एक्स्प्लोर

चेन्नईत नॉन पिक अवरमध्ये सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु, मुंबईत कधी?

चेन्नईत आजपासून सर्वसामान्यांना नॉन-पीक अवरमध्ये लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. चेन्नईत लोकल सुरु झाल्यानंतर मुंबईत सरसकट सर्वसामान्यांसाठी लोकल कधी सुरु होणार असा प्रश्न विचारला जात आहे.

मुंबई : चेन्नईमधील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. दक्षिण रेल्वेने 23 डिसेंबर म्हणजेच आजपासून सर्वसामान्यांना नॉन-पीक अवरमध्ये लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. दक्षिण रेल्वेने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, "23 डिसेंबरपासून सर्वसामान्य नागरिकांना चेन्नईच्या उपनगरीय सेवेतील नॉन पीक अवरमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे."

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. "23 डिसेंबरपासून भारतीय रेल्वे सर्वसामान्यांना नॉन-पिक अवरमध्ये चेन्नईमधील उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देत. पुरेशा सुरक्षात्मक उपाययोजना केल्याने लोकांचा प्रवास सुखकर होईल, असं रेल्वेमंत्र्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

पहाटेपासून सकाळी सातपर्यंत, सकाळी साडे नऊ ते दुपारी साडेचार आणि संध्याकाळी सात ते शेवटची ट्रेन हे नॉन पिक अवर समजले जातील, असं रेल्वेने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. दरम्यान नागरिकांनी प्रवासादरम्यान कोरोनाविषयक नियमावलीचं पालन करावं, असं आवाहनही रेल्वेच्या वतीने करण्यात आलं आहे.

अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांनाही पिक अवरमध्ये प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. सकाळी सात ते साडेनऊ आणि दुपारी साडेचार ते सात हे पिक अवर समजले जातील, असं रेल्वेने नमूद केलं.

दक्षिण रेल्वेने लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोविडविषयक मार्गदर्शक सूचनां पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

- मास्क न घालता स्टेशन परिसर आणि ट्रेनमध्ये येऊ नये

- ट्रेनमध्ये चढताना आणि उतरताना गर्दी करु नये

- स्टेशन परिसर आणि ट्रेनमध्ये सोशल डिस्टन्स ठेवावा

- रेल्वे स्थानकांवर आणि प्रवासादरम्यान कागदपत्रे तपासण्यासाठी प्रवाशांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं

मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल कधी सुरु होणार? एकीकडे चेन्नईत लोकल सुरु झाल्यानंतर मुंबईत सरसकट सर्वसामान्यांसाठी लोकल कधी सुरु होणार असा प्रश्न विचारला जात आहे. मुंबईतील लोकल सेवा ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे. परंतु मार्च महिन्यापासून बंद असलेली लोकल सर्वसामान्यांसाठी पुन्हा कधी सुरु होणार असा प्रश्न मुंबईकर विचारत आहेत. मुंबईतही लोकल सेवा सुरु करण्यात आली मात्र ती फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी. त्यानंतर वकिलांना, शिक्षकांना संमती देण्यात आली. तसंच महिलांनाही नवरात्रीपासून लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. मात्र सर्वसामान्यांसाठी लोकल अजूनही सुरु झालेली नाही.

सगळ्यांसाठी लोकल सुरु करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र सरकारने केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना आणि रेल्वे मंत्रालयाला पत्रही लिहलं आहे. परंतु अद्यापही मुंबईत लोकल कधी सुरु होणार हे स्पष्ट झालेलं नाही. त्यातच आता चेन्नत उपनगरीय सेवा सुरु झाली आहे. त्यामुळे लवकरच मुंबईतील लोकल सेवाही सर्वसामान्यांसाठी सुरु होईल, अशी अपेक्षा मुंबईकर करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
जनता मालक तर  शिक्षणमंत्री हे सेवक, जनतेने राजीनामा मागितला तर तो दिला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर काय म्हणाले अण्णा हजारे?
जनता मालक तर  शिक्षणमंत्री हे सेवक, जनतेने राजीनामा मागितला तर तो दिला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर काय म्हणाले अण्णा हजारे?
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget