एक्स्प्लोर

Chenab Rail Bridge : जगातील सर्वात उंच ब्रीजवर भारतीय रेल्वे 15 ऑगस्टला दिमाखात धावणार; 20 वर्षांनी स्वप्न साकार

जगातील सर्वात उंच स्टीलच्या कमान पूल चिनाब रेल्वे ब्रिजवर (Chenab Rail Bridge) भारतीय रेल्वे दिमाखात धावणार आहे. त्यामुळे गेल्या 20 वर्षांपासूनची प्रतीक्षा संपणार आहे.

Chenab Rail Bridge : येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच स्टीलच्या कमान पूल चिनाब रेल्वे ब्रिजवर (Chenab Rail Bridge) भारतीय रेल्वे दिमाखात धावणार आहे. त्यामुळे गेल्या 20 वर्षांपासूनची प्रतीक्षा संपणार आहे. सांगलदन ते रियासी दरम्यान धावणारी ही रेल्वे सेवा उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक (USBRL) प्रकल्पाचा भाग आहे.

हा पूल पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षा 29 मीटर उंच 

20 जून रोजी या पुलावर ट्रेनची ट्रायल रन झाली होती. यापूर्वी 16 जून रोजी या पुलावर इलेक्ट्रिक इंजिनची चाचणी घेण्यात आली होती. हा पूल पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षा 29 मीटर उंच आहे. आयफेल टॉवरची उंची 330 मीटर आहे, तर 1.3 किमी लांबीचा हा पूल चिनाब नदीवर 359 मीटर उंचीवर बांधण्यात आला आहे. हा पूल 40 किलोपर्यंतची स्फोटके आणि 8 रिश्टर स्केलपर्यंतचे भूकंप सहन करू शकतो. पाकिस्तानी सीमेपासून त्याचे हवाई अंतर केवळ 65 किमी आहे. हा पूल उघडल्यानंतर काश्मीर खोरे भारताच्या इतर भागांशी प्रत्येक मोसमात गाड्यांद्वारे जोडले जाईल.

यूएसबीआरएल प्रकल्प 1997 मध्ये सुरू झाला. याअंतर्गत 272 किमीचा रेल्वेमार्ग टाकण्यात येणार होता. आतापर्यंत विविध टप्प्यांत 209 किमीची लाईन टाकण्यात आली आहे. या वर्षाच्या अखेरीस, रियासी ते कटरा जोडणारी शेवटची 17 किमीची लाईन टाकली जाईल, त्यानंतर प्रवाशांना जम्मूमधील रियासी ते काश्मीरमधील बारामुल्ला असा प्रवास करता येईल.

20 वर्षात पूल बांधून पूर्ण झाला

स्वातंत्र्याला 76 वर्षे पूर्ण होऊनही काश्मीर खोरे बर्फवृष्टीच्या काळात देशाच्या इतर भागांपासून तुटलेले राहिले. 22 फेब्रुवारी 2024 पर्यंत काश्मीर खोऱ्यात फक्त राष्ट्रीय महामार्ग-44 वरूनच पोहोचता येत होते. काश्मीर खोऱ्याकडे जाणारा हा रस्ताही बर्फवृष्टीमुळे बंद असायचा. याशिवाय काश्मीरला जाण्यासाठी गाड्या जम्मू-तवीपर्यंत जात होत्या, तेथून लोकांना रस्त्याने सुमारे 350 किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता. जवाहर बोगद्यातून जाणाऱ्या या मार्गाने जम्मू-तावीहून घाटीत जाण्यासाठी लोकांना 8 ते 10 तास लागायचे.

2003 मध्ये चिनाब पूल बांधण्याचा निर्णय

2003 मध्ये, भारत सरकारने सर्व हवामान आधारावर काश्मीर खोऱ्याला देशाच्या इतर भागांशी जोडण्यासाठी चिनाब पूल बांधण्याचा निर्णय घेतला. त्याच वर्षी सरकारने चिनाब ब्रिज प्रकल्पालाही मान्यता दिली. हा पूल 2009 पर्यंत तयार होणार होता. मात्र, तसे झाले नाही. आता जवळपास 2 दशकांनंतर चिनाब नदीवर बांधलेला हा पूल तयार झाला आहे. हा पूल 40 किलोपर्यंतची स्फोटके आणि 8 रिश्टर स्केलपर्यंतचे भूकंप सहन करू शकतो. हा पूल पुढील 120 वर्षांसाठी बांधण्यात आला आहे.

चिनाब ब्रिज 120 वर्षे भूकंप, पूर, हिमवर्षाव सहन करू शकतो

काश्मीर खोऱ्यात सर्व हवामान प्रवेश देण्यासाठी भारत सरकारने 35,000 कोटी रुपये खर्चून उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्प सुरू केला आहे. या योजनेअंतर्गत हा पूल बांधण्यात आला आहे. केंद्र सरकारने एक भारत श्रेष्ठ भारत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत चिनाब नदीवर या पुलाचे बांधकाम सुरू केले होते. जगातील सर्वात उंच पूल भूकंप, पूर, बर्फवृष्टी आणि स्फोटकांपासून संरक्षण करण्यासाठी खास तयार करण्यात आला आहे. पुलाचे क्षेत्र भूकंप झोन चारमध्ये येते, परंतु ते भूकंप झोन पाचसाठी डिझाइन केले गेले आहे, म्हणजेच तो भूकंपांपासून पूर्णपणे सुरक्षित आहे आणि रिश्टर स्केलवर 8 तीव्रतेच्या भूकंपाचाही सहज सामना करू शकतो. 

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
CAG Report: रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
Embed widget