एक्स्प्लोर

Coronavirus Today : देशात 125 दिवसांनी सर्वात कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद, तर 374 रुग्णांचा मृत्यू

Coronavirus Today : देशात 125 दिवसांनी सर्वात कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद, तर 374 रुग्णांचा मृत्यू कोरोनाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 1.68 टक्के, तर देशाचा रिकव्हरी रेट 97.37 टक्क्यांवर पोहोचला

Coronavirus Today : देशात आज 125 दिवसांनी कोरोना व्हायरसच्या सर्वात कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आज 30 हजार 93 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 97.37 टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच कोरोनाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 1.68 टक्के आहे. देशात काल (सोमवारी) 374 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी आकडेवारी आणि आतापर्यंतची लसीकरणाची आकडेवारी. 

आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3 कोटी 11 लाख 74 हजार 322 वर पोहोचला आहे. अशातच सोमवारी 374 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यामुळे एकूण 4 लाख 14 हजार 482 वर पोहोचली आहे. देशात 45 हजार 254 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 3 कोटी 3 लाख 53 हजार 710 वर पोहोचली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची एकूण संख्या 4 लाख 6 हाजर 130 वर पोहोचला आहे. 

देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 52 लाख 67 हजार 309 लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर एकूण लसीकरणाचा आकडा 41 कोटी 18 लाख 46 हजार 401 वर पोहोचला आहे. 

आयसीएमआरनं ट्वीट करत दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोना व्हायरससाठी 17 लाख 92 हजार 336 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आतापर्यंत एकूण 44 कोटी 73 लाख 41 हजार 133 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. 

राज्यात सोमवारी 6017 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, अॅक्टिव रुग्णसंख्या एक लाखाच्या खाली

राज्यात काल (सोमवारी)  6 हजार 17 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर त्याच्या दुप्पट रुग्ण आज कोरोनामुक्त झाले आहेत. काल राज्यात 13 हजार 51 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 59 लाख 93 हजार 401 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.35 टक्के आहे. 

राज्यातील अॅक्टिव रुग्णसंख्या ही एक लाखाच्या खाली आली आहे. राज्यात सध्या 96 हजार 375 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर राज्यात काल 66 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे.

तब्बल 42 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. जालना (39), हिंगोली (67), यवतमाळ (25), गोंदिया (60), चंद्रपूर (49)  या पाच जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15,768 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

मुंबई, पुण्यातील कोरोनाची सद्यस्थिती

मुंबईत गेल्या 24 तासात 402 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 577 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,07,129 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 6,349 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1034 दिवसांवर गेला आहे. 

तर पुणे महापालिका क्षेत्रात आज 196 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 289 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुण्यात 2855 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल (सोमवार) एकूण सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद पुणे महापालिका क्षेत्रात करण्यात आली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Pegasus Spying: 'भारतात कुणाचीही हेरगिरी नाही, सर्वांची प्रायव्हसी सुरक्षित', भारत सरकारचं स्पष्टीकरण

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget