Delhi : मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांच्या संपत्तीवर नक्की कोणाचा अधिकार असेल, याबाबत नुकताच दिल्ली कोर्टानं एक मोठा निर्णय घेतला आहे. गुरूवारी (31 मार्च) मालमत्तेच्या वादावर सुनावणी करताना दिल्ली (Delhi) कोर्टनं सांगितलं की, मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांच्या संपत्तीत जावई आणि नातवांचा हक्क असेल. न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत मालमत्तेची विक्री किंवा अन्य कोणताही अधिकार दुसऱ्या पक्षाला देण्यास स्थगिती दिली आहे.


मालमत्तेबाबत भाच्यानं आपल्या दोन मामांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे
गुरुवारी दिल्लीतील साकेत येथील नरेश कुमार लाकर यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या मालमत्तेच्या वादावर सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान कोर्टानं आदेश दिला. या प्रकरणात भाच्यानं दोन प्रकरणांविरोधात याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये आजोबांच्या मालमत्तेत मामाने हक्क दिला नाही, असे म्हटले आहे.


नातवंड आणि पतीचा संपत्तीमध्ये आहे अधिकार- कोर्ट 


कोर्टानं सुनावणी दरम्यान सांगितलं, जर मुलीचा मृत्यू झाला तर वडिलांच्या संपत्तीमध्ये जावई आणि नातवांचा हक्क असेल. या प्रकरणातजोपर्यंत मालमत्तेतील हिस्सा निश्चित होत नाही तोपर्यंत दुसरा पक्ष मालमत्ता विकू शकत नाही, असही कोर्टानं सांगितलं. 


तसेच कोर्टानं सांगितलं की, याचिका करणाऱ्याची आई ही तिच्या वडिलांच्या संपत्तीची वारसदार होती.  याचिका करणाऱ्याचाही त्या संपत्तीमधील एक तृतीयांश भागावर हक्क होता. त्याचबरोबर या प्रकरणाच्या पुढील तारखेपर्यंत संबंधित कार्यालयाने सर्व मालमत्तांचे मूल्यांकन करावे असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच पुढील आदेशापर्यंत मालमत्तेच्या विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha