एक्स्प्लोर

प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख, भूपेन हजारिका यांना 'भारतरत्न'

प्रणव मुखर्जी हे भारताचे तेरावे राष्ट्रपती होते. यूपीए 2 कार्यकाळात म्हणजेच 25 जुलै 2012 रोजी प्रणव मुखर्जी यांनी पद ग्रहण केलं होतं. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीला उभे राहण्यापूर्वी त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला होता.

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा 'भारतरत्न'ने सन्मान होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख आणि प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका यांनाही मरणोत्तर 'भारतरत्न' प्रदान होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' यांची घोषणा करण्यात आली आहे. प्रणव मुखर्जी हे भारताचे तेरावे राष्ट्रपती होते. यूपीए 2 कार्यकाळात म्हणजेच 25 जुलै 2012 रोजी प्रणव मुखर्जी यांनी पद ग्रहण केलं होतं. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीला उभे राहण्यापूर्वी त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला होता. 25 जुलै 2017 रोजी ते राष्ट्रपतीपदावरुन पायउतार झाले. मात्र त्यानंतर लगेचच त्यांनी रा. स्व. संघाच्या मंचावर हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. प्रणव मुखर्जी यांचा परिचय प्रणव मुखर्जी यांचा जन्म 11 डिसेंबर 1935 रोजी झाला. 1969 पासून ते राजकारणात सक्रिय आहेत. इंदिरा गांधी (1982-84) आणि मनमोहन सिंग (2009-12) यांच्या कार्यकाळात त्यांनी देशाचं अर्थमंत्रिपद भूषवलं होतं. नरसिंह राव (1995-96) यांच्या कार्यकाळात ते परराष्ट्रमंत्री होते, तर मनमोहन सिंग (2004-06) यांच्या कार्यकाळात ते संरक्षणमंत्री होते. भारतीय राजकारणातील अमूल्य सेवेसाठी त्यांना भारत सरकारने 2008 साली 'पद्मविभूषण'ने सन्मानित केलं होतं. नानाजी देशमुख यांचा परिचय चंडिकादास अमृतराव देशमुख ऊर्फ नानाजी देशमुख (11 ऑक्टोबर, 1916  - 27 फेब्रुवारी 2010) मराठी सामाजिक कार्यकर्ते होते. सरकारने याआधी त्यांच्या कार्याचा पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. 1997 मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना ’डॉक्टर ऑफ लेटर्स’ ही पदवी प्रदान केली. हिंगोली जिल्ह्यातील कडोळी या गावी जन्मलेल्या नानाजींनी प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून कार्य केलं. पुढे काही वर्षे त्यांनी देशाच्या राजकारणात प्रमुख भूमिका निभावली. राजकारण किंवा सत्ताकारणाच्या मर्यादा लक्षात घेऊन अखेरीस त्यांनी शाश्र्वत विकास साधणारे समाजकार्य करायचे ठरवले. भूपेन हजारिका भूपेन हजारिका (8 सप्टेंबवर 1926 - 5 नोव्हेंबर 2011)  आसाममधील प्रसिद्ध गीतकार, संगीतकार आणि गायक होते. याशिवाय ते कवी, चित्रपट निर्माते, लेखक आणि आसामच्या संस्कृतीचे अभ्यासक होते. भूपेन हजारिका यांचा जन्म आसाममधील तिनसुकीया जिल्ह्यातील सदिया गावात झाला. 1946 मध्ये हजारिका यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून राज्यशास्त्रातून पदवी मिळवली. त्यानंतर न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी पीएचडीचं शिक्षण घेतलं. भूपेन हजारिका यांना 1975 मध्ये राष्ट्रीय पुरस्काराने तर 1992 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 2011 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरव करण्यात आला. आतापर्यंतचे भारतरत्न तब्बल चार वर्षांनंतर 'भारतरत्न' पुरस्कारांची घोषणा झाली आहे. 2015 साली माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न बहाल करण्यात आला होता. त्याचवेळी मदन मोहन मालवीय यांनाही मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आला होता. 2014 मध्ये क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि शास्त्रज्ञ सीएनआर राव, तर 2008 मध्ये पं. भीमसेन जोशी यांचा भारतरत्नने सन्मान करण्यात आला होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PM किसानसंदर्भात शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! 2000 रुपये हवे असल्यास 'हे' काम करा, अन्यथा...
PM किसानसंदर्भात शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! 2000 रुपये हवे असल्यास 'हे' काम करा, अन्यथा...
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
छोटी गुंतवणूक, मोठा फायदा! पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेद्वारे उभारा लाखो रुपयांचा निधी, जाणून घ्या सविस्तर माहिती
छोटी गुंतवणूक, मोठा फायदा! पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेद्वारे उभारा लाखो रुपयांचा निधी, जाणून घ्या सविस्तर माहिती
Ahmedabad Plane Crash: 'आम्हाला पैसा नको, अपघाताचं कारण हवं आहे, ब्लॅक बॉक्स डेटाची माहिती द्या' अहमदाबाद भीषण विमान अपघातातील पीडित कुटुंबांचे मोदींना पत्र
'आम्हाला पैसा नको, अपघाताचं कारण हवं आहे, विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरची माहिती द्या' अहमदाबाद भीषण विमान अपघातातील पीडित कुटुंबांचे मोदींना पत्र

व्हिडीओ

Khalapur Bhondu Baba : खालापूरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश, अनेक महिलांवर केला अत्याचार
Sanjay Raut PC : भाजप इतर निवडणुका लढतात, मतं फोडतात मग या पोटनिवडणुका बिनविरोध का?
Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
Rickshaw License : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांचे लायसन्स रद्द होण्याची शक्यता, फेरतपासणीचे सरकारचे आदेश
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांचे लायसन्स रद्द होण्याची शक्यता, फेरतपासणीचे सरकारचे आदेश
Embed widget