एक्स्प्लोर

G20 History: G20 परिषद कधीपासून आणि कोणत्या उद्देशाने सुरू झाली? जाणून घ्या, सर्व काही सविस्तर

G20 History: दिल्लीत दोन दिवसीय G-20 परिषद आयोजित करण्यात आली आहे, यामध्ये सहभागी होण्यासाठी अनेक जागतिक नेते भारतात पोहोचले आहेत. पण नेमकी कधीपासून परिषद सुरू झाली? हे तुम्हाला माहीत आहे का?

G20 History: देशाची राजधानी दिल्ली G-20 परिषदेच्या (G-20 Summit 2023) यजमानपदासाठी सज्ज आहे. 9 आणि 10 सप्टेंबर रोजी दिल्लीतील प्रगती मैदानाच्या भारत मंडपममध्ये या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्यासह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) G-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी शुक्रवारी (8 सप्टेंबर) दिल्लीत पोहोचले आहेत. दरम्यान, G-20 बाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. G-20 म्हणजे नक्की काय? G-20 ची सुरुवात कशी झाली आणि त्याची पहिली बैठक कुठे झाली? G-20 कशासाठी घेतली जाते? असे अनेक प्रश्न पडतात, तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात...

G20 म्हणजे काय?

G20 हा 20 देशांचा समूह आहे. या देशांचे प्रतिनिधी एकत्र येऊन जगातील आर्थिक आणि राजकीय प्रश्नांवर चर्चा करतात. G20 देशांचा जागतिक आर्थिक उत्‍पादनात 85 टक्के आणि जागतिक व्‍यापारात 75 टक्के पेक्षा जास्त वाटा आहे.

G20 मध्ये कोणत्या देशांचा समावेश?

G20 हा जगातील 20 देशांनी मिळून बनवलेला एक शक्तिशाली गट आहे आणि याची स्थापना 1999 साली झाली. याची स्थापना मजबूत अर्थव्यवस्था असलेल्या देशांनी एकत्र येऊन परस्पर सहकार्य करावे, यासाठी झाली. भारताबरोबरच चीन, अमेरिका, रशिया, जर्मनी, जपान, ब्रिटन, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, तुर्की, मेक्सिको, दक्षिण कोरिया, युरोपियन युनियन आणि अर्जेंटिना या देशांचा या गटात समावेश आहे.

G20 समिट बनवण्याचा उद्देश काय होता?

1999 च्या आधी काही वर्षांपासून आशिया खंडातील देश आर्थिक संकटाचा सामना करत होते, त्या पार्श्वभूमीवर जर्मनीमध्ये G8 देशांची बैठक झाली आणि त्यांनी G20 ची स्थापना झाली. यामध्ये मजबूत अर्थव्यवस्था असलेल्या सर्व 20 देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँक गव्हर्नरना बोलावण्यात आले होते. जागतिक आर्थिक समस्यांवर परस्पर चर्चा करून तोडगा काढणं, हा या संघटनेचा उद्देश होता.

जगासाठी G20 चं महत्त्व काय?

G20 च्या ताकदीचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, त्याच्या सदस्य देशांकडे एकत्रितपणे जगाच्या GDP च्या 80 टक्के, लोकसंख्येच्या 60 टक्के आणि जागतिक व्यापारात 75 टक्के वाटा आहे. अशा परिस्थितीत या परिषदेत घेतलेल्या निर्णयाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो.

G20 ची बैठक कुठे होणार हे कसं ठरतं?

सर्व 20 सदस्य देशांमध्ये दरवर्षी रोटेशनची एक प्रणाली आहे, ज्याद्वारे नवीन अध्यक्ष निवडला जातो. जो देश परिषदेचा अध्यक्ष होतो तो G20 बैठका आयोजित करण्याची जबाबदारी पार पाडतो. यंदा भारताने G20 चं अध्यक्षपद भूषवलं आहे, त्यामुळे नवी दिल्लीत ही बैठक होत आहे.

परिषदेत G20 चा भाग नसलेले किती देश आले?

G20 चा भाग नसलेल्या देशांनी देखील परिषदेसाठी आमंत्रित केलं जातं. भारताने नऊ देशांना G20 मध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केलं आहे, ज्यात बांगलादेश, इजिप्त, यूएई, नेदरलँड्स, मॉरिशस, नायजेरिया, ओमान, सिंगापूर आणि स्पेन या देशांचा समावेश आहे.

आतापर्यंत किती G20 बैठका झाल्या?

G20 च्या स्थापनेला 24 वर्षं झाली असली तरी दरवर्षी G20 ची बैठक व्हायलाच हवी, असं नाही. दोन दशकांहून अधिक काळात एकूण 17 वेळा G20 बैठका झाल्या आहेत. G20 परिषद आयोजित करण्याची ही 18वी वेळ आहे. सदस्य देशांचे अर्थमंत्री आणि सेंट्रल बँकेचे गव्हर्नर सभेदरम्यान आर्थिक मुद्द्यांवर चर्चा करतात.

G20 चा सामान्य जनतेला काय फायदा?

G20 बैठकीदरम्यान जगातील अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर आणि तिला प्रोत्साहन देण्यावर चर्चा होते. आर्थिक मजबुतीमुळे देशांमध्ये रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतात. इथे शिक्षण, अन्नधान्याच्या किमती नियंत्रित करणं, रोजगार अशा मुद्द्यांवर देखील चर्चा होते.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

G20 Summit 2023 : परदेशी पाहुण्यांना जेवणासाठी सोन्या-चांदीची भांडी! जेवणही एकदम 'फर्स्ट क्लास', मेन्यूमध्ये कोणते पदार्थ?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता
Live Blog Updates: राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता
Oracle Layoff : आयटी क्षेत्रात पुन्हा मोठी खळबळ! जगप्रसिद्ध कंपनीकडून एकाचवेळी तब्बल 30,000 कर्मचाऱ्यांना नारळ, 12 हजार भारतीयांचा संसार उद्ध्वस्त
आयटी क्षेत्रात पुन्हा मोठी खळबळ! जगप्रसिद्ध कंपनीकडून एकाचवेळी तब्बल 30,000 कर्मचाऱ्यांना नारळ, 12 हजार भारतीयांचा संसार उद्ध्वस्त?
Census 2027 : तब्बल 15 वर्षांनंतर देशभरात आजपासून जनगणनेचा प्रारंभ, दोन टप्प्यात जनगणना, द्यावी लागतील 'या' 33 प्रश्नांची उत्तरे, वाचा A to Z माहिती
तब्बल 15 वर्षांनंतर देशभरात आजपासून जनगणनेचा प्रारंभ, दोन टप्प्यात जनगणना, द्यावी लागतील 'या' 33 प्रश्नांची उत्तरे, वाचा A to Z माहिती
Commercial LPG Cylinder: युद्ध आखातात, महागाईचा भडका भारतात! एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा मोठी वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर
युद्ध आखातात, महागाईचा भडका भारतात! एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा मोठी वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

व्हिडीओ

Ajit Pawar NCP Alliance : विलनीकरणाला माझा कधीच विरोध नव्हता, तटकरेंचं मोठं वक्तव्य
Nashik Police on Ashok Kharat : न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर खरातची वैद्यकीय तपासणी
Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report
Ashok Kharat Daughter Marriage : लग्नपत्रिका खरातच्या मुलीची मांदियाळी नेत्यांची Special Report
Ashok Kharat Case Update : अशोक खरातच्या घराबाहेरुन मोठी घडामोड, मुलाला केली SIT न ताब्यात घेतलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narhari Zirwal : माझी काहीच चूक नाही...; आक्षेपार्ह व्हिडीओवर नरहरी झिरवळांचा सुनेत्रा पवारांना फोन, काय काय घडलं, सगळं सांगितलं
माझी काहीच चूक नाही...; आक्षेपार्ह व्हिडीओवर नरहरी झिरवळांचा सुनेत्रा पवारांना फोन, काय काय घडलं, सगळं सांगितलं
'महाराणी ताराराणी मराठा योद्धा' आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, मराठा-मारवाडी वाद पेटवण्याचा प्रयत्न; निलेशचंद्र मुनींची आचार्य नयन पद्मसागरांना चपराक
'महाराणी ताराराणी मराठा योद्धा' आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, मराठा-मारवाडी वाद पेटवण्याचा प्रयत्न; निलेशचंद्र मुनींची आचार्य नयन पद्मसागरांना चपराक
शिवरायांचे राज्य इतकं नपुसंक का झालं? एक जैन मुनी उपमुख्यमंत्री शिंदेंसमोर सांगतात महाराणी ताराराणी जैन धर्मीय होत्या! मरहट्टे म्हणून मिरवणारे सत्ताधारी गप्प, का? कशासाठी? संजय राऊतांचा प्रहार
शिवरायांचे राज्य इतकं नपुसंक का झालं? एक जैन मुनी उपमुख्यमंत्री शिंदेंसमोर सांगतात महाराणी ताराराणी जैन धर्मीय होत्या! मरहट्टे म्हणून मिरवणारे सत्ताधारी गप्प, का? कशासाठी? संजय राऊतांचा प्रहार
Mumbai News: एक फुल दोन माळी; एका मुलीवरून दोन तरुण भिडले; मुंबईत भर रेल्वे रुळावर फ्री स्टाईल हाणामारी, PHOTO
एक फुल दोन माळी; एका मुलीवरून दोन तरुण भिडले; मुंबईत भर रेल्वे रुळावर फ्री स्टाईल हाणामारी, PHOTO
Mohammed Shami: फिटनेसपासून कामगिरीपर्यंत सर्व सिद्ध करूनही टीम इंडियात संधी मिळेना, मोहम्मद शमी पुन्हा मनातील बोलला, म्हणाला 'ज्यादिवशी कंटाळा येईल त्यादिवशी...'
फिटनेसपासून कामगिरीपर्यंत सर्व सिद्ध करूनही टीम इंडियात संधी मिळेना, मोहम्मद शमी पुन्हा मनातील बोलला, म्हणाला 'ज्यादिवशी कंटाळा येईल त्यादिवशी...'
मोठी बातमी : राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला, शिवाजी कर्डिलेंच्या जागी कोण?
मोठी बातमी : राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला, शिवाजी कर्डिलेंच्या जागी कोण?
Vasai Crime News: मैत्रीचा रक्तरंजित शेवट; पैशाच्या वादातून मित्राचाच शिरच्छेद, सापडू नये म्हणून धड…क्रूर घटनेनं वसई हादरली, नेमकं काय घडलं सत्य आलं समोर
मैत्रीचा रक्तरंजित शेवट; पैशाच्या वादातून मित्राचाच शिरच्छेद, सापडू नये म्हणून धड…क्रूर घटनेनं वसई हादरली, नेमकं काय घडलं सत्य आलं समोर
Video: गाझा साफ केल्यानंतर आता इस्रायलमध्ये पॅलेस्टिनी आरोपींना फक्त दिवसांत 90 दिवसात फासावर लटकवणार; अपील सुद्धा नाही, खासदार मंत्र्यांचा भर संसदेत शॅम्पेन उडवत नंगानाच
Video: गाझा साफ केल्यानंतर आता इस्रायलमध्ये पॅलेस्टिनी आरोपींना फक्त दिवसांत 90 दिवसात फासावर लटकवणार; अपील सुद्धा नाही, खासदार मंत्र्यांचा भर संसदेत शॅम्पेन उडवत नंगानाच
Embed widget