एक्स्प्लोर

काँग्रेसच्या चाणक्याला हरवण्यासाठी भाजपचा सापळा

बिहारमध्ये लालू-नितीश यांच्या युतीला सुरुंग लावल्यानंतर, भाजपच्या चाणक्यांची नजर आता गुजरातकडे वळली आहे.

नवी दिल्ली: बिहारमध्ये लालू-नितीश यांच्या युतीला सुरुंग लावल्यानंतर, भाजपच्या चाणक्यांची नजर आता गुजरातकडे वळली आहे. यावेळी त्यांच्या निशाण्यावर असलेलं सावजही तितकंच मोठं आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींचे सर्वात विश्वासू आणि राजकीय सल्लागार अहमद पटेल यांना राज्यसभेच्या निवडणुकीत रोखण्यासाठी भाजपनं एकापाठोपाठ एक चाली खेळायला सुरु केल्या आहेत. शंकरसिंह वाघेला या काँग्रेसच्या बड्या नेत्यानं नुकतीच पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्या बंडाळीचा फायदा घेत अहमद पटेल यांची राज्यसभेतली वाट बिकट करण्याचा भाजपचा डाव आहे. गुजारातच्या 182 आमदारांच्या विधानसभेत भाजपकडे 121 आमदार असल्यानं अमित शाह, स्मृती इराणी हे भाजपचे राज्यसभेचे दोन्हीही उमेदवार आरामात जिंकू शकतात. जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीची 47 मतं आवश्यक आहेत. गुजरातमध्ये काल काँग्रेसच्या तीन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर शुक्रवारी आणखी दोगा आमदारांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांची संख्या घटून 57 वरुन 52 वर घसरली आहे. शिवाय राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेसच्या 11 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यानं काँग्रेसची धास्ती वाढली आहे. बलवतसिंह राजपूत, तेजश्री पटेल आणि पीआय पटेल या काँग्रेसच्या तीन आमदारांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. चन्नाभाई चौधरी आणि मान सिंह चौहान यांनी आज काँग्रेस सोडलं. विशेष म्हणजे यातल्याच फुटीर बलवंतसिंह राजपूत यांना भाजपनं राज्यसभेसाठी आपला तिसरा उमेदवार म्हणून जाहीरही करुन टाकलं. बलवंतसिंह हे गुजरात विधानसभेत काँग्रेसचे व्हिप होते, शिवाय ते शंकरसिंह वाघेला यांचे नातेवाईकही आहेत. वाघेलांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असली तरी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत असलेले आमदार गळाला लावण्यात यश आलं, तर अहमद पटेल यांची राज्यसभेतली वाट बिकट होऊ शकते. अहमद पटेल हे गुजरातमधले एकमेव मुस्लिम खासदार आहेत. राज्यसभेतलं संख्याबळ वाढवून मोदींचे हात आणखी मजबूत करण्यासाठी भाजप एकेक खासदार कसा वाढवता येईल, यासाठी कसोशीनं प्रयत्न करतंय. अहमद पटेल यांचा चुकून पराभव झालाच, तर तो केवळ एक निकाल नसेल. तर काँग्रेससाठी प्रचंड धक्का असेल. गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचं नैतिक मनोधैर्य खच्ची करण्यात भाजपला यश येईल. सक्रीय राजकारणात नसले तरी अहमद पटेल हे यूपीएच्या काळात काँग्रेसमध्ये नंबर 2 चं व्यक्तिमत्व मानलं जायचं. सोनियांच्या राजकीय निर्णयांमध्ये पटेल यांचा सल्ला मोलाचा असायचा. लो प्रोफाईल राहणी पसंत करणारे अहमद पटेल हे पाचव्यांदा राज्यसभेची निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या या चाणक्याचा पराभव करण्यात भाजपला यश येणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. राज्यसभेसाठी गुजरातमध्ये 8 ऑगस्टला मतदान होणार आहे. नितीशकुमार यांच्यासारखा मातब्बर सहकारी यूपीएतून फोडण्यात यश आल्यानंतर, आता अहमद पटेल यांना राज्यसभेत हरवण्यासाठी भाजपनं सापळा लावलाय. राजकारणात किलिंग इन्स्टिक्ट  शत्रूला नामोहरम करण्याची अमित शहांची ही शैली यावेळीही परिणामकारक ठरणार का याची उत्सुकता आहे. गुजरात आणि राज्यसभेचं गणित
  • 182 सदस्यसंख्येच्या गुजरात विधानसभेत भाजपचे 121 आमदार
  • काँग्रेस आमदारांची संख्या 57
  • मात्र शंकरसिंह वाघेलांसह 5 आमदारांनी सोडचिट्ठी दिल्याने काँग्रेसचं संख्याबळ 52 वर
  • राज्यसभा निवडणूक जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीची 47 मतं आवश्यक
  • मात्र काँग्रेसच्या 52 पैकी वाघेला गटाचे अनेक आमदार आहेत
  • त्यामुळे अहमद पटेल यांना 47 मतांसाठी मोठा संघर्ष करावा लागणार
  • राष्ट्रपती निवडणुकीत 11 मतं फुटल्याने काँग्रेसला धास्ती
  • राज्यसभेसाठी गुजरातमध्ये 8 ऑगस्टला मतदान
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhar Bhojshala : धार भोजशाळेत आता निर्बंधांशिवाय सरस्वती पूजेला परवानगी; ASI चे सर्व जुने आदेश रद्द
धार भोजशाळेत आता निर्बंधांशिवाय सरस्वती पूजेला परवानगी; ASI चे सर्व जुने आदेश रद्द
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Embed widget