एक्स्प्लोर

Delhi Protest : दिल्लीतील CJP आंदोलनाला पाकिस्तानच्या Gen Z चा पाठिंबा; भारत सरकारनं दिला पाकिस्तानला थेट इशारा

MEA On Pakistan Support CJP Protest : भारताच्या अंतर्गत गोष्टीमध्ये हस्तक्षेप करण्यापेक्षा सीमापार दहशतवाद संपवण्यावर लक्ष द्या, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला उत्तर दिलं आहे. 

नवी दिल्ली : भारतातील जंतर-मंतरवर पार पडलेल्या विद्यार्थ्यांच्या आणि 'कॉकरोच जनता पक्षाच्या' (CJP) आंदोलनाला पाकिस्तानमधील काही Gen-Z  गटांकडून मिळालेल्या पाठिंब्यावर भारत सरकारने अत्यंत कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. इतर देशांतील अशा अंतर्गत मुद्द्यांवर भाष्य करण्याऐवजी पाकिस्तानने स्वतःच्या देशातून चालणाऱ्या दहशतवादाचा अंत करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असा खरमरीत सल्ला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) दिला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, पाकिस्तान गेल्या अनेक दशकांपासून भारताच्या विरोधात सीमापार दहशतवादाला खतपाणी घालत आहे, ही वस्तुस्थिती सर्वांनाच ठाऊक आहे.

MEA Spokesperson Statement : सीमापार दहशतवाद बंदीचीच मागणी

दिल्लीसह देशातील विविध शहरांत पार पडलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही पाकिस्तानी तरुणांनी सोशल मीडियावरून भारतीय आंदोलकांना पाठिंबा दर्शवला होता. यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रणधीर जयस्वाल म्हणाले की, "भारतातील नागरिक आणि तरुण (Gen Z) हीच मागणी करत आहेत की, पाकिस्तानने आपल्या देशातून होणारा दहशतवाद तात्काळ बंद करावा. आम्हाला आशा आहे की, पाकिस्तानातील तरुण आणि नागरिकही या महत्त्वाच्या मागणीकडे लक्ष देतील." 

Pakistan Foreign Ministry On CJP : पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका

दुसरीकडे, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील या आंदोलनांवर अधिकृत टिप्पणी करण्याचे टाळले आहे. पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ताहिर अंद्राबी यांनी हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचे सांगत त्यावर भाष्य करण्यास नकार दिला होता. मात्र, असे असले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानातील अनेक तरुणांनी या निदर्शनांना पाठिंबा देत दोन्ही देशांच्या सामायिक इतिहासाचा संदर्भ दिला होता.

Indus Valley Civilization Claim : सिंधू संस्कृतीच्या दाव्यावर सडेतोड उत्तर

सिंधू संस्कृतीच्या (Indus Valley Civilization) सामायिक वारशासंबंधी पाकिस्तानने केलेल्या दाव्यांवरही रणधीर जयस्वाल यांनी जोरदार पलटवार केला. ते म्हणाले, "दशकांपासून सीमापार दहशतवादाला खतपाणी घालणारा, धार्मिक कट्टरता आणि हिंसाचाराला पाठिंबा देणारा देश कोणत्याही बहुलतावादी सांस्कृतिक वारशावर हक्क सांगू शकत नाही. अल्पसंख्याक आणि त्यांच्या सांस्कृतिक हक्कांचे रक्षण करण्याच्या बाबतीत पाकिस्तानचा अत्यंत खराब रेकॉर्ड पाहता त्यांचे हे दावे केवळ दाखवण्यापुरते आहेत."

Indus Waters Treaty Context : दहशतवाद आणि सांस्कृतिक वारसा एकत्र अशक्य

नुकतेच पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार यांनी सिंधू संस्कृती हा पाकिस्तानच्या राष्ट्रीय ओळखीचा भाग असल्याचे विधान केले होते. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर भारताने 'सिंधू पाणी करार' (Indus Waters Treaty) स्थगित केला होता. पाकिस्तान-पुरस्कृत सीमापार दहशतवादामुळेच या कराराची मूळ भावना कमकुवत झाली आहे, असे भारताने ठामपणे स्पष्ट केले आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Protest : दिल्लीतील CJP आंदोलनाला पाकिस्तानच्या Gen Z चा पाठिंबा; भारत सरकारनं दिला पाकिस्तानला थेट इशारा
दिल्लीतील CJP आंदोलनाला पाकिस्तानच्या Gen Z चा पाठिंबा; भारत सरकारनं दिला पाकिस्तानला थेट इशारा
Abhijeet Dipke On Kangana Ranaut: गटारछाप पिढी म्हणत कंगना रणौत नको नको ते बोलली; आता अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, 5 शब्दांत विषय संपवून टाकला!
गटारछाप पिढी म्हणत कंगना रणौत नको नको ते बोलली; आता अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, 5 शब्दांत विषय संपवून टाकला!
Akhilesh Yadav and Rahul Gandhi : राहुल गांधींकडून संसदेत अमित शाहांवर गंभीर आरोपांच्या फैरी, भाजपकडून जोरदार पलटवार होताच अखिलेश यादव मदतीला धावले, म्हणाले....
राहुल गांधींकडून संसदेत अमित शाहांवर गंभीर आरोपांच्या फैरी, भाजपकडून जोरदार पलटवार होताच अखिलेश यादव मदतीला धावले, म्हणाले....
Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Embed widget