एक्स्प्लोर

Rahul Gandhi on Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला राहुल गांधीचे उत्तर, म्हणाले...

Rahul Gandhi on Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत काँग्रेसवर केलेल्या टीकेला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर दिले आहे.

Rahul Gandhi on Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी आज राज्यसभेत काँग्रेसवर जोरदार टीका केली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभाराच्या प्रस्तावावर बोलताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर चांगलाच हल्लाबोल केला होता. नरेंद्र मोदी यांच्या या टीकेला आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी उत्तर दिले आहे. 

"काँग्रेस पक्ष सत्य बोलत आहे. त्यामुळे पंतप्रधान काँग्रेसला घाबरत आहेत. त्यांच्यामध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यांचा पूर्ण व्यवसाय मार्केटिंगचा आहे. त्यांच्यातील भीती आजच्या भाषणातून दिसली. राज्यसभेतील संपूर्ण भाषण काँग्रेसवर आणि जवाहरलाल नेहरू यांच्यावरच होतं. काँग्रेसने काय केले नाही, हे मोदींनी सांगितले. परंतु, भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत त्यावर ते काही बोलले नाहीत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.  

राहुल गांधी म्हणाले, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संपूर्ण आयुष्यभर देशाची सेवा केली. त्यांच्याबद्दल कोणी प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही. गांधी कुटंबातील अनेकांनी देशासाठी योगदान दिले आहे. मी बोललेल्या तीन गोष्टींवर नरेंद्र मोदी यांनी काही उत्तर दिले नाही. मी म्हणालो होतो की, 'दोन हिंदुस्थान बनवले जात आहेत, त्यापैकी एक करोडो लोकांसाठी आहे आणि दुसरा काही श्रीमंत लोकांसाठी आहे. त्याबरोबरच आमच्या सर्व संस्था एकापाठोपाठ एक काबीज केल्या जात आहेत, त्यामुळे देशाचे नुकसान होत आहे. तिसरी गोष्ट अशी की, पंतप्रधानांच्या दिवाळखोर परराष्ट्र धोरणामुळे चीन आणि पाकिस्तान एक झाले आहेत, ही देशासाठी अत्यंत धोकादायक बाब आहे."  

काय म्हणाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी? 
"काँग्रेस नसती तर आणीबाणीचा कलंक लागला नसता. काँग्रेस नसती तर घराणेशाहीला आळा बसला असता. काँग्रेसमुळे देशाचं मोठं नुकसान झालं आहे. काँग्रेस नसती तर जातीयवाद संपला असता. काँग्रेस नसती तर शिखांचा नरसंहार झाला नसता, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली.   

"काँग्रेसला फक्त उपदेश देण्याची सवय आहे, असा आरोप करत नरेंद्र मोदी म्हणाले, "देशात काँग्रेस नसती तर भ्रष्टाचार झाला नसता, सरकार अस्थिर करणं हेच काँग्रेसचं काम आहे. राष्ट्रीय या शब्दावर काँग्रेसला आक्षेप आहे तर काँग्रेसने पक्षाचं नाव बदलून आपल्या पूर्वजांची चूक सुधारली पाहिजे. काँग्रेस नसती तर काश्मीरच्या पंडितांना काश्मीर सोडावा लागला नसता. काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी देशाचा विकास केला नाही, आता विरोधात आहे तर विकासात अडथळा आणत आहेत,  केंद्रात सत्ता असताना काँग्रेसने 50 पेक्षा जास्त राज्य सरकारे बरखास्त केली असा आरोप नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर केला.  

PM Modi : देशातली राज्य सरकारं अस्थिर करणं हीच काँग्रेस हायकमांडची नीती : पंतप्रधान : Rajya Sabha

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget