Corona Cases : ऑगस्टमध्ये देशातील आकडा वाढता, आज 45 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद
Coronavirus Cases Today : गेल्या 24 तासांत 44,643 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 464 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, देशभरात गेल्या 24 तासांत 41,096 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
![Corona Cases : ऑगस्टमध्ये देशातील आकडा वाढता, आज 45 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद corona cases daily update 06th August 2021 india reports covid new cases deaths second wave Corona Cases : ऑगस्टमध्ये देशातील आकडा वाढता, आज 45 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/04/9178e6da76d140271a9f784b96f23a9c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Coronavirus Cases Today : भारतात कोरोनाची दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावात घट झाली असली तरी धोका अद्याप टळलेला नाही. ऑगस्ट महिन्यात नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 44,643 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 464 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, देशभरात गेल्या 24 तासांत 41,096 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
यापूर्वी गुरुवारी देशात 42,982 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तर 533 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. म्हणजेच, कालपासून जवळपास चार टक्क्यांनी अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.
केरळात वाढता प्रादुर्भाव
केरळात गुरुवारी कोरोनाच्या 22,040 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. त्यानंतर राज्यातील एकूण बाधितांची संख्या वाढून 34.93 लाखांवर पोहोचली आहे. तर 117 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 17,328 वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 32 लाख 97 हजार 834 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या 1,77,924 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यात काल (गुरुवारी) 6695 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यात काल (गुरुवारी) 6695 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 120 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 17 हजार 560 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.66 टक्के झाले आहे.
राज्यात काल (गुरुवारी) कोरोनामुळे 120 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे. तब्बल 34 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 74 हजार 995 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण सहा जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण 100 च्या खाली आहेत. नंदूरबार (10), हिंगोली (76), अमरावती (87), वाशिम (94), गोंदिया (95), गडचिरोली (31) या सात जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 974अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
भिवंडी निजामपूर महानगरपालिका, मालेगाव महानगरपालिका, जळगाव महानगरपालिका, नंदूरबार, हिंगोली, परभणी, अकोला महानगरपालिका, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया या अकरा महानगरपालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज शून्य रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,89,62,106 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,36,220 (12.94 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,46,501 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,776 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 324 कोरोना बाधित रुग्णांची नोंद
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)