एक्स्प्लोर

पिकांना वाढीव दर मिळणार, केंद्र सरकारची नवी हमीभाव योजना

शेतकऱ्यांवर हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल विकण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रामुख्याने ही योजना असेल.

नवी दिल्ली : पिकांना सध्या जो हमीभाव देण्यात आला आहे, त्यापेक्षाही जास्त दर मिळण्यासाठी केंद्र सरकारने बाजार हमीभाव योजना आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी विविध राज्य सरकारसोबत सध्या चर्चा सुरु आहे. शेतकऱ्यांवर हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल विकण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रामुख्याने ही योजना असेल. काय आहे बाजार हमीभाव योजना? या योजनेनुसार जे दर जाहीर करण्यात आले आहेत, त्या दराने सर्व प्रकारचा शेतमाल खरेदी करण्याची राज्य सरकारला परवानगी असेल. फक्त यामध्ये भात आणि गहू पिकाचा समावेश नसेल, कारण हे दोन्ही शेतमाल केंद्र सरकारकडून अगोदरपासूनच सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी खरेदी केले जातात. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या धान्याचं काही नुकसान झाल्यास केंद्र सरकार त्याची 30 टक्के नुकसान भरपाई देईल. नव्या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतमालाच्या कापणीनंतर आवक वाढून दर घसरण्याचा जो धोका असतो, तो कमी होईल. गेल्या दोन वर्षांपासून पावसाने फिरवलेली पाठ आणि दुष्काळामुळे ग्रामीण भागावर मोठा परिणाम झाला आहे. त्यातून सावरण्यासाठी केंद्र सरकारची ही योजना असेल. गुजरात निवडणुकीनंतर नवी योजना? ही योजना यशस्वी झाल्यास एनडीएला त्याचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोठा फायदा होईल, असं जाणकारांना वाटतं. शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने ग्रामीण भागात सरकारवर मोठी नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यास मोठी मदत होईल. गुजरात निवडणुकीतही ग्रामीण भागाची सरकारवर नाराजी असल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर सरकारने तातडीने पाऊल उचलत या योजनेचं नियोजन केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP MajhaIce Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Embed widget