एक्स्प्लोर

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती लवकरच कमी होणार!

नैसर्गिक आपत्तींमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या, शिवाय रिफायनरी क्षमताही घटली, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याची कबुली पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी गेल्या काही दिवसांपासून बुलेट ट्रेनप्रमाणे वेग घेतला आहे. 1 जुलै ते 13 सप्टेंबर या काळात पेट्रोलचे दर प्रती लिटर 63.9 रुपयांवरुन 70.38 रुपयांवर पोहोचले, म्हणजेच 7 रुपये 29 पैशांनी दरात वाढ झाली. तर मुंबईत एक लिटर पेट्रोलचे दर 74.30 रुपयांवरुन 79.48 रुपयांवर, म्हणजे 5.18 रुपयांनी दरात वाढ झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत होणाऱ्या दरवाढीमुळे जोरदार टीका झाल्यानंतर सरकार आता खडबडून जागं झालं आहे. या संदर्भात पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तेल कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. ऑगस्ट महिन्यात अमेरिकेत दोन मोठी वादळं आली. यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती तर वाढल्याच, शिवाय जागतिक स्तरावर रिफायनरी क्षमता 13 टक्क्यांनी कमी झाली. या सर्व कारणांमुळे पेट्रोलचे आंतरराष्ट्रीय दर 18 टक्क्यांनी आणि डिझेलचे आंतरराष्ट्रीय दर 20 टक्क्यांनी वाढले. त्यामुळे भारतातही पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले, अशी माहिती धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता स्थिर झाल्या आहेत. बुधवारीही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असल्याचं दिसून आले. त्यामुळे आता पुढेही दर कमी होतील. कारण जागतिक स्तरावरील परिस्थितीही सामान्य झाली आहे. शिवाय नैसर्गिक आपत्तींचाही आता धोका नाही, असं धर्मेंद्र प्रधान म्हणाले. पेट्रोल आणि डिझेलवरील कर कायम राहणार सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील कर का कमी करत नाही, असा प्रश्नही धर्मेंद्र प्रधान यांना विचारण्यात आला. मात्र सामाजिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी करातून मिळणारं उत्पन्न गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. याचाच अर्थ सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील कर कायम ठेवणार आहे. पेट्रोल आणि डिझेलवर किती कर? तेल कंपन्यांना 19 ऑक्टोबर 2014 रोजी पेट्रोल-डिझेलचे दर निश्चित करण्याचे अधिकार दिले तेव्हा दिल्लीत पेट्रोलच्या किरकोळ किंमतीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या एकूण कराची भागीदारी 31 टक्के होती, जी आता 52 टक्क्यांवर पोहोचली असल्याचं तेल कंपन्यांचं म्हणणं आहे. याचप्रमाणे डिझेलच्या किरकोळ किंमतीत केंद्र आणि राज्य सरकारची एकूण भागीदारी 19 ऑक्टोबर रोजी 18 टक्के होती, जी आता 45 टक्क्यांवर पोहोचली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढण्यास कोण जबाबदार? पेट्रोल आणि डिझेलवर राज्यांनी सर्वात जास्त कर आकारला आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर घसरले होते. मात्र सरकारने त्यावर अनेकदा एक्साईज ड्युटी वाढवली. केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या ठरलेल्या दरांनुसार, तर राज्य सरकारकडून टक्क्यांनुसार एक्साईज ड्युटी वाढवली जाते. केंद्र सरकारकडून एक लिटर पेट्रोलवर 21.48 रुपये एक्साईज ड्युटी लावली जाते, तर राज्य सरकारकडून (दिल्ली) 27.5 टक्के याप्रमाणे व्हॅट आकारला जातो. दरम्यान राज्य सरकारने अनेकदा व्हॅट वाढवल्यानेच किंमती उसळल्याचा आरोपही धर्मेंद्र प्रधान यांनी केला. केरळ सरकारने 26 टक्क्यांहून 34, महाराष्ट्र सरकारने 27 टक्क्यांहून 40 आणि दिल्ली सरकारने 20 टक्क्यांहून 27 टक्के एवढा व्हॅट वाढवला आहे. पेट्रोल आणि डिझेलचा समावेश जीएसटीमध्ये केल्यानंतर याचा थेट फायदा ग्राहकांना होईल. कारण जीएसटीमध्ये समावेश झाल्यानंतर करांमध्ये स्थिरता येईल, असंही धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

UPI  पेमेंट शुल्काबाबत मोठा निर्णय! दरवर्षी सरकारला किती हजार कोटींचा फायदा मिळणार? आकडेवारी समोर
UPI  पेमेंट शुल्काबाबत मोठा निर्णय! दरवर्षी सरकारला किती हजार कोटींचा फायदा मिळणार? आकडेवारी समोर
प्रवाशांच्या खिशाला मोठी झळ! लहान मुलांसाठी इंडिगो विमान प्रवास महागला, वेगळी सीट नाही तरीही 3 हजार द्यावे लागणार
प्रवाशांच्या खिशाला मोठी झळ! लहान मुलांसाठी इंडिगो विमान प्रवास महागला, वेगळी सीट नाही तरीही 3 हजार द्यावे लागणार
पृथ्वी शॉ च्या आयुष्यात मोठं वादळ, सहा महिन्यातच आकृती अग्रवालसोबचं नातं संपवलं! नेमकं काय घडलं? आकृतीची भावनिक पोस्ट
पृथ्वी शॉ च्या आयुष्यात मोठं वादळ, सहा महिन्यातच आकृती अग्रवालसोबचं नातं संपवलं! नेमकं काय घडलं? आकृतीची भावनिक पोस्ट
Maharashtra Todays Breaking News Updates: मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, मात्र आंदोलन सुरुच राहणार
Maharashtra Todays Breaking News Updates: मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, मात्र आंदोलन सुरुच राहणार

व्हिडीओ

Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?
Seema Pahuja Supervising Disha Salian Case : लक्ष तपासावर जबाबदारी लेडी सिंघमवर | Special Report ABP Majha
PM Modi’s schoolmate Asgar Ali gets relief in land dispute : मोदींशी मैत्री अखंड; परत मिळाला भूखंड | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Relaunching : मिस यू दादा... आता वहिनींचा वादा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे सलाईनवर, तरी ठाम निर्णयावर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
N Chandrasekaran: अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
Gokul Election: गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
Sanjay Raut : संजय राऊत यांचं
संजय राऊत यांचं नवं पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला,  "बोध कीर्तन" पुस्तकात नेमकं काय असणार? 
UP News: 'हो, त्यांना पाच मुले आहेत, तरी मी यांच्याशीच लग्न करेन', जावई अन् सासू एकमेकांवर झाले फिदा, पोलिसांसमोर म्हणाले, 'आम्ही सोबतच राहणार....'
'हो, त्यांना पाच मुले आहेत, तरी मी यांच्याशीच लग्न करेन', जावई अन् सासू एकमेकांवर झाले फिदा, पोलिसांसमोर म्हणाले, 'आम्ही सोबतच राहणार....'
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवर आतापर्यंत सरकारकडून 78700 कोटी खर्च, आकडेवारी समोर, पात्र लाभार्थ्यांची संख्या नेमकी किती?
लाडकी बहीण योजनेवर आतापर्यंत सरकारकडून 78700 कोटी खर्च, आकडेवारी समोर, पात्र लाभार्थ्यांची संख्या नेमकी किती?
Embed widget