एक्स्प्लोर

Rahul Gandhi on Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला राहुल गांधीचे उत्तर, म्हणाले...

Rahul Gandhi on Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत काँग्रेसवर केलेल्या टीकेला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर दिले आहे.

Rahul Gandhi on Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी आज राज्यसभेत काँग्रेसवर जोरदार टीका केली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभाराच्या प्रस्तावावर बोलताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर चांगलाच हल्लाबोल केला होता. नरेंद्र मोदी यांच्या या टीकेला आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी उत्तर दिले आहे. 

"काँग्रेस पक्ष सत्य बोलत आहे. त्यामुळे पंतप्रधान काँग्रेसला घाबरत आहेत. त्यांच्यामध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यांचा पूर्ण व्यवसाय मार्केटिंगचा आहे. त्यांच्यातील भीती आजच्या भाषणातून दिसली. राज्यसभेतील संपूर्ण भाषण काँग्रेसवर आणि जवाहरलाल नेहरू यांच्यावरच होतं. काँग्रेसने काय केले नाही, हे मोदींनी सांगितले. परंतु, भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत त्यावर ते काही बोलले नाहीत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.  

राहुल गांधी म्हणाले, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संपूर्ण आयुष्यभर देशाची सेवा केली. त्यांच्याबद्दल कोणी प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही. गांधी कुटंबातील अनेकांनी देशासाठी योगदान दिले आहे. मी बोललेल्या तीन गोष्टींवर नरेंद्र मोदी यांनी काही उत्तर दिले नाही. मी म्हणालो होतो की, 'दोन हिंदुस्थान बनवले जात आहेत, त्यापैकी एक करोडो लोकांसाठी आहे आणि दुसरा काही श्रीमंत लोकांसाठी आहे. त्याबरोबरच आमच्या सर्व संस्था एकापाठोपाठ एक काबीज केल्या जात आहेत, त्यामुळे देशाचे नुकसान होत आहे. तिसरी गोष्ट अशी की, पंतप्रधानांच्या दिवाळखोर परराष्ट्र धोरणामुळे चीन आणि पाकिस्तान एक झाले आहेत, ही देशासाठी अत्यंत धोकादायक बाब आहे."  

काय म्हणाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी? 
"काँग्रेस नसती तर आणीबाणीचा कलंक लागला नसता. काँग्रेस नसती तर घराणेशाहीला आळा बसला असता. काँग्रेसमुळे देशाचं मोठं नुकसान झालं आहे. काँग्रेस नसती तर जातीयवाद संपला असता. काँग्रेस नसती तर शिखांचा नरसंहार झाला नसता, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली.   

"काँग्रेसला फक्त उपदेश देण्याची सवय आहे, असा आरोप करत नरेंद्र मोदी म्हणाले, "देशात काँग्रेस नसती तर भ्रष्टाचार झाला नसता, सरकार अस्थिर करणं हेच काँग्रेसचं काम आहे. राष्ट्रीय या शब्दावर काँग्रेसला आक्षेप आहे तर काँग्रेसने पक्षाचं नाव बदलून आपल्या पूर्वजांची चूक सुधारली पाहिजे. काँग्रेस नसती तर काश्मीरच्या पंडितांना काश्मीर सोडावा लागला नसता. काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी देशाचा विकास केला नाही, आता विरोधात आहे तर विकासात अडथळा आणत आहेत,  केंद्रात सत्ता असताना काँग्रेसने 50 पेक्षा जास्त राज्य सरकारे बरखास्त केली असा आरोप नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर केला.  

PM Modi : देशातली राज्य सरकारं अस्थिर करणं हीच काँग्रेस हायकमांडची नीती : पंतप्रधान : Rajya Sabha

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 05 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Nirupam on Ravindra Waykar : EVM Hack केलं असतं तर वायकर कमी लीडने जिंकले नसतेPraful Patel :  मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच? केंद्रीय मंत्रिपदावर प्रफुल पटेलांचा दावाTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 04 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Embed widget