोर

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये आता CRPF जवानांची नजर! कोब्रा कमांडोची पहिली तुकडी पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये तैनात

CRPF Cobra Commando : केंद्रीय मंत्रिमंडळाने सप्टेंबर 2008 साली सीआरपीएफमध्ये 10 अतिरिक्त बटालियनच्या निर्मितीसह स्वतंत्र दलाच्या निर्मितीला मान्यता दिली.

नवी दिल्ली : सध्या काश्मीर खोऱ्यात (Kashmir) तणाव पाहायला मिळत आहे. जम्मू आणि काश्मीर (Jammu Kashmir) मध्ये सैन्य दल (Indian Army) आणि जम्मू-काश्मीर पोलिसांकडून (Jammu-Kashmir Police) शोधमोहिम (Search Operation) राबवली जात आहे. अनेक भागात दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक (Terrorist Attack) पार पडली आहे. सैन्य दलाने काही दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. आता केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी कारवायांच्या पार्श्मभूमीवर केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF-Central Reserve Police Force) च्या कोब्रा कमांडोचं पथक (CRPF Cobra Commando) कुपवाडा जिल्ह्यात तैनात करण्यात आलं आहे. 

जम्मू-काश्मीरमध्ये आता CRPF जवानांची नजर!

माओवाद्यांशी लढण्यासाठी 2009 मध्ये कमांडो बटालियन फॉर रेजोल्यूट अॅक्शन (CoBRA) या स्वतंत्र दलाची निर्मिती करण्यात आली होती. निर्मितीनंतर पहिल्यांदा कोब्रा पथकाला पूर्व आणि मध्य भागातून हटवून जम्मू आणि काश्मीरमध्ये तैनात करण्यात आलं आहे. कोब्रा कमांडोच्या पहिल्या पथकाने जम्मू आणि काश्मीर खोऱ्यांमधील जंगलामध्ये प्रशिक्षण पूर्ण केलं असून त्यानंतर या पथकाला कुपवाडा जिल्ह्यात तैनात करण्यात आलं आहे.

कोब्रा कमांडोच्या पथकांचं सहा महिन्यांचं प्रशिक्षण पूर्ण

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहार आणि झारखंडमध्ये नक्षलवादी कारवाया आता काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. त्यामुळे तेथील कोब्रा कमांडोच्या काही पथकांना काही काळासाठी हटवण्यात आलं आहे. त्यानंतर या पथकांना जम्मू आणि काश्मीर येथे तैनात करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आलं. कोब्रा कमांडोच्या या पथकांनी सहा महिन्यांचं प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. मात्र, त्यांचा अद्याप कोणत्याही मोहिमेत वापर करण्यात आलेला नाही. हिंदुस्तान टाईम्सने या संदर्भात माहिती दिली आहे.

एप्रिलमध्ये जम्मू-काश्मीरला रवाना

सीआरपीएफ कोब्रा कमांडोचं पथक एप्रिल महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये पाठवण्यात आले होते. काश्मीरमध्ये सीआरपीएफ जवान (CRPF) दहशतवादविरोधी कारवाया तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करत आहे. सीआरपीएफ जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय सैन्य दलासोबत मिळून काम करत आहे. 

अधिकाऱ्यांनी यासंदर्भात अधिक माहिती देत सांगितलं की, "देशातील अंतर्गत नक्षलवादी कारवायांमध्ये वाढ झाल्याने भारताची अंतर्गत सुरक्षा धोक्यात आली होती, त्यावेळी कोब्रा कमांडो दलाची स्थापना करण्यात आली. गेल्या काही वर्षात कोब्रा कमांडोच्या पथकांनी अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यांच्या मोहिमांमुळे नक्षलवादी हिंसाचार कमी झाला आहे. जंगल आणि डोंगराळ भागात दहशतवाद्यांशी मुकाबला करण्यात कोब्रा कमांडो तरबेज आहेत. जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील भागातील परिस्थिती जवळपास सारखीच आहेत. येत्या काही वर्षांत कोब्रा कमांडोंचा अशा इतर ठिकाणीही सुरक्षेसाठी तैनाती करण्यात येईल."

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
NEET पेपर लीक प्रकरणी महत्वाची बातमी समोर, CBI कडून आणखी एका मास्टरमाइंडला दिल्लीतून अटक 
NEET पेपर लीक प्रकरणी महत्वाची बातमी समोर, CBI कडून आणखी एका मास्टरमाइंडला दिल्लीतून अटक 

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Prateek Yadav Death: प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
Embed widget