एक्स्प्लोर

Chenab Rail Bridge : जगातील सर्वात उंच ब्रीजवर भारतीय रेल्वे 15 ऑगस्टला दिमाखात धावणार; 20 वर्षांनी स्वप्न साकार

जगातील सर्वात उंच स्टीलच्या कमान पूल चिनाब रेल्वे ब्रिजवर (Chenab Rail Bridge) भारतीय रेल्वे दिमाखात धावणार आहे. त्यामुळे गेल्या 20 वर्षांपासूनची प्रतीक्षा संपणार आहे.

Chenab Rail Bridge : येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच स्टीलच्या कमान पूल चिनाब रेल्वे ब्रिजवर (Chenab Rail Bridge) भारतीय रेल्वे दिमाखात धावणार आहे. त्यामुळे गेल्या 20 वर्षांपासूनची प्रतीक्षा संपणार आहे. सांगलदन ते रियासी दरम्यान धावणारी ही रेल्वे सेवा उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक (USBRL) प्रकल्पाचा भाग आहे.

हा पूल पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षा 29 मीटर उंच 

20 जून रोजी या पुलावर ट्रेनची ट्रायल रन झाली होती. यापूर्वी 16 जून रोजी या पुलावर इलेक्ट्रिक इंजिनची चाचणी घेण्यात आली होती. हा पूल पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षा 29 मीटर उंच आहे. आयफेल टॉवरची उंची 330 मीटर आहे, तर 1.3 किमी लांबीचा हा पूल चिनाब नदीवर 359 मीटर उंचीवर बांधण्यात आला आहे. हा पूल 40 किलोपर्यंतची स्फोटके आणि 8 रिश्टर स्केलपर्यंतचे भूकंप सहन करू शकतो. पाकिस्तानी सीमेपासून त्याचे हवाई अंतर केवळ 65 किमी आहे. हा पूल उघडल्यानंतर काश्मीर खोरे भारताच्या इतर भागांशी प्रत्येक मोसमात गाड्यांद्वारे जोडले जाईल.

यूएसबीआरएल प्रकल्प 1997 मध्ये सुरू झाला. याअंतर्गत 272 किमीचा रेल्वेमार्ग टाकण्यात येणार होता. आतापर्यंत विविध टप्प्यांत 209 किमीची लाईन टाकण्यात आली आहे. या वर्षाच्या अखेरीस, रियासी ते कटरा जोडणारी शेवटची 17 किमीची लाईन टाकली जाईल, त्यानंतर प्रवाशांना जम्मूमधील रियासी ते काश्मीरमधील बारामुल्ला असा प्रवास करता येईल.

20 वर्षात पूल बांधून पूर्ण झाला

स्वातंत्र्याला 76 वर्षे पूर्ण होऊनही काश्मीर खोरे बर्फवृष्टीच्या काळात देशाच्या इतर भागांपासून तुटलेले राहिले. 22 फेब्रुवारी 2024 पर्यंत काश्मीर खोऱ्यात फक्त राष्ट्रीय महामार्ग-44 वरूनच पोहोचता येत होते. काश्मीर खोऱ्याकडे जाणारा हा रस्ताही बर्फवृष्टीमुळे बंद असायचा. याशिवाय काश्मीरला जाण्यासाठी गाड्या जम्मू-तवीपर्यंत जात होत्या, तेथून लोकांना रस्त्याने सुमारे 350 किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता. जवाहर बोगद्यातून जाणाऱ्या या मार्गाने जम्मू-तावीहून घाटीत जाण्यासाठी लोकांना 8 ते 10 तास लागायचे.

2003 मध्ये चिनाब पूल बांधण्याचा निर्णय

2003 मध्ये, भारत सरकारने सर्व हवामान आधारावर काश्मीर खोऱ्याला देशाच्या इतर भागांशी जोडण्यासाठी चिनाब पूल बांधण्याचा निर्णय घेतला. त्याच वर्षी सरकारने चिनाब ब्रिज प्रकल्पालाही मान्यता दिली. हा पूल 2009 पर्यंत तयार होणार होता. मात्र, तसे झाले नाही. आता जवळपास 2 दशकांनंतर चिनाब नदीवर बांधलेला हा पूल तयार झाला आहे. हा पूल 40 किलोपर्यंतची स्फोटके आणि 8 रिश्टर स्केलपर्यंतचे भूकंप सहन करू शकतो. हा पूल पुढील 120 वर्षांसाठी बांधण्यात आला आहे.

चिनाब ब्रिज 120 वर्षे भूकंप, पूर, हिमवर्षाव सहन करू शकतो

काश्मीर खोऱ्यात सर्व हवामान प्रवेश देण्यासाठी भारत सरकारने 35,000 कोटी रुपये खर्चून उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्प सुरू केला आहे. या योजनेअंतर्गत हा पूल बांधण्यात आला आहे. केंद्र सरकारने एक भारत श्रेष्ठ भारत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत चिनाब नदीवर या पुलाचे बांधकाम सुरू केले होते. जगातील सर्वात उंच पूल भूकंप, पूर, बर्फवृष्टी आणि स्फोटकांपासून संरक्षण करण्यासाठी खास तयार करण्यात आला आहे. पुलाचे क्षेत्र भूकंप झोन चारमध्ये येते, परंतु ते भूकंप झोन पाचसाठी डिझाइन केले गेले आहे, म्हणजेच तो भूकंपांपासून पूर्णपणे सुरक्षित आहे आणि रिश्टर स्केलवर 8 तीव्रतेच्या भूकंपाचाही सहज सामना करू शकतो. 

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: छगन भुजबळांना राज्यसभा अन् समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद? राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटले, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता
छगन भुजबळांना राज्यसभा अन् समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद? राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटले, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता
CAMIT : पेट्रोल- डिझेल कॅन किंवा डबकीमध्ये दिल्यास पंपाचा परवाना रद्द होणार, सरकारच्या निर्णयाला कॅमीट संघटनेचा तीव्र विरोध, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हस्तक्षेपाची मागणी
पेट्रोल- डिझेल कॅन किंवा डबकीमध्ये दिल्यास पंपाचा परवाना रद्द होणार, सरकारच्या निर्णयाला कॅमीट संघटनेचा तीव्र विरोध, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हस्तक्षेपाची मागणी
Cockroach Janta Party Abhijeet Dipke: मोठी बातमी: कॉकरोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाला पोलिसांची परवानगी, अभिजीत दिपकेंनी भारतात पाऊल ठेवताच मोठं यश
कॉकरोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाला पोलिसांची परवानगी, अभिजीत दिपकेंनी भारतात पाऊल ठेवताच मोठं यश

व्हिडीओ

Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray Shiv Rajyabhishek din 2026: शिवराज्याभिषेक दिनी राज ठाकरेंचं मराठीजनांना खास आवाहन, म्हणाले...
Raj Thackeray Shiv Rajyabhishek din 2026: शिवराज्याभिषेक दिनी राज ठाकरेंचं मराठीजनांना खास आवाहन, म्हणाले...
बीडमध्ये शेतकऱ्याने मोसंबी बागेवर फिरवला जेसीबी; पाण्याअभावी वाळून गेली बाग, जाळून केली खाक
बीडमध्ये शेतकऱ्याने मोसंबी बागेवर फिरवला जेसीबी; पाण्याअभावी वाळून गेली बाग, जाळून केली खाक
Monsoon Rain Maharashtra: मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट, परिस्थिती पोषक, देवगडमध्ये..
मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट, परिस्थिती पोषक, देवगडमध्ये..
आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
Suryakumar Yadav : टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्मासोबत जे घडलं, तेच सूर्यकुमार यादव सोबत झालं, BCCI च्या निर्णयानं सगळे चक्रावले...
टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्मासोबत जे घडलं, तेच सूर्यकुमार यादव सोबत झालं, BCCI चा मोठा निर्णय
Bal Mane Vidhan Parishad Election 2026 : माघार अन् हकालपट्टीनंतर बाळ मानेंचे लागोपाठ दुसऱ्या दिवशी 'ते' स्टेटस चर्चेत; कोकणच्या राजकारणात तर्कवितर्कांना वेग, रोख नेमका कुणाकडे?
माघार अन् हकालपट्टीनंतर बाळ मानेंचे लागोपाठ दुसऱ्या दिवशी 'ते' स्टेटस चर्चेत; कोकणच्या राजकारणात तर्कवितर्कांना वेग, रोख नेमका कुणाकडे?
Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: छगन भुजबळांना राज्यसभा अन् समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद? राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटले, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता
छगन भुजबळांना राज्यसभा अन् समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद? राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटले, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता
राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होते का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल
राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होते का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल
Embed widget