Independence Day Celebration : देशभरात कोरोना (Covid-19) रूग्णांची संख्या वाढत असल्याने स्वातंत्र्य दिनाच्या समारंभासाठी कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार नाही असे आवाहन केंद्र सरकारमार्फत करण्यात आले आहे. यावर्षी भारत 75 वा अमृत महोत्सव (Independence Day 2022) साजरा करणार आहे. मात्र, राज्यात तसेच देशभरात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने स्वातंत्र्य दिनाच्या समारंभावेळी जास्त गर्दी करू नये, तसेच मोठे समारंभ आयोजित केले जाऊ नयेत असे आवाहन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. 


देशभरात कोविडची प्रकरणे वाढल्याने स्वातंत्र्य दिनाच्या समारंभासाठी कोणतेही मोठे मेळावे आयोजित केले जाणार नाहीत. केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देखील कळविण्यात आहे की, देशात दररोज सरासरी 15,000 हून अधिक कोरोनाव्हायरस प्रकरणांची नोंद होत असल्याने कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले जाे असे आवाहन करण्यात आले आहे. 


केंद्राने राज्यांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत



  • आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, “कोविड-19 विरुद्ध खबरदारी म्हणून, समारंभातील मोठ्या मंडळींनी उपस्थित राहण्यास टाळावे. कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.”

  • केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी 'स्वच्छ भारत' मोहीम राबविण्यासाठी आणि 'स्वच्छ' ठेवण्यासाठी पंधरवडा आणि महिनाभर मोहीम राबविण्यास सांगितले आहे. 

  • गृह मंत्रालयाने सरकारी विभाग आणि शैक्षणिक संस्थांना पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यास सांगितले आहे.

  • स्वातंत्र्य दिनापूर्वी, सरकारने 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत केंद्रशासित प्रदेशात उत्सव साजरा करण्यासाठी “हर घर तिरंगा” मोहीम सुरू केली आहे.

  • शुक्रवारी अद्ययावत केलेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात 16,561 नवीन कोरोनाव्हायरस प्रकरणे नोंदवली गेली. राजधानी दिल्लीसह महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये कोरोनाचा आलेख वाढताना दिसत आहे.

  • आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी महाराष्ट्रात एक हजार 877 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांमध्ये राज्यात एकूण 1971 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, बुधवारी राज्यात 1847 नवे रुग्ण आढळले होते तर मंगळवारी राज्यात 1782 नव्या रुग्णांची भर पडली होती.  


महत्वाच्या बातम्या :