एक्स्प्लोर

मोदी औरंगजेबापेक्षाही क्रूर हुकूमशाह ; काँग्रेसचा पलटवार

“ देशात गेल्या 49 महिन्यांपासून अघोषित आणीबाणी सुरु आहे. इंदिरा गांधींना दोष देऊन शेतकऱ्यांना तुम्ही दिलेले दीडपट हमीभावाचे आश्वासन पूर्ण होणार आहे का,” असा बोचरा सवालही सुरजेवालांनी केला.

नवी दिल्ली : “औरंगजेबापेक्षाही क्रूर हुकूमशाह असलेल्या नरेंद्र मोदींनी आज देशाला 43 वर्षांपूर्वीच्या आणीबाणीबाबत धडे दिले. पण ते विसरले की औरंगजेबने फक्त आपल्या वडिलांना वेठीस धरलं होतं. या 49 महिन्यांच्या अघोषित आणीबाणीत मोदींनी तर स्वत:च्या पक्षासह लोकशाहीलाच वेठीस धरलं आहे,” असं म्हणत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशावर लादलेल्या आणीबाणीला 43 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर आरोप केले होते. त्यावर उत्तर देताना काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, “ देशात गेल्या 49 महिन्यांपासून अघोषित आणीबाणी सुरु आहे. इंदिरा गांधींना दोष देऊन शेतकऱ्यांना तुम्ही दिलेले दीडपट हमीभावाचे आश्वासन पूर्ण होणार आहे का,” असा बोचरा सवालही सुरजेवालांनी केला. ‘आणीबाणीची आठवण काढून तुम्हाला अच्छे दिन आणता येणार आहेत का,’ असंही त्यांनी मोदींना विचारलं. पुढे बोलताना सुरजेवाला म्हणाले, “इंदिरा गांधींनी एक व्यापक लढाई लढली होती.” दरम्यान, “काँग्रेस आजही आणीबाणीच्याच मानसिकतेत असून न्यायमूर्तींवर महाभियोग आणणं आणि आणीबाणी लादणं यामध्ये काहीही फरक नाही,” असं विधान मुंबईतील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

UPI  पेमेंट शुल्काबाबत मोठा निर्णय! दरवर्षी सरकारला किती हजार कोटींचा फायदा मिळणार? आकडेवारी समोर
UPI  पेमेंट शुल्काबाबत मोठा निर्णय! दरवर्षी सरकारला किती हजार कोटींचा फायदा मिळणार? आकडेवारी समोर
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
प्रवाशांच्या खिशाला मोठी झळ! लहान मुलांसाठी इंडिगो विमान प्रवास महागला, वेगळी सीट नाही तरीही 3 हजार द्यावे लागणार
प्रवाशांच्या खिशाला मोठी झळ! लहान मुलांसाठी इंडिगो विमान प्रवास महागला, वेगळी सीट नाही तरीही 3 हजार द्यावे लागणार
पृथ्वी शॉ च्या आयुष्यात मोठं वादळ, सहा महिन्यातच आकृती अग्रवालसोबचं नातं संपवलं! नेमकं काय घडलं? आकृतीची भावनिक पोस्ट
पृथ्वी शॉ च्या आयुष्यात मोठं वादळ, सहा महिन्यातच आकृती अग्रवालसोबचं नातं संपवलं! नेमकं काय घडलं? आकृतीची भावनिक पोस्ट

व्हिडीओ

Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?
Seema Pahuja Supervising Disha Salian Case : लक्ष तपासावर जबाबदारी लेडी सिंघमवर | Special Report ABP Majha
PM Modi’s schoolmate Asgar Ali gets relief in land dispute : मोदींशी मैत्री अखंड; परत मिळाला भूखंड | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Relaunching : मिस यू दादा... आता वहिनींचा वादा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे सलाईनवर, तरी ठाम निर्णयावर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs AFG : संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पावर प्ले मध्ये केली आहे आजवर कुणाला न जमणारी कामगिरी
संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पॉवरप्लेमध्ये विक्रमी कामगिरी
N Chandrasekaran: अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
Gokul Election: गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
Sanjay Raut : संजय राऊत यांचं
संजय राऊत यांचं नवं पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला,  "बोध कीर्तन" पुस्तकात नेमकं काय असणार? 
Embed widget