एक्स्प्लोर

गोव्याच्या मंत्रिमंडळातील नव्या चेहऱ्यांचं खातेवाटप जाहीर

मिलिंद नाईक यांच्याकडे नगरविकास, समाज कल्याण तर निलेश काब्राल यांच्याकडे वीज, अपारंपरिक ऊर्जा, कायदा आणि विधीमंडळ व्यवहार ही खाती देण्यात आली आहेत.

पणजी : गोव्याच्या मंत्रिमंडळात झालेल्या मोठ्या फेरबदलांनंतर दोन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. मिलिंद नाईक यांच्याकडे नगरविकास, समाज कल्याण तर निलेश काब्राल यांच्याकडे वीज, अपारंपरिक ऊर्जा, कायदा आणि विधीमंडळ व्यवहार ही खाती देण्यात आली आहेत. 2007 पासून सलग तिसऱ्यांदा आमदार झालेले मिलिंद नाईक हे 2012 मध्ये मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या सरकारमध्ये वीजमंत्री होते. 2017 मध्ये निवडून आल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. पण पर्रिकर यांनी अनिवासी भारतीय आयुक्त हे कॅबिनेट दर्जा असलेले पद दिले होते. नाईक यांच्याकडे वीजखाते देण्याचे निश्चित झाले होते, पण मागील वेळी कामगिरी उत्तम नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी संध्याकाळी नगर विकास हे तेवढेच महत्त्वाचे खाते त्यांच्याकडे दिले. कुडचडेचे आमदार निलेश काब्राल हे 2012 पासून भाजपचे कुडचडे मतदारसंघातून आमदार आहेत. पहिल्याच टर्ममध्ये ते गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष होते. 2017 मध्ये सरकार आल्यानंतर काब्राल यांच्याकडे पुन्हा हेच महामंडळ दिले गेले. विशेष म्हणजे अभियंता असलेल्या काब्राल यांच्याकडे मंत्री झाल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी कायदा व विधीमंडळ व्यवहार ही महत्त्वाची खातीही दिली आहेत. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले वीजमंत्री पांडुरंग मडकईकर आणि नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांना मंत्रिमंडळामधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. मडकईकर हे सध्या मुंबईत तर डिसोझा अमेरिकेत पर्रिकर उपचार घेत असलेल्या हॉस्पिटलमध्येच दाखल आहेत. आजारी मंत्रिमंडळावरुन विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सरकार आजारी पडले असून प्रशासन ठप्प झाल्याचा आरोप काँग्रेसने केला. त्यामुळे भाजपला सरकार चालवणं शक्य होत नसेल तर सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्हाला सत्ता स्थापनेची संधी द्यावी, अशी मागणी राज्यपालांकडे काँग्रेसने अनेकदा करत सरकारवरील दबाव वाढवला होता. मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रिकरच कायम राहतील असा निर्णय काल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जाहीर केला.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Narendra Modi on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
Divija Fadnavis on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget